Skip to main content

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 01/12/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
रिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे. त्याबाबत त्यात इन्वॉल्व असलेल्या स्टेकहोल्डर्सच्या दृष्टीकोनातून काय परिणाम होतील हे मांडले आहे. [या प्रस्तावात मॉल्समधील उच्चभ्रू दुकाने- उदा. स्वरॉस्की, रीबॉक, फास्ट्रॅक, ग्लोबस, जिली, तनिष्क वगैरे विचारात घेतलेली नाहीत]. (मोठ्या शहरांतील) मध्यमवर्गीय ग्राहकाच्या दृष्टीने: सध्याच्या व्यवस्थेत एका लांबलचक पुरवठा साखळीतून ग्राहकाला माल मिळतो.

एकदा वाटलं कविता करावी...

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 01/12/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा वाटलं कविता करावी... सोप्पं तर असतं.. 'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट', त्यात काय एवढं... जमेल की आपल्यालाही एवढे काय आपण 'हे' आहोत... थोडे छान, थोडे दुर्बोध, थोड रुपकात्मक,थोडे तरल, काही मात्र अगदीच वास्तव लिहू आपण चार शब्द... मात्रा देखील जमतीलच की, वृत्त थोडी अडखळ्तील ही, कवयत्रिचे देउन नाव, निभावून ही जाईलच की... मग वाटले नको असे, मग वाटले नकोच ते, मिळेल फटका, होईलही कौतुक, पण कशाला हवे जोडायला आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना..... ( इतरत्र पूर्वप्रकाशित)
काव्यरस

चर्चाविषय विदेशी थेट गुंतवणुक...

लेखक कोदरकर यांनी गुरुवार, 01/12/2011 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने रिटेल व्यापार क्षेत्रात ५१% परदेशी गुंतवणुक करण्यास मान्यता दिल्यामुळे सद्ध्या आपल्या देशात या योजनेच्या दुरगामी परिणामांची चर्चा चालु आहे.. दोन्ही बाजुच्या बाबी लक्षात घेता काही विचार करण्यासारख्या गोष्टी १) मोठया प्रमाणात गुंतवणुक आल्यामूळे देशातील पायाभूत सुविधा मध्ये वाढ, शीत केंद्र, गोदाम बांधणी २) स्पर्धेमुळे भाव वाढ नियंत्रण ३) छोट्या शहरातील व्यापारी संरक्षण ४) सरकारी कर रुपी उत्पन्न विरोधी मुद्दे १) व्यापारी म्हणुन येणार राज्यकर्ते बनणार २) संस्क्रुति अतिक्रमण ३) छोटे व्यापारी यांचा असुरक्षित ४) स्थानिक उद्योग धोक्यात वरील मुद्दे पाहता माझे सध्याचे मत तरी निर्

पालक वडी

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 01/12/2011 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पालक - १ जुडी बेसन - १/२ कप तांदुळाच पीठ - ३ चमचे आले-लसुण पेस्ट - १ चमचा हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/४ चमचा हिंग - १/४ चमचा ओवा - १ चमचा तिळ - १ चमचा तेल - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. पालक धुवुन १ तास निथळत ठेवावा. जितका जास्त कोरडा करता येईल, तेवढा कोरडा करुन घ्यावा. २. पालक बारीक चिरुन घ्यावा. ३. त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, आले-लसुण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, हळद, ओवा, लाल तिखट, गरम मसाला, तिळ व चवीनुसार मिठ टाकावे. ४. हे पीठ निट मिक्स करावे. हे करताना पालकाला पाणी सुटल्यामुळे पीठ ओले होते. ५.

मनातली घालमेल

लेखक सचिन भालेकर यांनी गुरुवार, 01/12/2011 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
विषय थोडा वेगळा असेल कदाचित............... माझी चुक नसताना पण माझ्याकडुन खुप मन दुखवली जाणार असेल तर................ माफी कशी मागावी हेच समजत नाहिये............... मदत हवी आहे तुमच्या सल्ल्याची..............

गोटीपुअ

लेखक आळश्यांचा राजा यांनी गुरुवार, 01/12/2011 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे. या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ". हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार? गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे.

जालरंग प्रकाशनातर्फे आवाहन

लेखक पैसा यांनी बुधवार, 30/11/2011 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
(जालरंग प्रकाशनातर्फे हिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.) दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत... साहित्य कोणते असावे? साहित्याला विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल..

गफलत ! ( भाग १ )

लेखक चाफा यांनी बुधवार, 30/11/2011 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणाचा अभ्यास हा माझा एकेकाळचा छंद पण आता तोच माझ्या पोटापाण्याचा उद्योग झालाय. सध्या मला एक नाणावलेला पुराणवस्तु संशोधनकर्ता म्हणुन मान्यता मिळायची वेळ आलिये. पण मी नुसताच पुराणवस्तुंमधे गुंतुन पडलेला नाहीये. माझे आवडते मत म्हणजे ‘पुराणातली वांगी पुराणात ठेउ नका’ कारण त्यात बरचसं तथ्य असतं हे आता शास्त्रसुध्दा मान्य करत. निव्वळ दंतकथा म्हणुन आपण कानाडोळा करतो पण मुळात या दंतकथा तयार कशा होतात? आपल्याकडे म्हणतात ना ! ‘आग असल्या शिवाय धुर निघत नाही’ तसा विचार एकदा करुन पहा,............