तिने एक कविता केली
अन् विचारले "कशी वाटली"?
मी म्हणालो
"नदी, झरे, चांदण्यांची
पान भरुन दाटी झाली"
कविता कशी हवी
वास्तवदर्शी अन् आरस्पानी
काळजाला भिडणारी
मनाला जरा पिडणारी
विचार करायला लावणारी
अन् काळाबरोबर धावणारी
(म्हणजे नको नॉस्टेलजिक )
ती म्हणाली " अरे ,आपण
वास्तवतर जगतोच आहोत
मग कविता हवी कशाला
तू वास्तवाच्या ऐदीसाठी
स्वप्ने घेतोसच कि उश्याला.
कवितासुध्दा एक स्वप्न -
मुक्त विचारांना पडलेलं
त्यामध्ये मग काहिही येईल
पानं, फुलं, टोपड, झबलं
कवितेतलं वास्तव म्हणजे
नक्की रे असतं काय ?
-वास्तवतेच्या भावनांना
कल्पनेचेच ना असतात पाय ?
नको कविता नॉस्टेलजिक
नको आठवणींचे रान
पण, प्