Skip to main content

भूल

लेखक जयवी यांनी गुरुवार, 05/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला चांदण्याचे माप ओलांडून अलगद उतरली बावरी नव परिणिता जणु प्रियकराला बिलगली सावळ्या सखी-साजणाचा नूर होता आगळा मत्स्यगंधा रात्र झाली, अन्‌ धुके चहूबाजुला यामिनीचा मग रुपेरी साज हलके उतरला धुंदले आकाश होते चंद्र होता साक्षीला शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3719
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला झक्कास्स्स्स्स्स... भूल पडली मला नेत्र तिचे पाहताच राहिलो ना माझाचं मी दर्शन तिचे घडताच मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

>>रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले.. सुरेखच ! :)

कविता फार आवडली . . . रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले कल्पना आणि शब्दबंधाला सलाम !

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले क्या बात है ! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...और भी आने दो ! -दिलीप बिरुटे

खूपच सुन्दर! शेवटच्या ओळी खरच खूप मोहक आहेत. अगदी मनाला भिडतात. क्रान्ति

अतिशय नाजूक शब्दांनी नटलेली कविता... एकदम सुरेख! रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले शेवट तर अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयश्री , कविता फार सुरेख आहे. खूप आवडली. सोनाली

सुंदर कविता. मस्त आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by प्रमोद देव

देवकाका........ तुम्ही माझ्या कवितेचा सन्मान केलात :) मनापासून धन्यवाद !! मस्त झालीये चाल !! तुमचं खरंच फार कौतुक वाटतं हो.....!!

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली खुप छान.

सगळ्यांचे मनापासून आभार :)