कल्लोळ..!!

राघव जे न देखे रवी...
कधी काळजाला समेचा दिलासा.. मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला! तसे बंध कुठले-कधी जाणिवेला ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला! नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला.. असे काय होते उरी प्राक्तनाच्या.. अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..! अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले.. मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!! राघव
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

13 टिप्पण्या 2,175 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

निरन्जन वहालेकर नवीन

" नको तेच कडवे मनी आळविले! हृदया ’कळा’या तरी वेळ गेला " सुरेख ! आवडली कविता ! !