आपण कोण आहोत?
लेखनप्रकार
आपण कोण आहोत?....
गरीब भारताचे गरीब रहिवासी? दुर्बळ भारताचे अतिदुर्बळ नागरिक ? धर्मनिरपेक्ष भारताचे धर्माभिमानी हिंदू? प्रगत भारताचे अती ( IT) प्रगत मजदूर? कोण आहोत आपण?
एका बलाढ्य राष्ट्राचा राष्ट्र्पती इथे येतो काय ? मुलांसोबत नाचतो काय? दिवाळी साजरी करतो काय? "जय हिंद" म्हणतो काय ! सारेच अजब !
तीन दिवस एकाच देशात ? इथे आहे काय असे तीन दिवस घालवायला? अहो, आम्ही तर इथल्या सगळ्या "सिस्टिमच्या" नावावर बोंबा ठोकत फिरतो मग असे एकदम काय घडले की जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणार्या आणि तसे प्रत्यक्षात आणणार्या त्या राष्ट्रपतीला इथल्या मातीत रमावेसे वाटले? आमच्या शेम्बड्या मुलांमध्ये नाचावेसे वाटले? साप-विन्चवांच्या या देशामध्ये तीन दिवस आणि दोन रात्री थांबण्याचे धाडस करावेसे वाटले ? स्वतःच्या देशात नियान (Neon) दिव्यांचा डोळे दिपेल इतका झगमगाट असताना आमच्या मातीच्या मिणमिणत्या दिव्यांकडे बघून जगाला संदेश द्यावासा वाटला?
तुम्ही बघताय का हे सगळे? नीट बघताय की फक्त बातम्या वाचून वृत्तपत्र बाजूला ठेवुन परत येरे माझ्या मागल्या करत सकाळी ७.०७ ची वसई लोकल पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करता ?..हो आणखी काय म्हणा ? असो.
मला यातून मात्र एक स्फुर्तिदायक संदेश मिळतोय... की मी आता एका दुर्बल देशाचा नागरिक नाही तर एका अत्यन्त बलाढ्य देशाचा शक्तिशाली आणि तितकाच प्रेमळ/दयाळू नागरिक आहे ..हो ..नाहीतर जगातल्या सर्वात प्रगत राष्ट्राचे महामहीम आमच्याकडे मदत मागायला कशाला आले असते, आणि तेही न बोलाविता? आणि आम्ही तरी उदार ह्रुदयाने , सढळ हाताने, प्रेमळ अंतःकरणाने मदत का केली असती ?
पण नव्हे...
गोरया कातडीचा रांग आतून फिकुटलेला आहे हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. हे कधितरी होणार होतेच, ते याचि देहि ..बघायला मिळाले. आता ते विचारतील आणि आम्ही सांगू " ठिक आहे! तुमच्या पोरासोरांची आबाळ आम्ही होउ देणार नाही , तुम्हाला नक्की काम मिळेल" ..व्वा , क्या बात है. . आम्ही ठरवू आणि ते ऐकतिल ...करता काय..! ऐकावेच लागेल..
...................आम्ही आहोत २१ व्या शतकातील जगाचे मार्गदर्शक.....
. ...अहाहा...सोनियाचा दिनू ..
वाचने
3371
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
अहाहा...सोनियाचा दिनू
दिनू नाही हो राहूल. अहाहा...सोनियाचा राहूल!!!
बोला युवराज की जय!!!!
युवराजांच्या नेतृत्वाखाली तुमचे, माझे, आपले सर्वांचे हे स्वप्न सत्यात उतरणार!!!
आपण कोण आहोत ?
-->
विकसनशिलतेकडुन महासत्ते कडे वळणार्या भारताचे एक सुजान नागरिक आहोत आपण..
आपल्या देशातील वैविध्याचा अभिमान असणारे आहोत आपण ...
सह्याद्रिच्या निधड्या छातीने हिमालयासम आसमंतात खंबीर पणे उभे राहणारो आहोत आपण ..
एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होउन, आनंदाने जगणारे आहोत आपण ..
आणि सिमांची बंधणे झुगारुनही .. संस्कृतीच्या बंधणे माननारे आहोत आपण ...
In reply to आपण कोण आहोत by गणेशा
आपल्या देशातील वैविध्याचा अभिमान असणारे आहोत आपण ...
सह्याद्रिच्या निधड्या छातीने हिमालयासम आसमंतात खंबीर पणे उभे राहणारो आहोत आपण ..
एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होउन, आनंदाने जगणारे आहोत आपण ..
आणि सिमांची बंधणे झुगारुनही .. संस्कृतीच्या बंधणे माननारे आहोत आपण ...
एका उदयोन्मुख महासत्तेविरुद्ध लढण्यासाठी सध्याच्या महासत्तेला मोक्याचे स्थान, हवी ती मदत आणि अर्थव्यवस्था सुधारून देण्यासाठी मोठी बाजारपेठ पुरविणार्या आणि कोणतीही कालबद्ध अंमलबजावणी नसताना नजिकच्या काळात महासत्ता होण्याचा आशावाद असणार्या देशाचे बेशिस्त, अल्पसंतुष्ट नागरिक आहोत आपण.
In reply to एका उदयोन्मुख महासत्तेविरुद्ध by नगरीनिरंजन
एकदम अचूक उत्तर :)
काय नाय हो. ओबामा भारतात आला तो काय भारताच्या प्रेमापोटी किंवा जगाला गांधीजीचे तत्वज्ञान सांगायला नाही. तो आला अमेरिकेत रोजगार निर्मीती करायला. भारतासारखी बाजारपेठ असल्यावर का नाही येणार. आणी ते मुलांबरोबर नाचणं म्हणाल तर तसले प्रकार ते कुठेही करतात. अफ्रीकेत गेले तरी . . त्यात काय नवीन नाही.
आता आपण काण आहोत?
एका होउ घातलेल्या महासत्तेचे बेशिस्त, कायदा न पाळ्नारे, कामचोर, अल्पसंतुष्ट आणी दुसर्याची पर्वा न करनारे नागरिक आहोत आपण. फक्त 'नियमांचे पालन करा' हा एक च नियम जर आपण सर्वांनी पाळला तर भारत खुप लवकर महासत्ता होइल.
मला यातून मात्र एक स्फुर्तिदायक संदेश मिळतोय... की मी आता एका दुर्बल देशाचा नागरिक नाही तर एका अत्यन्त बलाढ्य देशाचा शक्तिशाली आणि तितकाच प्रेमळ/दयाळू नागरिक आहे
.
.
सह्याद्रिच्या निधड्या छातीने हिमालयासम आसमंतात खंबीर पणे उभे राहणारो आहोत आपण
बाकी स्वतः भोवती दिवे ओवळायचे सोडा. भारता कित्येक लोक केवळ वेळेत वैद्यकीय सोय न मिळाल्यामुळे मरतात. त्यांना मदत करायची सोडुन नको ते पोलिसांचे लफडे म्हणुन लोक काही करत नाहीत. भ्रष्टाचार सगळीकडे आहे म्हणुन आपणच बोंबा मारतो .. आपल्यावर वेळ आली की शेपुट घालुन मुकाट पैसे देउन काम करुन घेतो आणी वर त्याला 'व्यवहार' असे गोंडस नाव देतो. आजु बाजुला पहा जरा . . In reply to काय नाय हो. ओबामा भारतात आला by सुक्या
"काय नाय हो. ओबामा भारतात आला तो काय भारताच्या प्रेमापोटी किंवा जगाला गांधीजीचे तत्वज्ञान सांगायला नाही. तो आला अमेरिकेत रोजगार निर्मीती करायला. भारतासारखी बाजारपेठ असल्यावर का नाही येणार"
तेच तर सांगतोय ना. पण रोजगार निर्मिती करायला भारतच का दिसला? जिथे शक्ती आहे तिथे सर्वजण नतमस्तक होतात.आपली शक्ती म्हणजे - स्किल्ड मॅनपावर , सर्व क्षेत्रातील स्किल्स आपल्याजवळ आहे. मग इतरांना या स्किल्ड मॅनपावर ची आवश्यकता वाटली तर ओबामा ला त्याची भिती. मग भारतात येउन भारतीयांना आंजारुन- गोंजारुन त्यांच्याकडुन हे वदवुन घेतले की " आम्ही तुमच्या नोकर्या खाणार नाही " अशी वेळ त्यांच्या राष्ट्रपतीवर यावी ? यातच सारे आले.
