Skip to main content

मी आणि श्रावण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 28/07/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची. कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला.

(कविता हवी आहे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 28/07/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी पुन्हा एकदा मि.पा. वर स्वतंत्र लिहीत आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल. गेले काही दिवसापासुन मी नियमित मि.पा. वाचत आहे. त्यातला कविता हा प्रकार मला खुप आवडला खाली जे विडंबन आहे ते माझे आहे.मला ह्या वरती कविता करुन हवी आहे. माझ्या माहिती प्रमाणे बर्‍याच मिपाकरांची नावे कवितांसाठी प्रसिद्ध आहेत अस लक्षात आले आहे. कृपया अवांतर तज्ञांसाठी.......हा धागा वापरा....

नातं...

लेखक दशानन यांनी मंगळवार, 28/07/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
दादा, दे ना, ते माझे पैसे आहेत ना... ! देत नाही, माझापण हिस्सा आहे ह्यात... समजले, अर्धे घे. ठीक, अर्धे तरी दे. ठीक आहे हे घे... ! आमच्या घरी रक्षाबंधन व भाऊबीज च्या दिवशीचा नेहमीचा संवाद माझा व माझ्या ताईचा. बाबा नाही तर आई ओवाळणी साठी कधी पाच तर कधी दहा रुपये माझ्या हाती ठेवायची व डोळे वटारुन दम द्यायची की ताईलाच सर्व पैसे दे नाही तर बघ. पण मी पण हुशार आई समोर ओवाळणी घालत असे ताटात व ताई ने हातात पैसे घेतले व आई किचन मध्ये गेली कि लगेच ताईच्या हातातून पैसे काढून घेत असे व सरळ गच्चीवर.. मग ताई माझ्या वर रागवायची दंगा करायची पण अर्धे पैसे घेऊन गप्प बसायची..

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

मग ओबामा निराळे कसे?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 28/07/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "मिसळ-पाव"वरील, त्यातही अमेरिकास्थित, मित्र-मैत्रिणींनो, कृपया खालील लिंक उघडून माझा ई-सकाळच्या वेब एडिशनवर कालच प्रसिद्ध झालेला ले़ख वाचावा व माझ्या मतांशी सहमती असल्यास 'व्हाईट हाऊस', १६०० पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यू, वॉशिंग्टन डी. सी.

टोळ्ळंभट्ट

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/07/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइल हॉल मधे ठेवला होता. तरी सुद्धा सकाळी साडेपाच ला जाग आली. बायॉलॉजिकल अलार्म. नाईट लॅम्प च्या मंद प्रकाशातुन बाहेर निघालो तर आरशातुन एक हाक अयकु आली. "ओ मास्तर, कुठे चालले? आज काही शेड्युल नाही ना. गप्प झोपा की." बर बर. निसर्गाची हाक पुर्ण करतो. " हो, नंतर चहा मागाल बायकोकडे" नाही. " उद्यापासुन हेवी असेल ना शेड्युल. संधी मिळाली आहे तर गपगुमान झोपा की.

त्सुनामी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 28/07/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
उद्दंड जाहल्या लाटा तांडव करीती वारे स्तब्ध चंद्रमा नभात हरवुन गेले तारे... बेभान जाहली गाज सागरा जावु कसा रे सारे किनारे संपले कसा आवरु पिसारे... मिठीत घेण्या धरणी करशी किती पसारे डोळ्यात दाटले पाणी सांगु वेदना कशा रे पांघरशी स्वप्न निळे स्वप्नांचे धुंद मनोरे स्नेह तुझा ओसरला रे बघ खुंटले फुलोरे विशाल
काव्यरस