Skip to main content

कासचे पठार आणि आमचं हे वरातीमागुन आलेलं घोडं

लेखक झकासराव यांनी सोमवार, 14/11/2011 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ... कासच पठार अफाट आहे.

मन्वंतर: एक दृष्यकथा

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 14/11/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तीची दृष्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातीव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टीस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात.

आपली तर काय.....

लेखक वपाडाव यांनी सोमवार, 14/11/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपली तर काय लायकीच नाय तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... .................तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय
काव्यरस

आग्निपरीक्षा

लेखक गार्गी_नचिकेत यांनी सोमवार, 14/11/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे, बाल्य, तारुण्य, वर्धक्य तीन अन्कन्चा हा खेळ, कोणा द्यावा किती वेळ हे तो ठरवतो काळ. देह सोडुन जाताना प्राण क्षणार्धात जातो, मागे राह्णारा मात्र दु:ख आजन्म भोगतो. का ही अग्निपरीक्षा चान्गल्याच्या माथी येई, तरण्याला आता देवा सीतेचेच बळ देई.
काव्यरस

एक स्वप्न आहे

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 14/11/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्वप्न आहे एक स्वप्न आहे तुला खळखळून हसताना पाहणार तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू बनून गालावर वाहणार एक स्वप्न आहे तुला हळुवार कवेत घेणार सोबतीने तुझ्या मला प्रीतीत चिंब भिजवणार एक स्वप्न आहे तुझ्या भविष्यात हरवणार तू दूर असताना मात्र आयुष्य शून्य जाणवणार एक स्वप्न आहे तूच सार जीवन बनून संगतीने तुझ्या जगणार तुझ्याच डोळ्यांनी स्वप्न पाहणारं एक स्वप्न आहे ...... यशवंत

बौद्धांचे त्रिरत्न: उगम: नक्की कसा, कोठे?

लेखक चित्रा यांनी सोमवार, 14/11/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ली यांच्या शैलगृहावरील चित्रमय लेखामुळे या लेखास प्रेरणा मिळाली आहे. संशोधन पूर्णपणे जालीय माहितीवर आधारित आणि अर्धवट आहे, म्हणून जास्त लिहीण्यापेक्षा चित्रे देऊन काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त एक टीपः माझ्या मते असे लिहीलेले असेल तेथे माझ्या "सध्याच्या" मते असे आहे असे धरून वाचावे (माझे पूर्वीचे मत थोडे वेगळे होते, हे आलेच). उपलब्ध माहिती प्रचंड आहे आणि वाचन त्रोटक आहे. घाईत लेख टाकल्याने त्यात बर्‍याच उणिवा आहेत. तेव्हा हे मत खरेच मान्य करण्यासारखे आहे का यावरून चर्चा व्हावी.

...खरच जमलंय !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 14/11/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
जमलंय मला सावरायला उसने अवसान आणायला.. आणि उगीचच हसायला... ...खरच जमलंय.... नात्यांच्या ह्या गोत्यातून स्वताचे भावविश्व आकारायला सगळ्यांमध्ये असूनहि सगळ्यांपासून दूर जायला ---खरच जमलंय... जमलंय डोळ्यांना खरंच पाणी अडवायला ... जमलंय शब्दांना खरंच अर्थ बदलायला .... त्या पाण्याचे, शब्दांचे कौतुक करायला ... ...खरच जमलंय मला..... अर्थातली निरर्थकता ...... निरर्थकतेतला अर्थ सांगायला खरच जमलंय या शब्दांना कविता सजवायला ..... निखळलेले शब्द मांडायला आणि वाह वाह मिळवायला .....खरच जमलंय

युगलगीतः आज पाहणार आहे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 14/11/2011 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.) तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१|| ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२|| तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो ती:
काव्यरस

किसमिस

लेखक लीलाधर यांनी रविवार, 13/11/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.
काव्यरस