In reply to "काय नाय हो. ओबामा भारतात आला by बद्दु
तुमचं म्हणण काहि अंशी खरं आहे. स्किल्ड मॅनपावर भारताकडे भरपुर आहे. पण सर्व क्षेत्रातील ? बहुतेक नाही. स्किल्ड मॅनपावर पेक्षा स्वस्त मनुष्यबळ हे जास्त संयुक्तीक होइल ज्यामुळे आउट्सोर्सिंग झाले आणी तिथे नोकर्या कमी झाल्या. बाकी अमेरिकेचे आंजारणे गोंजारने हे अळवावरच्या पाण्यासारखे आहे. त्याला जास्त महत्व नको.
राहीली गोस्ट महासत्ता होण्याची. ती कुवत भारतात खुप आधीपासुन आहे. कमी आहे ती लोकांच्या सहभागाची.
In reply to तुमचं म्हणण काहि अंशी खरं by सुक्या
"स्किल्ड मॅनपावर पेक्षा स्वस्त मनुष्यबळ हे जास्त संयुक्तीक होइल ज्यामुळे आउट्सोर्सिंग झाले आणी तिथे नोकर्या कमी झाल्या"
..........................
द वाशिंग्टन पोस्ट मधील बातमी खास तुमच्यासाठी ..वाचा:
Cote said the American public's perception that companies send jobs overseas only to take advantage of lower labor costs is misguided. His company, which manufactures avionics, jet engines and other technical products, operates in India because of the "superior engineering" he said is done here.
डेविड कोट हे हनिवेल चे सि ए ओ आहेत. आणि भारतात ११,००० लोकं ( स्वस्त? कि रास्त?) त्यांच्यासाठी काम करतात.
हे एक उदाहरण आहे..असे आणखी सापडतील.
In reply to काय नाय हो. ओबामा भारतात आला by सुक्या
मी स्वता बेशिस्त नाही.. कामचोर नाही.. काही कामांसाठी मी अजुनही कोणालाही पैसे दिले नाहीत.
पासपोर्ट कींवा घर घेताना ही मी रितसर सर्व नियमाप्रमाणे केले आहे. मी गाडी चालवताना नियम मोडत नाही. लेन चेंज करतानाही मी इंडिकेटर देतो ...
त्यामुळे आपले मत इतरांवर मारु नका .
तुमचे मत तुमच्यापाशी रास्त असतील ..आहेत. परंतु दुसर्यांची मते घेवुन त्यांना स्वताभोवती दिवे ओवाळु नका असे फुकटचे सल्ले देवु नका.
प्रत्येकाची मते ही त्याच्या अनुभवावरुन किंवा दृष्टीकोणावरुन असु शकतात त्यामुळे त्याचा आदर तर सोडा त्याची टर उडवु नका .. आणि स्वताचे आपण बेशिस्त आहोत हे पटवण्यासाठी दुसर्या बेशिस्त नसणार्यांना ते पटवुन देवु नका.
