Skip to main content

चैत्य-भुमी की दादर आणि नामान्तरचा घोळ !!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी गुरुवार, 02/06/2011 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्य-भूमीला कसली मरणाची गर्दी होती यार ! अरे भैईया वो चैत्यभुमी मे उतरके चौपटीके चैत्यभुमी कोनसी बस जाती है ! चैत्य-भूमीच्या ब्रीजवर आलोकी गर्दिने धडकी बसते ! ---------------------------------------------- अशी वाक्य आता सहज एकू येऊ लागतील , दादर स्थानकाच चैत्य-भुमी नामकरण करण्याचा मानस काही दादा मंडळींनी जाहीर केल्यापासून अनेक आठवणींना उजाळा मिळाला. मराठवाडा विद्यापीठाच नामांतर काय किवा वी-टी ते सी-एस-टी काय प्रत्येक नामांतर कालांतरांनी स्वीकारले गेले , तस कदाचित हे ही स्वीकारले जाईल.

गंमतच आहे

लेखक शरद यांनी गुरुवार, 02/06/2011 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
झाडातून झाड ? आपणा सर्वांना बांडगुळे माहीत आहेत. एका झाडाच्या फांदीतून उगवलेले दुसरे झाड. बांडगुळ मूळ झाडाच्या फांदीतून अन्नरस शोषून घेते व स्वत : वाढते. पण तुम्ही अशी झाडे पाहिली आहेत कां की जात दोनही झाडांची मूळे जमीनीत आहेत पण एका झाडाचा बुन्धा दुसर्‍या झाडाच्या बुन्ध्यातून वाढला आहे व दोनही झाडे चांगली वाढलेली आहेत ( व अजूनही वाढत आहेत) ? अशी दोन झाडे पुणे विद्यापीठाच्या आवारात आहेत. मुख्य इमारतीच्या शेजारच्या हिरवळीच्या कडेला एक चांगले ३०-४० फूट उंचीचे गुलमोहराचे झाड आहे. व त्याच्या बुन्ध्यातून दुसरे पिंपळाचे झाड उगवले आहे. पहिल्या चित्रात दोनही झाडे लांबून दिसतात.

तसा प्रत्येक दिवशी मून येतो

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 02/06/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चित्तरंजन यांची अप्रतिम गझल तसा प्रत्येक वर्षी जून येतो तसा प्रत्येक दिवशी मून येतो तझ्या वाचूनही हनिमून येतो फिकटसे चेहरे स्मरतात काही पुन्हा नोस्ताल्जिया गडदून येतो कुणी नाही, कुणी चिटपाखरूही अशा वाटाच मी पाहून येतो कुणी आहे तिथे, बेचैन आहे किती आवाज हा आतून येतो तिच्या मौनातली उद्गारचिन्हे असा का हा बरे थांबून येतो? कसे सांगू तिला मी काय होते इथे कोणी कधी सांगून येतो? हवेला हुंगतो मी आणि म्हणतो अरे हा वास गुत्यातून येतो मला ढोसायचे नसते तरी पण तिथे, जातो पुन्हा ढोसून येतो!! स्वतःचा भार सोसेना स्वतःला किती हा देह ओथंबून येतो अ

कावळे ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 01/06/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाहावे तिथे फ़क़्त दिसतात कावळे ... कुणी आंधळे तर कुणी पांगळे अरे हीच मायभूमी जिने दिले मावळे ... चालती अनंत भक्त पाहण्या रूप सावळे नुकताच मेलो आहे मी, आहे पिंड कोवळे ...
काव्यरस

जो तो येतो मारून जातो

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 01/06/2011 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
जो तो येतो मारून जातो जो तो येतो मारून जातो, जो तो येतो त्याला खेळून जातो, बोलत नाही गरीब बिचारा मुका तो तर तेव्हा करतो काय? जेव्हा बॉलला बॉलर लावतात थुका ||धृ|| तो हातात धरून जोरात चोळतात त्याला वरती फेकून खाली झेलतात पायी घासून घासून पायी घासून घासून रंग त्याचा जाईल बरका!

मी बत्तासा गोल गोल

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 01/06/2011 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी बत्तासा गोल गोल तो: नको भांडण तंटा नको त्या बारा भानगडी नको झगडा करू अन नको कोणती लफडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||धृ|| तो: लक्ष्मी आहे तू ग माझी अन नारायण मी ग तूझा शोभणारा जोडा आपला नाही संशय कसला त्याचा सारं गाव बोलेल ही फार गुणी आहे जोडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||१|| ती: राग हो कसला प्रेम हे आहे माझे तुमच्यावर तुमची मी अन माझे तुम्ही झाले लग्न झाल्यावर उगाच नका राग कसला धरू आता तुम्ही मनी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे तुम्ही बत्तासा गोल गोल अन मी तुमची गोड रेवडी ||२|| तो: वागू

Tiramisu (Italian Dessert) - तिरामिसु

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 01/06/2011 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तिरामिसु बिस्किट्स (French Fingers) किंवा Sponge cake पण वापरु शकता. Mascarpone Cheese - २ Packets पिठीसाखर - १ १/२ कप अंडी - ६ Cognac किंवा Rum - ४ चमचे कॉफी - ४ चमचे कोको पावडर - ४ चमचे व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब कृती: १. चीज हे normal temp ला आणावे. Cheese २. अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करावे. ३.

भ्रष्टाचाराचे मूळ

लेखक विकास यांनी मंगळवार, 31/05/2011 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अभ्यासानुसार भारताचा भ्रष्टाचाराचा इंडेक्स हा ३.३ आहे. जितका हा इंडेक्स शून्याच्या जवळ तितका वाईट तर जितका १० च्या जवळ तितका चांगला असतो. अर्थात एकूण प्रतिमा ही भ्रष्टराष्ट्राची आहे आणि आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ती सहनही करत असतो आणि काही अंशी सहभागीदेखील होत असतो. भ्रष्टाचाराचे मूळ कशात असते? मला वाटते, भ्रष्टाचार देखील अश्वत्थवृक्षा प्रमाणे, "वरी मुळे खाली फांद्या" असाच असतो. अर्थात तो वरून खाली येऊ लागतो. त्याची सुरवात सत्ता टिकवण्यापासून होते.

ताळेबंद

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 31/05/2011 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
चालले मी परी विखुरल्यात इतस्ततः जाणीवभर लहानथोर माझ्या खुणा पदोपदी जाणवताना मिळेल आठवांना उजाळा शब्द - नात्या विरहीत आपला भावबंध आगळा नसणारे मी, एक शाश्वतय, मान्यय मला मनातला ठाव माझा अशाश्वत ठरणार का ? होते खरच ना मी इथलाच भाग अविभाज्य ? पानगळीइतकचं शुल्ल्क होतं माझं अस्तित्व ? आजर्पंतच्या असण्यावर प्रश्नचिन्ह उमट्लेलं जमाखर्चाच शेवटचं पान ताळेबंद विसरलेलं
काव्यरस

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 31/05/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखात तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळ्ते माझे अंतरंग होत असंही कधी कधी कि न कळे कसे काय ?