Skip to main content

बाबरीचे श्राद्ध

लेखक शरद जयकर यांनी गुरुवार, 11/02/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
आता राम लल्लालाच करायला हवे बाबरीपरी मशिदींच रक्षण अन रसूल अल्लालाच धावायला हवंय मंदिर जन्मभूमी वाचवायला ..... स्वत:च्याच अस्तित्वासाठी ... तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा..... खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो... असते ती फक्त एक जीवघेणी नशा... धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची... तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा कान, डोळे, तोंड बंद करून महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये. थांबव या हिंस्र पशूंना...
काव्यरस

जोशीबाई

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 11/02/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात वरच्या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या आठवीच्या वर्गात आम्ही वाट पाहत होतो, आता कोण येणार तासाला? जोशीबाई जिना चढताना दिसल्यावरच एकच गलका सुरु झाला, " बाई.. गोष्ट, बाई गोष्ट.." " अरे, अरे मला वर्गात तरी येऊ द्याल की नाही?" "परवाच्या ऑफ तासाला अर्धवट राहिलेली कार्व्हरची गोष्ट आधी पूर्ण करा, मग अभ्यास..." बाई हसतच बरं म्हणाल्या आणि धडा शिकवायचे बाजूला ठेवून कार्व्हरचा अनोखा जीवन झगडा विलक्षण प्रभावीपणे सांगू लागल्या ... साधारण सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, शेलाटा बांधा आणि शांत,सात्विक चेहरा! बाईंना आवाज चढवून बोलताना कधी पाहिले नव्हते, तशी त्यांना गरजही लागत नसावी.

एखाद्याचा जातो जीव

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 11/02/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, अलीकडे आम्ही मिपावर बर्‍याच पाककृती वाचतो. त्यात मांसाहारी पाककलांचे वाढते प्रमाण बघून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय? मी काही 'शाकाहार हाच श्रेष्ठ, मांसाहार कनिष्ठ की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले.

आज हिंदुस्तानका हर बूढा संकेतस्थळ मालक बनना चाहता है!

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 11/02/2010 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
(आमची प्रेरणा: आता, सांगायलाच हवी का ?) हल्ली कधी कधी असे व्यनी येतात की ते वाचून मला जाम जालमहर्षी झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी जालमहर्षी झालेला सर्वात खडूस म्हातारा आहे असंही वाटायला लागतं. शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून टुकार आहेत. तेव्हा आता डायरेक्ट विवक्षित ठिकाणी हात... गेले १० वर्षं माझा नेट संचार रखडत रखडत चालू आहे. मनोगतासकट इतरही अनेक पोर्टल्स (सदस्यत्व रद्द होईपर्यंत) आणि आता स्वतःचा ब्लॉगही (जो कोणी वाचत नाही) अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो (हल्ली निनावी).

विकेट!!

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 10/02/2010 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
शुचिताईंचा हा गंमतीशीर धागा वाचला आणि तुम्हासर्वांप्रमाणेच मीही माझ्या राशीबद्दलची निरीक्षणे पाहिली. यावरून विचारांची गाडी तडक आमच्या ऐतिहासिक प्रेमकहाणी कडे वळली! (प्रत्येकालाच आपली/आपल्या प्रेमकहाणी/प्रेमकहाण्या ऐतिहासिक वाटते/ वाटतात राव! ;) एखादा प्रेमवीरांचा चित्रपट पाहताना प्रत्येकजण त्यात स्वतःची प्रेमकहाणी बघतच असतो! ) अर्थातच आम्हाला आम्ही साजरा केलेला ऐतिहासिक व्हॅलेंटाईन डे, ज्या दिवशी (नि)धडधडत्या छातीने, थरथर कापणार्‍या हातात गुलाब घेऊन आम्ही आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीला 'इलू' चा अर्थ समजावला होता, तो दिवस आठवला.

भ्रष्टाचाराची पाळेमूळे

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 10/02/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराची पाळेमूळे भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ` चलता है '’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्‍यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही.

पुणे शहरातील पीएमपी बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा आणि बिचारे पुरुष, मुलगे आणि वृद्ध

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 10/02/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे. (स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा) पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा- (१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून.

मिपासंबंधी..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/02/2010 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपकरहो, मिपासंबंधी कुणाची काही तक्रार असल्यास, कुणा सभासदाचे सभासदत्व गोठवले/रद्द करण्यात आले असल्यास त्या संदर्भात काही विचारणा असल्यास कृपया मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. मी सवडीनुसार उत्तर द्यायचा अवश्य प्रयत्न करीन. या संदर्भात येथे जाहीर विचारणा करण्यास/लिहिण्यास मनाई आहे. तरी असे धागे अप्रकाशित केले जातील याची कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती.. आपला नम्र, तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 10/02/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येउ न शकल्याने त्याच क्षेत्रातील एक खरेखुरे आयडॊल सातारा जिल्ह्यातील शिवाजी राउत यांच्या हस्ते देण्यात आला. सतिश शेट्टी यांचे एक धाकटे बंधु संदीप शेट्टी व अमेरिकेतुन आलेले दुसरे बंधु संतोष शेट्टी यांनी तो स्वीकारला. माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतिश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले.