Skip to main content

नारायणगावचा थरार!!! अन्तिम भाग

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 06/06/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.

(बँकेतील बॉलपेन)

लेखक विकास यांनी शनिवार, 06/06/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचदा बँकेत ग्राहकांच्या सेवेसाठी काउंटरवर जी बॉलपेन्स ठेवलेली असतात ती आकाराने लहान, टोपण नसलेली आणि लहानशा साखळीने बांधलेली असतात. बर्‍याचदा चेकवर सहीसाठी अथवा डिपॉझीट फॉर्मवर सही करायला अशा लहान, टोपण नसलेल्या साखळीने बांधलेल्या पेनाचा ग्राहक वापर करतात. तर अशी ही लहान, टोपण नसलेली साखळीने बांधलेली बॉलपेन्स काउंटरवर ठेवण्यामागे आणि स्वतःचे पेन न वापरता तेच पेन (कधी कधी थोडेसे झटकून) वापरण्यामागे आर्थिक कारण काय असू शकेल? ;)

वट सावित्रीचे आंबे..

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/06/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
वट सावित्रीचे व्रत करणा~या भगीनि वडाचि पुजा झाल्यावर वडाला नैवेद्य म्हणुन आंबे वहातात...व पुजा करणा~या गुरुजिंना हि आंब्याचे दान करतात..पण हे आंबे आकाराने नेहमी लहान असतात..हापुस किंवा पायरी अश्या प्रकारचा नैवेद्य कधिच दाखवला जात नाहि..मला आठवते लहानपणी वट सावित्रीचे आंबे असे लहान आम्बे विकायला यायचे..वडाला लहान आंबे वहाण्या मागचे धार्मीक कारण काय असावे?

"तुझ्या डोक्यावर आलेली बला टोपीने झेलली."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 05/06/2009 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी गुरूनाथला विचारलं, "तुझी ती गांधी टोपी,किंवा सफेद टोपी म्हणूया ती वापरायचं तू केव्हा पासून सोडून दिलंस?" त्याच्या त्या सफेद टोपीची "ष्टोरी" माझ्या अजून लक्षात आहे हे समजल्यावर गुरूनाथ हंसायला लागला. "अरे तू एव्हडा हंसतोस का?" असं मी त्याला म्हणालो. "ती टोपी आणि मी हंसतो कां?

सौभाग्य

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 05/06/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या गजर्‍यास काय ठाउक केसांत माळलेल्या कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले... सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले हृदयात आसवांचे मग सूर लागलेले... जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने? होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले... मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो होमात आज माझे आयुष्य पेटलेले... चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...
Taxonomy upgrade extras

शिवसेनेचा निलाजरेपणा

लेखक टायगर यांनी शुक्रवार, 05/06/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे.

करुणा कर

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 05/06/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
सांब सदाशिव शंकर | नीलकंठ गौरीहर हे उमापती महेश | भूतनाथ गिरिजावर करि धारी त्रिशुल डमरु | हे नटवर शशिशेखर अंगि चिताभस्म लेप | सर्पमाळ व्याघ्रांबर मदन दग्ध करिसी तूच | हे त्रिनेत्र नंदीश्वर रौद्र तुझे तांडव ते | भीषण अन् प्रलयंकर शंभो कैलासनाथ | भालचंद्र गंगाधर तूच सत्य, शिव, सुंदर | करुणाकर, करुणा कर