Skip to main content

विड्या एक फुंकणे

Published on गुरुवार, 11/11/2010
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या) आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते.

(पडुन आहे गात्र कुजुनि)

लेखक मेघवेडा
Published on गुरुवार, 11/11/2010
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे.

भारतीय लोकशाही आणि नेता निवड

लेखक विकास
Published on बुधवार, 10/11/2010
हा विषय माझ्या डोक्यात बरेच दिवस होता फक्त लिहायचे रहात होते... महाराष्ट्रातील आत्ताचा मुख्यमंत्रीबदल हे तात्कालीक कारण आहे. आपण नागरीकशास्त्रात शिकतो की सज्ञान नागरीकाला मतदानाचा हक्क असतो. तो हक्क बजावत कायद्याने सज्ञान असलेली तमाम जनता मतदान करते. मग बहुमतवाला पक्ष राज्य करण्यासाठी हक्क सांगतो. तो हक्क, राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपती, राज्यपातळीवर राज्यपाल आणि स्थानिक पातळीवर (मला नक्की माहीत नाही पण) कदाचीत भारतीय नागरी सेवेतील अधिकारी अर्थात आयएएस अधिकारी जो राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली काम करतो, अशांच्या समोर बजावला जातो.

महाराष्ट्र आणि मंत्री बदल (आपले मत काय?)

Published on बुधवार, 10/11/2010
पृथ्वीराज चव्हाण यांची निवड पृथ्वीराज चव्हाण यांची निवड महाराष्ट्र या आपल्या पुरोगामी आणि विकसित राज्याच्या मुख्यमंत्री पदी झालेली आहे. आणि श्री अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागलेली आहे. दोन्ही नेते हे चांगल्या प्रतिमेचे आणि काराक्षम म्हणून ओळखले जातात. पण या निवडीने काही प्रश आपल्यासमोर निशितच उभे राहतात, किंवा त्यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित होते आपले राज्य विकसित जरी असले तरी आपल्या समोरील प्रश्न देखील तितकेच बिकट आहेत.: शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्याबोळ रोजगारी, दळणवळण, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, मराठीचा प्रश्न, अन्य.

'आलेख'

लेखक स्पंदना
Published on बुधवार, 10/11/2010
मंडळी हा 'आलेख' आहे तुमच्या माझ्या मोठ्ठे होण्याचा! बाल पावलांनी धावता धावता उंबरा ओलांडण्याचा ! एका छोटुल्याला मोठ होताना पहाण्याचा. प्रत्येक आलेखाला एक परिमाण असते. इथ ते परिमाण आहे कागद. आजच्या जगात मोठ होण्याचं मोज माप मला कागदानच मोजावस वाटल.
काव्यरस

आपण कोण आहोत?

लेखक बद्दु
Published on बुधवार, 10/11/2010
आपण कोण आहोत?.... गरीब भारताचे गरीब रहिवासी? दुर्बळ भारताचे अतिदुर्बळ नागरिक ? धर्मनिरपेक्ष भारताचे धर्माभिमानी हिंदू? प्रगत भारताचे अती ( IT) प्रगत मजदूर? कोण आहोत आपण? एका बलाढ्य राष्ट्राचा राष्ट्र्पती इथे येतो काय ? मुलांसोबत नाचतो काय? दिवाळी साजरी करतो काय? "जय हिंद" म्हणतो काय ! सारेच अजब ! तीन दिवस एकाच देशात ? इथे आहे काय असे तीन दिवस घालवायला? अहो, आम्ही तर इथल्या सगळ्या "सिस्टिमच्या" नावावर बोंबा ठोकत फिरतो मग असे एकदम काय घडले की जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणार्‍या आणि तसे प्रत्यक्षात आणणार्‍या त्या राष्ट्रपतीला इथल्या मातीत रमावेसे वाटले?

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

लेखक अरुंधती
Published on बुधवार, 10/11/2010
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद! वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.

साखरगोळ्या..

लेखक गवि
Published on बुधवार, 10/11/2010
लहानपणापासून इंजेक्शन हे सर्वात भयात्कारी औषध. आणि सर्वात टेन्शन फ्री औषध म्हणजे होमिओपथी. गोड गोड छोट्ट्याश्शा साखरगोळ्या. होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे. जशास तसे, किंवा काट्यानं काटा काढणं या तत्वावर. सगळ्यांना सहज समजेल अशा भाषेत सांगायचं तर (म्हणजे मला समजलंय त्या भाषेत..!!) रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा.