Skip to main content

मिळेल का?

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 17/05/2010 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
मन्डळी माफ करा . पण ही विनन्ती कोणत्या सदरात लिहावी या कन्फुजन मध्ये मी स्वत: आहे. मग विचार केला कवीता सन्दर्भात असलेली विनन्ती याच ठिकाणी करावी. मला "सायन्काळची शोभा " कवी कदाचीत भा.रा.ताम्बे नक्की आठवत नाही. आणि "चन्दन" ही कवी क्रु. ब. निकुम्ब या दोन कवीता हव्या आहेत. जमल तर द्याल?

आपण काय खातो ...

लेखक अडाणि यांनी सोमवार, 17/05/2010 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
खाणे आणि त्याचे आपल्यावर होणारे परीणाम हा मोठा विस्तृत विषय आहे. ह्या अनुषंगाने लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण जमून येत नव्हते. नुकताच मिपा वर आलेला शिल्पा चा लेख आणि त्यातील प्रतिक्रिया वाचून शेवटी लिहायला सुरूवात केली... आपण खातो ते अन्न , त्याचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परीणाम आणि मुख्य म्हणजे अन्नप्रक्रीयेच्या ओद्योगीकरणामुळे होणारे परीणाम ह्यावर बरेच संशोधन झालेले आहे. ह्या (आणि अजून बर्याच) विषयातील तज्ञ डॉ. पीटर सींगर हे आहेत.

डुडुळगावचा गोलंदाज

लेखक शरदिनी यांनी रविवार, 16/05/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी निवडू धुडूम्म गाज डुडुळगावचा गोलंदाज तोराबोरा ओमरसामा काय ललाटी ओ ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन रुजुवातीला करूण धावन शोषण भीषण पोषण वेसण धवल गिटारी कडकड मंथन तित्तिरबाला ग्रंथीलाला ग्रसनी जिव्हा कुरूप भोला यमनाला घालू तेलघडा हाका बिचारी मुकी चिडा
काव्यरस

उद्धव-राजने एकत्र यावे का ?

लेखक सुनिल पाटकर यांनी रविवार, 16/05/2010 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबरनाथ पालिका , उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का ? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का ? उद्धव-राजने एकत्र यावे का ?

आज पुन्हा मरणास पाहिले

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 16/05/2010 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू हे जगातील जन्माइतकंच नैसर्गिक आणि जन्मापेक्षाही शाश्वत सत्य. माणसाला जेव्हापासून विचार प्रकट करता येऊ लागले बहुदा तेव्हापासून माणसाने मृत्यू आनि प्रेम या गोष्टींवर विचार केला आहे. अर्थाच माणसाची सांस्कृतीक दुनिया मृत्यूच्या भोवतीच गुंफलेली आहे. प्रत्येक धर्माने मृत्यूची विषेश दखल घेतली आहे. अनेक कथा कादंबर्‍या कविता केवळ मृत्यू वर /मृत्यू मुळे अथवा मृत्यूप्रोत्यर्थ निर्माण झाली आहे. असे असताना चित्रपट सृष्टी या विषयावर सशक्त भाष्य केल्याशिवाय कसे राहिल! मृत्यू मुळे आतापर्यंत अगणित चित्रपटांच्या कथांना वेग आला आहे / मंदावल्या आहेत /अचानच कथेने वळण घेतले आहे.

अशी लाजू नको

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 16/05/2010 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
अशी लाजू नको
अशी लाजू नको अशी मुरडू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||धृ|| स्वप्नातले रुप आज सत्यात आले हातात घेवून मी ते पारखले सहवासात तुझ्या विसरलो जगा अशा समयी वेळेची फिकीर नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||१|| फुलापरी तुझा सुगंधीत गंध असे तसाच गुलाबी रंग रूपास दिसे रात्रीच्या अंधारातही चांदणे चमके दिवसाच्या उजेडाची काळजी करू नको ना लाज वाटते म्हणून लांब जावू नको ना ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०५/२०१०
काव्यरस

सत्यकथा: भाकड म्हैस!!

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी रविवार, 16/05/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः साल १९६८... भंडारा... कृत्रीम रेतन केंद्र (कृत्रीम रेतनाद्वारे गायी व म्हशीला गर्भधारणा करण्याचे केंद्र) दुपारची वेळ. पोष्टमन टपाल देणास आत आला. ते रजिस्टर टपाल होते. नवीनच रुजू झालेल्या साहेबाने ते तपाल घेतले. साहेबाने टपाल फोडले व ते वाचू लागले. तसे त्यांच्या चेहेर्‍यावरचे हाव भाव बदलू लागले. जवळ उभा असलेला शिपाई व बाजूला बसलेला डॉक्टर, साहेबांचा चेहेरा न्याहाळत होते. साहेबांनी दोघांना जवळ बोलावले व त्यांना एका कागदावर सह्या करायला सांगितले. दोघांनी त्या कागदावर सह्या केल्या.

मोबाइल sms

लेखक Manoj Katwe यांनी रविवार, 16/05/2010 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोज साधारण पाने ५००/१००० जणांना मोबाइल sms करायचे आहेत. मी सध्या way2sms वापरित आहे. पण एखादा चांगला पर्याय असेल तर सुचवा. (टिप :sms हे जनजागृती, लोकशिक्षण ह्या कामकारिता वापरायचे आहेत)

सजा

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 16/05/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
उदासी नसे, मौन हे बोलते खुशाली विचारी मला रोज ते! दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते धरेला नकोशी असे काय मी? खचे ती, जिथे पाय मी रोवते! अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना, कसे पुण्य अन् पाप ते कोणते? पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी, न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!