Skip to main content

झुक्या चे अभंग

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 16/09/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मांडीयेला फेसबुके घाई, नाचती फेसबुके भाई रे क्रोध अभिमान भिने त्यांच्या मनी, एक एका पकडति गळा रे कुणी धर्माभिमानी, कुणी पुरिगामी. द्वेशाच्या माळा, लाईक्स मिरविती गळा शिव्या शापाची घाई, गाली वर्षाव, अनुपम्य फेसबुक सोहळा रे वर्ण अभिमान मिरवति जाती, एक एका लोटांगणी जाती भेसळ चित्ते झाली नवसागर, पाषाणा हृदयी कलहती रे होतो जयजयकार गर्जत फेसबुक, मातले हे फेसबुके वीर रे झुक्या म्हणे सोपी केली पायवाट, समाज नेई स्मशान घाट रे.. अवि

शिवबाचि तलवार

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 16/09/2013 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
शिवरायांची भवानी तलवार चाले - जिने हिंदुधर्माचे रक्षण केले , निराधार प्रजेला संरक्षण दिले निष्पाप प्रजेला भयमुक्त केले. बलाढ्य औरंगजेबाला भयग्रस्त केले , अशी ही शिवरायाची भवानी तलवार चाले . मोगलाई बरखास्त झाली, स्थापला महाराष्ट्र धर्म , लोकशाहीची तुतार फुंकली , सरंजामशाहीच्या अन्याया विरुद्ध बंड पुकारले , अशी ही शिवरायाची भिवानी तलवार चाले . बलाढ्य अफजल खानाचा वध झाला,झाले शीर धडा वेगळे , प्रराक्रमी किती ते शिवराय अन मावळे , किती एक गड किल्ले काबीज केले. अशी ही शिवरायांची भवानी तलवार चाले .

नर्मदेच्या खो-यातून ....(२)

लेखक आतिवास यांनी सोमवार, 16/09/2013 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुनर्वसन नेमकं किती कुटुंबाचं करायचं यामध्ये अजून घोळ आहेत. ‘घोषित’ कुटुंबांची मध्य प्रदेशमधली संख्या आहे ५२५७; पण यात सरकारने ‘वयस्क पुत्र’ (१८ वर्षांवरील मुलगे) धरलेले नाहीत. यातही सरकारने आकड्यांचा खेळ केला आहे. उदाहरणार्थ भिताडा गाव प्रत्यक्ष पाण्याखाली गेलं ते २००६ मध्ये पण तिथलं ‘कट ऑफ’ वर्ष आहे १९९३. म्हणजे १९९३ ची कुटुंबं २००६ सालीही तशीच आणि तेवढीच राहायला हवीत सरकारच्या मते. मुलगे मोठे होणार, त्यांची लग्न होणार, त्यांना मुलबाळं होणार, ते वेगळं घर करणार – या शक्यता सरकारने कधी गृहित धरल्याच नाहीत!

डिजिटल

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 16/09/2013 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
डीजीटल ................................................................................. "नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी? शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची." पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता. अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता. चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला. "ते बामन आला नाय बे अजून. बोर्डावरला मायना तर त्येच लिव्हतय ना.

कल्लोळ..!!

लेखक राघव यांनी सोमवार, 16/09/2013 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळजाला समेचा दिलासा.. मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला! तसे बंध कुठले-कधी जाणिवेला ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला! नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला.. असे काय होते उरी प्राक्तनाच्या.. अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..! अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले.. मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!! राघव
काव्यरस

झिम्माड पाउस...

लेखक K Sangeeta यांनी रविवार, 15/09/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
झिम्माड पाउस... अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झिम्माड पावसाला झाली सुरुवात ... भेटण्यासाठी अधीर झाले समुद्रकिना-यावर धावत गेले... तुफान सरी बेभान वारा बेधुंद झाला आसमंत सारा... अंगाशी झोंबत होता लडीवाळ वारा... मस्तीत स्पर्शून जात होत्या फेसाळणा-या लाटा... बेधुंद होउन मी मजेत गात होते... लाटांच्या संगीतावरही थिरकत होते... मनाला चिंब भिजवणा-या पावसात मनसोक्त भिजावेसे वाटत होते...

