Skip to main content

कळतं पण वळत नाही

लेखक शुचि यांनी शनिवार, 17/07/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी नवर्‍याचा वाढदिवस झाला. नणंद तिच्या मुलीस घेऊन आली होती. तिची मुलगी आणि माझी मुलगी जवळजवळ सारख्या वयाच्या. पूर्ण दिवस गप्पा, खेळ, मनोरंजन, खाणंपीणं यात गेला.

आज अचानक तुझी आठवण का यावी

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 16/07/2010 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक तुझी आठवण का यावी आज पापणी ओली माझी का व्हावी फार काळ या गोष्टीला झाला नाही युगे लोटली असतील पण का वाटावी जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने अकस्मात वार्‍याने येउन उघडावी बरेच काही घडले ह्या मधल्या काळी तुला कहाणी कुठून आता सांगावी शब्द उतरण्या पानावरती घाबरले भीती इतकी अर्थांची का वाटावी? तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा फक्त तुला ही धडपड माझी समजावी हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी पहाट होणे अशक्य आहे थांबवणे तरी वाटते रात्र जरा ही लांबावी मनात आहे काय काय दडले माझ्या आज उडी डोहात मनाच

सेझ : कंपनी सरकार की नवे वतनदार ???

लेखक भाऊ पाटील यांनी शुक्रवार, 16/07/2010 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा. मध्ये ही बातमी आलेली आहे. दुवा: नवे वतनदार
संक्षिप्त बातमी: महाराष्ट्राच्या 'सेझ विधेयका'त केंदीय
कायद्यापेक्षाही घातक बाबी आहेत. सेझमधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती,
जिल्हा परिषदा वा नगर परिषदा बरखास्त करण्यात येतील.

सेव्ह द बेबी गर्ल... आणि, सायलेंट ऑब्झर्वर!!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 16/07/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री भ्रूणहत्या ही एक चिंताजनक सामाजिक समस्या आहे. देशात अनेक राज्यांना या समस्येचा विळखा पडला आहे. समाजिक प्रतिष्टेच्या जुनाट कल्पना आता पुन्हा भीषणपणे डोके वर काढताहेत. `ऑनर किलिंग' ही त्यातूनच निर्माण झालेली एक नवी समस्या आहे. स्त्री भृणहत्या आणि ही नवी समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. कारण, दोन्हींचे भविष्यातील परिणाम एकच आहेत. त्यामुळे, खरे तर, या दोन्ही समस्या एकाच वेळी डोळ्यासमोर ठेऊन हाताळायला हव्यात. उत्तरेकडचे ऑनर किलिंगचे लोण आता दक्शिणेतही पसरू लागले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचा आपला अभिमान असला, तरी, इथेही अनेक समजुती, प्रथा-परंपरांची जुनाट मुळे खोलवर जिवंत आहेत.

करा कविता : स्पर्धा

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 16/07/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच लोक शब्दांचेखेळ करण्यात माहीर आहेत खाली काही शब्द आहेत. ते वापरून एखादी चारोळी / तीनोळी / अनेकोळी करा ओळी मर्यादा किमान एक आणि कमाल पंधरा. एका ओळीत किमान तीन शब्द असावेत. सर्वात आषयघन लिहिणारास त्याच्या खरडवहीत एक सुंदर प्रशस्तिखरड देण्यात येईल. हटके ,फटके ,लटके ,झटके ,मटके, मिटके ,कुटके ,कटके ,रटके ,टोटके, चटके, पटके , गुटके , फुटके यातील काही शब्द इतरभाषीक असतील किंवा काही शब्दाना दोन अर्थ असतील. या पैकी जास्तीत जास्त शब्दांचा वापर करून कविता लिहायची आहे. ( ओळी आणि इथे दिलेले शब्द यांचे प्रमाण विचारात घेतले जाईल ) चला मित्रानो मयत्रीणीनो सुरुवात करुया

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (

गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 16/07/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या. मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले. ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.

एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 16/07/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच विषयावर दोन , दोन विडंबनं येण्याचा प्रकार दोनदा घडला, मग आम्हाला काही नतद्रष्ट शंका आल्या... एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन शंका विचारणारे, नतद्रष्ट आम्ही कोण? पहिलेच काव्य येई नावाने केसुरंगा केशवसुमार देती पुढचे विरुद्ध अंगा दावीत दोन्हि रंगा पाध्ये चतूर दोन? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? पाध्यांस प्रश्न भारी, पडतोय या क्षणासी पंचास काय बोलू, अन् काय सदस्यांशी? दळली पिठी कुणाची, जात्यात आणि कोण? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? एके दिनी परंतू पाध्यांस त्या कळाले कंटक जरूर
काव्यरस