पारंपारिक प्रतिस्पर्धी
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.
किस्सा पटवारी का...
धागा प्रेरणा : http://www.misalpav.com/node/17449
गुजरातच्या "भु-खंड संगणकीकरण" बद्दल माहीती देतांना एका अधिकार्याने सांगितलेला हा किस्सा :
एकदा चिफ सेक्रेटरी (राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी) कुठल्याशा दौर्यासाठी एका गावातून जात होते. रस्त्यात काही गाई-म्हशी आडव्या आल्या आणि चुकून एका गाईला त्यांच्या गाडीचा पुसटसा धक्का लागला. झालं, गुराखी लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं आणि भांडायला लागले. ड्रायव्हरने खुप समजावून सांगितलं, की अरे बाबांनो, मोठे साहेब आहेत. अमुक नी तमुक...
विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच..
आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे..
तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली...
सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..
भिऊ नकोस ...
स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."
तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ...
अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन
माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे ....
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."
लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो
लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ...
हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ...
आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..."
गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा
आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ...
दाखवलास मज आरसा माझ्याच भ
सैयॉ निकस गये
सैयॉं निकस गये
नवरा-बायकेतील भांडणे तर आदि काळापासून चालत आलेली आहेत. कधी बायको रुसून बसते तर कधी नवरा घराबाहेर चालता होतो.
बर्याच वेळी हे कपातले वादळ असते. काही वेळाने मिटते; दिलजमाई होते. पण दरवेळी हा तिढा सहजपणे सुटतोच असे नाही. तो नाहीच आला तर मग घरातील नातेवाईक, आजूबाजूच्या आयाबाया जमा होतात आणि.... आणि दोष तिचाच असणार हे गृहीत धरले जाते. तिला जीव तोडून पटवावयाचा प्रयत्न करावा लागतो .... " प्रियकर गेला खरा पण मी काही भांडण काढले नव्हते.
"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"
आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन नामक पंथाच्या पुस्तकाबद्दलचे विडंबन आठवले.
मी आहे एक सामना
मी आहे
मी आहे एक सट्टा
पाच हजार कोटींचा
(सगळे खेळाडू नि बुकी मिळून)
मी आहे एक कमांडो स्क्वाड
काही डझनांचा
(पोलीस बिलिस चिल्लर सोडून )
मी आहे एक खेळ
बावीस जणांचा
(बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून)
मी आहे एक झिंग
मी आहे शिव्यांचा पाऊस
मी आहे टाळ्यांचा कडकडाट
मी आहे एक ईर्षा
मी आहे चढलेला त्वेष
मी आहे दडपलेला द्वेष
मी आहे एक भोळसट प्रार्थना
मी आहे एक करोडोंची संधी
मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी
मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या
मी आहे एक दिवस
काल आणि आजसारखाच.
मी आहे एक सामना.
एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला
(कामधाम बाजूला ठेवून )
प्रतिबिंब
माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात
धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे.
नितळ आणि रिक्त आरशात
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे.
---
माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात
धीरोदात्तपणे प्रतीक्षा करत आहेत.
हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले.
जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात
सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो.
---
आज इथे संतजन लोटले आहेत.
एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत.
त्यांचा आनंद...
काव्यरस
मिसळपाव