ओरिसा : २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 15/09/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिसा : २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा १५-११-२०११. आता वेध लागले होते ओरिसाचे. तिथल्या नागरी मंदीरस्थापत्यशैलीतल्या ‘रेखा देऊळ’चे. जालावरून, इथून तिथून सचित्र आणि चित्रविचित्र माहिती काढून सर्व सदस्यांना चित्रांसह वाचायला दिली होती. त्यमुळे सर्वांची उत्कंठा वाढली होती. गणपती, नवरात्रांचे धूमधडाक्याचे दिवस नेहमीप्रमाणे वाजतगाजत आले आणि गेले. दिवाळी पण नेहमीप्रमाणे वाजतगाजत आली आणि गेली. दिवाळीचे कवित्व केव्हाच संपले होते. सहलीबद्दल ज्याला ज्याला कळे तो पहिला मलाच उलट सुनवायचा. अरे मूर्खा, रायपूर ओरिसात नाही, छत्तीसगडमध्ये आहे. आणि ओरिसात आहे काय बघण्यासारखे? नेहमी आपले पूर नाहीतर दुष्काळ?

ओदिशा - १ : पूर्वरंग

लेखक सुधीर कांदळकर यांनी रविवार, 15/09/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा : १ : पूर्वरंग एकदा अचानक नव्या मुंबईतला आमचा मित्र बाळ्या टेलर ऊर्फ टकल्या आणि त्याची सौ. प्रियांका ऊर्फ जखीण पुण्याला आमच्या घरी आले. अर्थात आयत्या वेळी अगोदर दूरध्वनी करून आम्ही घरी आहोत की नाही याची खात्री करून. जखीण फार म्हणजे फारच रागावली होती. तिचा आणि आमच्या सौ. चा वाढदिवस दोनतीन दिवसांच्या अंतराने येतो. "२०१० मध्ये दोन्ही वाढदिवस कुठे तरी दूर, रम्य अशा पर्यटनस्थळी साजरे करावेत, तेव्हा ताबडतोब पर्यटनाचा आराखडा काढा, कुठेही दूर तुमच्या आवडत्या स्थळी; अशी तिने दीडेक वर्षापूर्वी सूचना केली होती." जखिणीचीच सूचना ती! पाळायलाच पाहिजे. आराखडा न बनवून मी सांगतो कोणाला?

हिवाळ्यातला स्वित्झर्लंड

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 15/09/2013 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्वित्झर्लंड या देशात भर उन्हाळ्यात बर्फाच्छादित हिमशिखरे असणार्‍या जगातल्या फार थोड्या पर्वतराजींपैकी आल्प्स पर्वत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही या देशात बर्फ आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदर्‍या यांचा संगम असलेले निसर्गाचे रूप पाहायला मिळते.शिवाय कडक हिवाळ्याचा धसका असलेल्या बहुसंख्य प्रवासी मंडळींनाही स्वित्झर्लंड म्हटले की उन्हाळ्याची सफरच बरी वाटते. परंतू स्वित्झर्लंड त्याच्या अनेक नैसर्गिक हिमद्यांवर आणि मानवनिर्मित सोयीने तयार केलेल्या ठिकाणांवर उपलब्ध असणार्‍या अनेक हिवाळी खेळांसाठीही जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे तो देश वर्षभर प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो.

राणीछाप पैसे कुठे गेले?

लेखक उद्दाम यांनी शनिवार, 14/09/2013 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देशात लंडनच्या राणीबाई छापाची नाणी आणि नोटा होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचे चलन बदलले. राणीछापी पैसे बदलून एका रात्रीत आपले पैसे कसे आणले गेले? लोकांच्याकडे जे पैसे होते ते त्यान्नी कसे बदलले? याबाबत नेमका जुन्या लोकांचा कसा अनुभव होता? लोकांकडून जुने पैसे घेऊन नवीन पैसे दिले काय? मग ते जुने पैसे घेतले त्याचे सरकारने काय केले? नवीन पैसे लगेच कसे छापले? इ .इ इ. याबद्दल कुतुहल आहे. त्याच्या चर्चेसाठी हा धागा. ( जुन्या पैशाचे फोटू असतील तर इथे दाखवायला लाजू नये. )