Skip to main content

गटारी अमावास्येच्या शुभ कामना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 07/08/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
गटारी अमावास्येच्या शुभ कामना .... "मद्य सत्य जगं मिथ्या !!" मद्योपनिषद... अध्याय दुसरा.. श्लोक क्र.५४ रचना कार.

सामर्थ्यवान

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी शनिवार, 07/08/2010 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट काळोखातून वाट काढत प्रकाशाचा पाठलाग करणारा मी आहे. अथांग सागरातून बुडी मारुन अनमोल मोती मिळवणारा मी आहे. अवघं आसमंत माझ्या मुठीत बंदिस्त करु शकणारा मी आहे. स्वतःच्या तेजाने सूर्यालाही झाकोळून टाकणारा मी आहे. माझी गती एवढी प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा मी आहे. मुठीत आहे माझ्या सामर्थ्य... दुनियेला चकीत करणारा मी आहे. तल्लख बुद्धीच्या जोरावर सार्‍या जगावर अधिराज्य गाजवणारा मी आहे. नवनवीन संशोधन करुन निसर्गाचे गुपित उलगडणारा मी आहे. स्वतःच्या स्वप्नातलं छोटसं घरं चंद्रावर बांधणारा मी आहे. माझा प्रभाव इतका वाहत्या पाण्याला थांबवणारा मी आहे. कोणत्याही परिस्थितीत खचुन न जाता पर्वता
काव्यरस

लख्ख

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 07/08/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
लेकराला मायेच्या ह्या मायेची तहान मायेनेच दिला सूर, उजळाया रान आजीच्या कवतिकाचा सोनियाचा तोडा, आईच्या पदराचा आधारही थोडा मायेच्या गावाला या नाहीच किनारा मऊशार पंखाखाली साजिरा निवारा. थोडी आभाळात आता नवी दिशा दिसे. नव्या क्षितिजाचे मला लागलेले पिसे. नव्या नव्या पंखाना या भरारीची आस कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास खोलखोल दरी आणि माणसे निश्चेत प्रेमानेच सावरले पुन्हा घेऊन कवेत मायेनेच दिले लख्ख, मायेनेच प्राण मायेचाच ठेवा आता, नाही काळा क्षण.
काव्यरस

हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/08/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा सैपाकाचा वर्थ कसा त्यांना उमजावा कधीतरी भेंडीची भाजी मला जमावी कधीतरी मज भात मसालेही समजावा घर-ऑफिस ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये सैपाकाचा वेळ कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला किती बघा हा पतीपत्नी संवाद ट्विटरनेच घडावा करू कशाला घरी परतल्यावर मी कामे पती कामसू आणिक सुग्रण मज लाभावा उगाच चर्चा तू तेव्हा केली तायांशी राग तुझ्यावर घरातला सगळा काढावा अता तरी संपावी इतिहासाची चर्चा धाग्यांमधला लोकांचा दंगा थांबावा अजून किती मी

(चटेपटेरी चड्डीचा हा दोष असावा)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 07/08/2010 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मिपावरच्या पौगंडी विचारसरणीच्या लेखनाची परखड टीका केशवसुमार यांनी एक समर्थ विडंबन लिहून केली. ती वाचून शब्दांच्या गुणसूत्रांचाच दोष वगैरे कारणं देण्यापेक्षा तसल्या लेखकांनी आत्मपरिक्षण करावं असं आम्हाला वाटलं. (ते लोकांनी करण्याआधी आपणच केलेलं बरं, नाही का? कारण काही काही वेळा सिगार हा फक्त सिगार असतो) त्यातून या स्वडंबक कवितेचा जन्म झाला. प्रेरणा अर्थातच अभ्यंकरांची उत्तम कविता.
काव्यरस

गोकाकचा धबधबा

लेखक चालु माणुस यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत..... गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे..... येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे.... पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी.... दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........ तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....

वाटते बोलायचे राहून गेले

लेखक डॉ.कैलास यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते बोलायचे राहून गेले तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले भेटले जे,ते मला फसवून गेले हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा, पोट भरलेले,तरी खावून गेले मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा आप्त माझे पाठ मज दावून गेले माफ केले पाप ते सारे तुझे मी आसवांसमवेत जे वाहून गेले पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना, आपला झेंडा इथे लावून गेले जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण, वाटते,'' बोलायचे राहून गेले '' डॉ.कैलास गायकवाड
काव्यरस

मालवणी स्ताईल

लेखक कळस.. यांनी शुक्रवार, 06/08/2010 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला मालवणी स्ताईल मटण खाण्याची तीव्र इच्छा झालेली आहे तरी कोणास पाककृती अवगत असेल तर त्वरित कळवावे. जर जवळ रहात असाल तर ते खाण्यासाठी बोलवावे.