Skip to main content

एक योजना

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 30/11/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी गेल्या आठवड्यात काय झालं हे आपल्याला माहित आहे.. यातूनच एक भयंकर सत्य समोर आलं की सध्याच्या नेत्यांना देशापेक्षा त्यांच्या राजकारणातच जास्त रस आहे. एकूणच सगळ्यावर मी आणि अदिती इतरांप्रमाणेच दु:खी होतो.. हे सारं करताना काहितरी करायला हवं हे जाणवत होतंच.. नक्की काय करावं हे मात्र समजत नव्हतं...यातूनच खरडा खरडी चालु झाली... हे सगळं बदलायचं तर आहेच.. पण कसं? अनेक उपाय आहेत.. उपाय असु शकतील....पण कुठून तरी सुरूवात झाली पाहिजेच.. सुदैवाने लोकशाहिचा "बदल "हा पाया आहे. यासाठी कोणत्याहि यादवीची गरज नाहि.. गरज आहे एका मताची..

मटण सुप (अर्थातच आकर्षक छायाचित्रांसह)

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 30/11/2008 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
मटण खायचे तर आहे पण मसालेदार नकोय (फोटूंमुळे जळजळ होते मसाल्याने वाढायची ;) ), मग मटण सुप हा छान पर्याय आहे. आम्ही याला मोळं मटण पण म्हणतो.

विलासराव अडचणीत

लेखक कवटी यांनी रविवार, 30/11/2008 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेकी हल्ल्यानंतर अडचणीत आलेले मुख्यमंत्री विलासराव आज राजिनामासत्रात पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. हल्ल्यानंतर ताजची पहाणी करायला गेलेल्या मुख्यमंत्र्यानी बरोबर सिनेस्रुष्टीतील त्यांचे चिरंजीव रितेश आणि निर्माता राम गोपाल वर्माला बरोबर नेल्याने आय.बी.एन्.लोकमत ने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जाड कातडीचा, निष्क्रीय्,बेजबाबदार,गुलछब्बू अश्या विशेषणे त्याना लावण्यात येत आहेत. विलासरावांची ही क्रुती नक्कीच निंदनीय आहे. यानंतर विलासरावानी पदावर रहावे काय? आणि लोकानी पुढच्या टर्मसाठी त्याना निवडून द्यावे काय?

एक जुनी कविता: सहज आठवली म्हणून

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 30/11/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा वारे युद्धाचे वाहती जवान नाहती कौतुकात शत्रूच्या भयाने होतो थरकाप मुखी आपोआप राष्ट्रगीत थंडी नि वार्‍यात झुंजती जवान शब्दांचेच दान त्यांना द्यावे आणि कोणी वेडे हुतात्मेही होती त्यांची देशभक्ती गौरवावी संपताची युद्ध त्यांना विस्मरावे आपण रमावे आपल्यात रात्रंदिन त्यांना युद्धाचा प्रसंग नेते सारे दंग स्वार्थामाजी
Taxonomy upgrade extras

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 30/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे.

इथे सुद्धा मराठी द्वेष

लेखक योगी९०० यांनी रविवार, 30/11/2008 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी वाचा.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774786.cms आज दहशतवादा विरुद्ध एकत्र येण्याची गरज असताना आपले चतूर(?) राजकारणी आणि मिडिया "राज" कारण करत आहेत. अर्थात जखमी लोकांना मदत करायला मनसे आणि शिवसेनाच पुढे होती हि गोष्ट विसरलीच गेली आहे. हा एस एम एस वाचा.. दहशतवादी हल्ला होत असताना राज ठाकरे व त्यांची शूर सेना कुठे होती?... भूमिपुत्रांना, मनसेच्या गुंडांना बरोबर घेऊन जा आणि आमची मुंबई वाचवा... आर्मी किंवा कमांडो मराठी नव्हते, मग त्यांनी मुंबईसाठी का प्राण गमावले?

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

लेखक बबलु यांनी रविवार, 30/11/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

नव्या दिशा (???) !!!

लेखक अभिजीत यांनी रविवार, 30/11/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे. या दोन बातम्या पहा - यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे. यात प्रथमच मतदान करणार्‍यांचा समावेश होता. मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

शिवराज पाटील यांचा राजिनामा

लेखक अनंत छंदी यांनी रविवार, 30/11/2008 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
म.टा.च्या संकेतस्थळावर ब्रेकींग न्यूज झळकते आहे. मुंबईतील हल्ल्याबाबत नैतिक स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजिनामा दिला आहे.

मिपाने एक कट्टा भरवावा.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 30/11/2008 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्याच्या मूंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात अनेक लेख आणि प्रतिक्रिया प्रसिद्ध होत आहेत. अर्थातच ते साहजिकही आहे. प्रत्येकाच्या मनातील काळजी, चिंता आणि भविष्याबद्दलची साशंकता प्रत्येकाला सैरभैर करीत आहे. मिपाने संकेतस्थळाच्या बाबतीत अनेक उपक्रम राबवलेले आहे आणि आपला सक्रिय उत्साह मरा्ठी जगतात दाखविला आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवरही एखादा कट्टा मुंबई अथवा पुण्यात भरवला गेला तर बरे होईल. त्याचबरोबर पोलिस अथवा सैन्यदलातील कोणा तज्ज्ञांना अनौप्चारिक चर्चेसाठीही पाचारण करण्यात येता येईल.