आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं
पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव..
सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ?
किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी
किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर,
किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर
किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो
कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो
सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल
पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील
दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल,
नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल
उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं क