Skip to main content

भूल

लेखक जयवी यांनी गुरुवार, 05/03/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

तुझे आगमन

लेखक जागु यांनी गुरुवार, 05/03/2009 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु जेंव्हा येशील सुर्य तुला लाजलेला असेल चंद्र खट्याळ तुला डोकावत असेल चांदण्या लागतील कुजबुज करु दवबिंदुंची पाझर होईल सुरु रातराणी लागेल सुगंध पसरवू वार्‍याची झुळूक देईल चाहुल तुझ्या आगमनाची पाहुन तुला मी होईन बावरी राधा झाली होती जशी कृष्णासाठी तु शोधशील माझ्या नजरेतील प्रिती ठेवील गुपित नजर माझी झुकली गारवा करेल आतुर तुला स्पर्शासाठी मीही असेन बेफान तुझ्या अंधारी गाढ मिठीसाठी.
Taxonomy upgrade extras

जिवलगा...

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 05/03/2009 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
जिवलगा ss राहीले दुर घर माझेss आशा भोसलेंनी गायलेले हे गीत पाहीजे आहे. कोठे मिळेल ते क्रुपया सांगता का?

हा राग कोणता!

लेखक सालोमालो यांनी गुरुवार, 05/03/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, http://www.youtube.com/watch?v=xvSpcMwQldc या लिंक वर टिचकी मारून कुंजबिहारी ही पं. जसराज यांची सर्वांगसुंदर रचना ऐका. मला हा राग भटियार वाटतोय. पण मधुनच थोडासा वेगळा जाणवतोय. थोडासा दुसरा राग मिक्स असल्यासारखा वाटतोय. तुम्हाला काय वाटतयं? जरूर सांगा. सालो

एक निवेदन..

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी गुरुवार, 05/03/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत. निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी) १) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

लेखक वाचक यांनी गुरुवार, 05/03/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते. एवढे काय आहे ह्या पुस्तकात ?

नम्रतेचा अमुल्य धडा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 05/03/2009 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
"शहरात येऊन मध्यमवर्गीयात राहून त्यांच जीवनचर्य अंगिकारून राहिल्याने माझे पूर्वीचे खेड्यातले दिवस विसरणं,मी कोण आहे हे विसरणं,मी कुठे होतो,आणि पुढे मला कुठे जायचंय ह्याचा विचार विसरून जाणं हे सर्व सहज सोपं होतं." माझा मित्र मोहन मोकाशी खूप दिवसानी मला भेटला.जुन्या गप्पा मारण्यात मजा येत होती.तो त्याच्या आठवणी मला सांगू लागला.शहरातली रहाणी आणि लोकांची एकमेकाशी वागणूक या विषयावर चर्चा होत असताना,रोजच्या घाईगर्दीच्या जीवनात बारीक बारीक कारणावरून बाचाबाचीचेच प्रकार जास्त होत असतात.असा त्याचा बोलण्याचा सूर होता. शक्यतो नम्रतेने राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो असं म्हणाला.

शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.

लेखक सुभाष यांनी गुरुवार, 05/03/2009 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या