Skip to main content

कुटुंब गेले कुणीकडे?...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 28/08/2009 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकीकरणामुळे बदललेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाचा मोठा फटका महिलांनाच बसत असून, जागतिक मंदीची सर्वाधिक झळही त्यांनाच सहन करावी लागत आहे. कुटुंबाचे भविष्य निर्भर करण्याची शक्ती असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी जगाने प्रामाणिक इच्छाशक्तीने पुढे यावे, अशी साद संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने जगाला घातली आहे. जागतिकीकरणामुळे विकासाचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलत असून, कुटुंबकल्याण आणि माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मागे पडत आहे. हा प्रश्‍न हाताळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भविष्यात आणखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने दिलाय.

पांढर्‍याचं काळं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 28/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं.आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं ठरवून आलो होतो.बाजूच्या फॅमेलीरूम मधे साठे पतीपत्नी बसली होती.साठ्यांना मासे खूप आवडतात.मीच त्यांना अनंताश्रमाची माहिती दिली होती.पापलेटची आमटी आणि तळलेल्या सरंग्याचं काप हे समीकरण त्यांना खूप आवडायच

स्वाईन फ्लू विषाणू व फुकट उपलब्ध असलेला नैसर्गीक फिल्टर

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 28/08/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा. पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.

तुळापुर

लेखक हर्षद आनंदी यांनी शुक्रवार, 28/08/2009 04:48 या दिवशी प्रकाशित केले.
या मंगळवारी अचानक तुळापुरास जाण्याचा योग आला. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व छंदोगामात्य कवी कलश यांच्या धर्म-बलिदानाच्या आठवाने ऊर भरुन येत होता. ईतिहासकारांनी दुर्लक्षलिले, काही अगम्य चुका (की थोरल्या छत्रपतींच्या राजकारणातील अतर्क्य खेळ्या व जबाबदार्‍या वयाच्या ८व्या वर्षापासुन शंभर टक्के यशस्वी करणारे), आप्तांच्या रोशाला फशी पडलेले आणि पराक्रमासोबत कवित्वाचे बहुमोल लेणे घेऊन जन्माला आलेल्या त्या महान योध्याचा जीवनपट डोळ्यापुढे सरकत होता.

आपण सारे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 28/08/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा चर्चाविषय गेल्या आठवड्यात आलेल्या न्यूजवीक मधील एका लेखा संदर्भात आहे. लेखाचे शिर्षक होते: "We are all Hindus now". लेखिकेचे नाव आहे, "Lisa Miller". सर्वप्रथम ह्या लेखाचा दुवा आणि संक्षिप्त-स्वैर भाषांतर देण्याचे कारण हे "कसे आम्ही ग्रेट आहोत!" असे म्हणायचे नाही, याची खात्री असावी.
अमेरिका हे ख्रिश्चन राष्ट्र आहे.

जादुगार!

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 27/08/2009 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९२८! अ‍ॅम्स्टरडॅम ऑलिंपिक मधे हॉकीचे सामने चालु झाले होते.... ऑलिंपिकमधे हॉकी नुकतेच समाविष्ट झालेले... लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला.... भारताचा पहिला सामना ऑस्ट्रीयाबरोबर.... पहिला सामना भारताने थेट ६-० असा जिंकला.... त्यानंतर भारताने अखंड झंजावात चालु ठेवला.... दुसर्‍याच दिवशी बेल्जियमला ९-० ने हरविले.... दोनच दिवसआंनी डेन्मार्कला ५-० ने मात दिली आणि सेमी फायनलला पोहोचला. सेमी-फायनलला स्विस खेळाडूंना ६-० असा चोप देऊन भारतीय फायनलला पोचले. घरच्या पटांगणावर खेळणार्‍या नेदरलँडला भारताने ३-० ने हरवले व आपले पहिले सुवर्णपदक जिंकले.

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

बाप्पा , असे ही...

लेखक हृषीकेश पतकी यांनी गुरुवार, 27/08/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी विसर्जीत होणार्‍या एका गणेशमूर्ती कडे पाहून सुचलेली ही कविता....