तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एक
फार-फार पूर्वी अयोध्येत सत्यव्रत नावाचा राजा राज्य करीत असेल. त्याचा राज्यात सुख, समाधान आणि शांतता नांदत होती. त्याला काहीही कमी नव्हते. एकदा नारद मुनीं कडून स्वर्गाचे वर्णन ऐकले होते. त्या दिवसापासून एकदा तरी स्वर्गाची वारी केली पाहिजे, देवराज इंद्रासोबत सोम पान करावे, रंभा, उर्वशी यांचा नृत्याचा आनंद घ्यावा. वेळ मिळाला तर इतर देवतांसोबत आपल्या पुण्यवान पूर्वजांचे दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करावे. ही इच्छा त्याचा मनात घर करू लागली. पण स्वर्गात जाणे सोपे नव्हते. एखादा पुण्यात्मा मृत्युनंतर स्वर्गात जातो. पण त्या वेळी ही आपल्या तपोबलाच्या शक्तीने काही ऋषि-मुनी सदेह स्वर्गात येत-जात असे.
Sichuan Sweet & Sour Prawns
ही पाककृती मी युके गुडफुड चॅनलच्या चायनीज फुड इन मिनिट्स मध्ये पाहीली होती, बनविण्यास सोप्पी आहे :)
साहित्य:
२०-२५ किंग प्राँस साफ करुन, दोरा काढून घेतलेल्या
१ अंडे
५ टेस्पून टोमॅटो केचअप (आबंटपणा व आवडीनुसार कमी-जास्तं)
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
१ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
२ लाल मिरच्या बारीक चिरून (थाय स्वीट चिलीज)
बारीक चिरलेली कांद्याची पात
४-५ टेस्पून कॉर्नफ्लोअर (मुळ पाककृतीत बटाट्याचे पीठ वापरले होते)
१ टेस्पून तिरफळं (Sichuan peppercorns , आवडीप्रमाणे कमी-जास्
मत आणि मु*
आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/24432
मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान
मत मिळताच नेते टांग वरती करीती
खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती
पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी
कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली
मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही
की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही
मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही
असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही
पैजार ठाकरे
निमित्त फक्त एका भेटीचे
निमित्त फक्त एका भेटीचे
परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर.
निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.
अंड्याचे फंडे ५ - शर्यत
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.
मँगो - गुलाबजाम चीज केक
साहित्यः
१. तयार गुलाबजाम - १० (३ बाजुला वगळावे)
२. चक्का - १ कप
३. २०० ग्राम क्रीम चीज (मिळालं तर उत्तम नाहितर पर्याय म्हणुन आपलं पनीर आहेच :D)
४. मॅंगो पल्प - १ कप (ताजा आमरस वापरण्याआधी मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित)
५. १.५ वाटी मारी किंवा कुठल्याही डायजेस्टीव्ह बिस्किटांचा चुरा
६. २-३ टेस्पून कडेंन्स्ड मिल्क
७. साखर, मध, कडेंन्स्ड मिल्क किंवा गुलाबजामचाच पाक (रसाच्या गोडीप्रमाणे कमी-जास्त)
८.पुन्हा एक पी आय ए अपहरण
पी आय ए- पी के ३२६ अपहरणाचे प्रकरण आपण काही दिवसांपुर्वी वाचले असेलच आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच आणखी एका विमान अपहरणाची कथा पाहू. पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच घटनेची चर्चा करण्याचे कारण ही घटना वेगळ्या परीस्थितीत घडते आहे आणि तीला अतिशय वेगळ्या प्रकाराने हाताळले गेले आहे.
२५ मे, १९९८ रविवारची संध्याकाळ, सुमारे ५.३० वाजता गदर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पी.के. ५४४ या विमानाने कराचीच्या दिशेने उड्डाण केले. पुढील १० मिनिटांत या विमानीतील तीन अपहरणकर्त्यांनी विमानावर ताबा मिळवला आणि विमान नवी दिल्लीकडे घेऊन जाण्यास फर्मावले.
सैर भैर
हि १९९१ सालची गोष्ट आहे
मी डॉकयार्ड दवाखान्यात रात्रीच्या तातडीच्या सेवा विभागात कामावर(ड्युटी) वर होतो याचा एक भाग म्हणून आय एन एस आंग्रे मध्ये असलेल्या नौदल पोलिसांच्या कोठडीला भेट देऊन तेथे असलेल्या कच्च्या कैदेतल्या सैनिकांची तपासणी करणे हा होता. अशा तपासणीच्या वेळी मी हटकून प्रत्येक सैनिकास का अटक झाली आहे? काय परिस्थितीत ते झाले आहे याची शहानिशा करीत असे.( मनोविकार शास्त्रात काम केल्यामुळे मला त्यात जर जास्त रस होता). असे त्या कोठडीतील सैनिक पाहत असताना एक संभाजी माने( किंवा जाधव असेल )वय २५ वर्षे या सैनिकासमोर आलो.
दादांना झालय तरी काय???
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली.
त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms
अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे.
मिसळपाव