Skip to main content

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 11/05/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
.

लाजुनी पाहिले ना रोखून पाहिले
तूज ग्रंथाप्रमाणे वाचून पाहिले

वाढला हा दुरावा स्नेहात का तुझ्या
लाख गुन्हे तरी मी झाकून पाहिले

साथ देण्यास माझे मी हात जोडले
मख्ख मुद्रेत त्याने त्रासून पाहिले

क्रोध ताब्यात माझ्या मी आणतो म्हणे
चांदणे मस्तकाला घासून पाहिले

नम्रता रोमरोमी भिनते म्हणून मी
गाढवांच्या पुढेही वाकून पाहिले

किवी आणि कांगारूंच्या देशांत ०७ : क्विन्सटाउन - ग्लेनॉर्कीचे मंतरलेले चैत्रबन आणि गोंडोला

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 11/05/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

कर्माचरण

लेखक Bhagwanta Wayal यांनी शुक्रवार, 10/05/2013 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥ जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला । दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला। नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥ उपवास केले नाना नवस सायास । लागला ना कधी देवा तुझा निजध्यास। मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥ ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन । आवरेना तरी माझे चंचळ मन । केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥ वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण । नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण। भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी । आयुष्य हे निघोनिया गेले

सन्मान

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 10/05/2013 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे कधी करतो सलगी, बोचर्‍या जुन्या क्षणांशी वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
काव्यरस

शोध

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 09/05/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे . . बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले . . काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो असेल असेल :) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)

हवं असं कुणीतरी

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 09/05/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात शोधात अशा मी प्रेमा तुझ्या ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ? ना कधी सोडून जाईन ना अंतर तुला मी देईन वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द , नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ, तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ एकट्याने जगणे नाही हे इतके सोपे एकमेकांवर अवलंबून जगण्यात देखील वेगळीच मजा असते " काळजी करू नकोस , आहे मी " असे एकच प्रेरणादायी वाक्य अनेक अडचणींना सामोरे जाणे होते ज्याने शक्य पटेल तुला हे नक्की कधीतरी तेव्हा तू ही म्हणशील , हवं असं कुणीतरी -- प्रिया

असुर कोण ? (२)

लेखक शरद यांनी गुरुवार, 09/05/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
असुर कोण ? (२) भारतात जी परिस्थिती होती ती युरोप, आफ़्रिका, मध्य आशिया, चिन सगळीकडे सारखीच होती. आर्य व असुर बरोबर रहात होते. त्यांच्या देवता, आचारविचार, आराधना सगले जवळजवळ सारखेच होते. त्यातील काही आर्य-असुर भारताकडे गेले. काही तेथेच राहिले. चार-पाचशे वर्षांनी भारतातले काही अनार्य परत पश्चिमेकडे परत फिरले. पण आता त्यांना आढळले की स्थानिक असुरांमध्ये बराच फरक पडला आहे. आता "इंद्र" ही प्रमुख देवता नाही. आता तेथे "विरोचन" प्रमुख देवता आहे. अजुनही दोघे वरुण, सूर्य, अग्नी यांना पुजत होते. अहुरमझ्दा (महान असुर) हाच पुढे असुरांचा इन्द्र झाला. म्हणजे देव-असुर यांच्यात फरक पडावयास सुरवात झाली होती.

मग पुन्हा सामसूम...!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 09/05/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी निवांत, निर्मनुष्य ठिकाण..निवांत पहुडलेल्या रेल्वे लाईनी... त्यांचा एकमेकींशीही काही संवाद नाही.. दिसभर बोलणार तरी काय एक-दुसरीशी आणि किती? एकाकीपणा.. अगदी तासंतास...! आणि मग अचानक एक उत्साहानं भरलेलं धावतं विश्व येतं.. विलक्षण उत्साह.. विलक्षण गती.. ! नानविध लोकांनी भरलेलं, गजबजलेलं एक धावतं विश्व.. कोण आहेत ही नानविध लोकं? ती द्योतक आहेत..

मध्य वयातील वादळ -पुढे

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 09/05/2013 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ----------------- काही गोष्टीत आपल्या मित्रांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन आपण पुढे जात आहोत. चीड चीड कोणी स्वतःहून करीत नाही तर चिडचिड हि होते.

पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 09/05/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते. असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश. असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