सौभाग्य
लेखनविषय:
खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजर्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...
सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...
मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...
वाचने
4045
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
आवडले.
स्वाती
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजर्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...
मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
हे विशेष!
चतुरंग
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
केवळ अद्वितिय शब्दरचना!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
सुंदर कविता! अप्रतिम!
बऱ्याच जागा आवडलेल्या आहेत. चांगली रचना.
(अवांतर - या रचनेत इतरही काही संदेश आहेत का?)
मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
क्या बात है! जियो!!!
फक्त जरासं एकच सजेशन...
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...
या ऐवजी,
हृदयात आसवांचे मग पूर दाटलेले...
हे कसं वाटतंय?
चूभूद्याघ्या..
-पिडांकाका
In reply to वा, बेला! by पिवळा डांबिस
काय सुचवणी आहे. सलाम.
मूळ रचनेतील सूर अगदी योग्य जागी आहे. म्हणजे सनई-चौघड्यांनी कान किटले आहेत. डोळे मिटले असल्याने स्वाभाविकच हृदयातून आसवे गळताहेत. आंसू ओघळतानाही एक सूर असतो मनात. तो सूरच आता मनाचे सांत्वन करतोय. आणि पूर - विटलेले कान, मिटलेले डोळे अशा वेळी निवण्यासाठी हृदयातूनच आसवांचे पूर वाहिले पाहिजेत.
बेला, पिडां - हे माझं आकलन. पण तुम्हा दोघांनाही सलाम. कारण सूर आणि पूर दोन्ही समर्पक बसतात (असं मला वाटतं हे म्हटलंच पाहिजे का?)
In reply to वा... by श्रावण मोडक
सनई चौघडे, अश्रू आणि सूर यांचा परस्परसंबंध मोडकसाहेबांनी अचूक ओळखलाय. मलाही तोच अपेक्षित असल्याने आसवांचे पूर न होता सूर झाले/होणारच होते. मोडकसाहेबांना १०/१० ;)
(परीक्षक)बेसनलाडू
पिडाकाकांनी सुचवलेला बदल स्वतंत्रपणे योग्य असला तरी इतर दोन ओळींच्या संदर्भात चपखल बसत नाही, असे वाटते आहे.
(स्वतंत्र)बेसनलाडू
In reply to वा, बेला! by पिवळा डांबिस
बदल मला आवडला.
In reply to वा, बेला! by पिवळा डांबिस
त्याचा संबंध वरच्या सनई चौघड्यांच्या सुरांशी असल्याने तसे तर्कसंगत वाटते. 'आसवांचे पूर' मेंदूच्या उजव्या भागाला पटले, डाव्या भागाला नाही.
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...
सुप्पर्ब!!!
अप्रतिम शब्दरचना! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कवितेत मोठा आशय असल्याचा भास होतो, पण रचना तशी सो-सोच वाटली.
और भी आने दो !
-दिलीप बिरुटे
कुंकवाची देवाण आणि घेवाण करणार्या दोघांबद्दल वाईट वाटले.
>>या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
वाहवा.. कविता आवडली.
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
कविता आवडली... :)
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
बेलाशेठ,
ब-याच दिवसानी अगमन केलेत.
(आनंदी)केशवसुमार..
एकदम खणखणित कविता..अभिनंदन!!
(वाचक)केशवसुमार
अप्रतिम काव्य !!
भारी कविता.
खराटा
(रंग माझा वेगळा)
मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो . . . .जबरदस्त.
भिडणारी कविता.. सगळीच कविता/गीत आवडले! छान लिहिलेत!!
बाकी -
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...
- या ओळी आधी वाचलेल्या आहेत. प्राजुतैने कविता पूर्ण करा असा धागा टाकला होता, त्यात या दोन ओळी तुम्ही लिहिलेल्या आहेत!! तेव्हाच वाटले होते काय मस्त गझल होईल या ओळी घेऊन!
http://www.misalpav.com/node/7018#comment-106916
(स्मरणशील) राघव :)
( आधीचे नाव - मुमुक्षु )
अप्रतिम काव्य.
खुपच सुंदर.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
लै भारी बेला!
जोरदार पुनरागमन :)
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?हे अगदी विषेश अजून येऊ द्या. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
वा..