( भाषा हार्ष असेल तर शमस्व , परंतु हे मत मी नगरीनिरंजन यांच्या प्रतिक्रियेवर नाही दिले कारण त्यांनी त्यांची स्वतंत्र मते मांडली आहेत .. आणि मते चुकीची असो कींवा विरुदध मी त्या मतांचा ही आदर करतो .. आपण माझ्या मतांच्या लाईन घेवुन विनाकारण काहीही लिहिले आहे म्हनुन हा रिप्लाय लिहावा लागला ..होप नेट वर कसे शब्द वापरले पाहिजेत हा नियम तुम्हाला माहीत नसेल अआणी तुम्ही तो नियम मानत ही नसताल असे वाटते .. )
शमस्व, वयक्तिक राग नसावा
गणेशा
In reply to मी स्वता बेशिस्त नाही.. by गणेशा
गणेशा जी / राव,
असले प्रतीसाद वैयक्क्तीक घेत जाउ नका. जे काही इथे चाललं आहे ते जनेरिक आहे (आयला मराठी गंडलं राव हिथ). प्रश्न आपण कोण आहोत हा आहे. तुम्ही किंवा मी कोण/कसा आहे हा नाही. मी जे मत दिले आहे ते सगळ्या भारतीयांविषयी आहे. वैय़क्तीक नाही. तुमचा प्रतीसाद हा तसाच आहे असे मी गृहीत धरतो. तसे नसेल तर माझा प्रतीसाद बाद समजावा.
तुम्ही सगळ्या नियमांचं पालन करता, लाच देत नाहीत ह्याबद्दल काहीही दुमत नाही. उलट त्याचा मी आदरच करतो. पण तुमच्या आजुबाजुचे किती जण असे करतात हो? किती जण बाजुला कुणी लाच मागत असेल / देत असेल तर त्याला अटकाव करतात. माझा आक्षेप "मी लाच देत नाही ना? मी नियमांचे पालन करतो ना? मग बाकिचे काय करतात याच्याशी मला काही घेणे देणे नाही." ह्या विचारसरणीला आहे. निधड्या छातीचे वीर असले काही करत असतील असे मला तरी वाटत नाही.
प्रत्येकाची मते ही त्याच्या अनुभवावरुन किंवा दृष्टीकोणावरुन असु शकतात परंतु ती बरोबरच असतील असे नाही.
असो, माझा प्रतीसाद वैयक्तीक नव्हता. तुम्हाला तसे वाटत असेल तर मी आपली क्षमा मागतो.
In reply to गणेशा जी / राव, असले प्रतीसाद by सुक्या
ओके हो.
क्षमा मागावी असे मी म्हंटले नाही. वैयक्तीक नाही घेतले जास्त .
असो.
अवांतर :
खरे तर तुम्ही आता रिप्लाय मध्ये लिहिले आहे ना मी लाच घेत नाही मी नियमांचे पालन करतो बाकीचे काय करतात त्यासाठी मला देणे घेणे नाही हे तुम्हाला आव्डत नाही. ते बरोबर वाटते .
परंतु .. देणे घेणे बाकीच्या अश्या समजाबरोबर ठेवले तर देण्याचे घेणे पडते.
आता तुम्हालाच दिलेल्या रिप्लाय वर तुम्ही जर बेसिस्त पणे उत्तरे दिली असती .. काय कळते तुम्हाला पोकळ बोलता वगैरे वगैरे लिहिले असते तर मी काय केले असते ? बहुतेक काहीच नाही ..(तुम्ही तसे केले नाही त्याबद्दल धन्यवाद )
कारण असे असेल की तुम्ही मी आपण ओलखत नाही कोणाला . ज्यांची ओलख असते त्यांनाही काही चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी खुप परिसिमा गाठावी लागते मग ओलख नसताना आताचय जगात बेसिस्त माणसाला कुठलाही अधिकार नसताना माणुस वटणीवर आनु शकत नाही , वेळ हा ही मौल्यवान आहेच ...
-----------
आपण ढ आहोत. दरवेळेला हाच तमाशा होतो आणि दरवेळेला आपण अशाच चर्चा करतो. त्यातून शिकत काही नाही.
जबराट.
तो काय शब्द होता हो... घासूगुर्जींनी वापरलेला? हां... भाबडा... तसंच वाटतंय... भाबडा आशावाद.
हास्यास्पद.
who am I पुस्तकचि आठवन झालि
अहाहा...सोनियाचा दिनू