Skip to main content

धर्मगंड

लेखक संदीप ताम्हनकर यांनी बुधवार, 02/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
I धर्मगंड I I धर्माच्या गायीचं काढा दुध I I वाटणारे आपणच याची असुदे शुद्ध I I द्या थोडे थोडे काहींना, पळीपळीने I I बाकी सगळ्याची पंचपात्रातून आचमने I I घेऊन जा पुन्हा एकदा पुराणात I I खात बसुदे प्रसादाचा पवित्र वांगीभात I I करू जानव्याचा इंटरनॅशनल ब्रॅन्ड I I कुरवाळत बसू धर्माचे बेंड I I ब्रम्ह गाठीत मोठी शक्ती असते पहा I I मारू मुठ्ठ्या - ओम फट्ट स्वाहा I I जाज्वल्य अस्मितेचं वगैरे एक बरं असतं I I स्वतःचं काही कर्तृत्व नसलं तरी चालतं I I जातीत जन्माला तर तुझं काय त्यात I I काढा मग जन्म-जन्मान्तरं, पुण्य आणि पाप I I वर्तमानशून्य आणि भविष्य अज्ञान्यांना I I काल्पनिक भूत काळाचाच तर आधार

बैलगाड्यावरून सुपर संगणक, एअर पोर्ट ते tifr मधे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 02/09/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
“ज्या देशात अजून बैलगाड्या व्यवहारात आहेत त्या देशात सुपर संगणकसुद्धा व्यवहारात येत आहे”. व्हॅक्युम ट्युब्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फर्स्ट जनरेशन संगणक म्हणतात.उदा.tifrac संगणक. 1942-54 ट्रान्झीस्टर्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे सेकंड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cdc-3600 संगणक.1952-64 इंटीग्रेटेड सर्किट्स वापरून उपयोगात आणलेले संगणक हे थर्ड जनरेशन संगणक म्हणतात.उदा.cyber 175 संगणक 1964-72 व्हेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट्स (vlsi) वापरून उपयोगात आणलेले संगणक हे फोर्थ जनरेशन संगणक म्हणतात.

अडगळीतला इतिहास

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 02/09/2015 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
अडगळीतला इतिहास !!! परवा जुन्या अडगळीत, मनाच्या एक जुने पुस्तक सापडले, इतिहासाचे जर धूळ झटकली त्यावरची अन मग जरा बाजूला वळून पहिले मागच्या बुक शेल्फ वर अजून काही पुस्तके होती इतिहास सांगणारी दोन्ही पुस्तके इतिहासाचीच, पण एक सनावळ्या मध्ये अडकलेले अन एक मात्र वर्तमानाचे अस्तित्व सांगतच भविष्याचा हि वेध घेणारे अभ्यासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज, अन झाशीची राणी एखादा धडा किंवा चार ओळी अन जमलच तर एखादे चित्र इतक्यातच संपून जातात आग्र्याहून सुटका किती कष्टाची आणि जीवावर बेतलेली होती आणि "मेरी झांसी नाही दुंगी" म्हणायला किती मोठे जिगर पाहिजे हे आम्हाला माहीतच नाही , कारण आम

वांझ

लेखक यमन यांनी बुधवार, 02/09/2015 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा मी " श श क " स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती . शब्दसंख्या अंदाज न आल्यानी अंमळ गंडली होती. पण आता कुठले शब्द उडवू तेच समजेनासं झालंय. वांझ सूर्य झाडाच्या पायाशी पेटायचा आणि कमरेशी विझायचा ;रोज ;रोज ;गेली कित्येक वर्ष . त्याचं झाडाला कसलं अप्रूप असणार ? स्वतःचा अपूर्ण ;शुष्क ; जमिनीत खोलवर रुजलेला संसार घेऊन झाड जगत होतं . जगण्यात कुठला सोहळा नाही ;मरणही येत नाही .अगदी एकटं . पानं ;फुलं ;फळं एवढंच काय पावसाळ्यातलं शेवाळ पण झाडावर बहिष्कार टाकून होतं . गर्भारिणी ; पहिलट करणी झाडाची वाट शक्यतो टाळायच्या .

एक अनुभव - २

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 02/09/2015 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुभव अश्विता काय होतेय? बर वाटत नाही आहे का?...शेजारीच उभ्या असलेल्या काकांनी विचारल.. पण अश्विता काहीही न बोलता जोरजोरात हुंकार भरू लागली.. सुनील तुझ्या पोरीला धरलान र कुणीतरी.....गर्दीतून एक अनुभवी आवाज आला.. एव्हाना अश्विता सगळीकडे डोळे मोठे करून पाहू लागली होती, अस्पष्ट घोगर्या आवाजात ''मला सोडा, सोडा मला'' अस ओरडू लागली. .. बाळा जा जाऊन पटकन खालच्या अळीच्या शिर्या काकांना बोलाव...अस बोलून काकांनी एका लहानमुलाकरवी सांगावा धाडला. थोड्याच वेळात तो मुलगा शिर्या काकांना घेऊन आला..शिर्या काका भूत उतरवतो अस खुपदा ऐकल होत मी.

चाय, चिलम, चपाटी : लाझ येई भारत भेटी (२)

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 02/09/2015 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================== भाग १ ------------ भाग २ ------------- भाग ३ ----------- भाग ४ ----------- भाग ५ ================================================================ भारतभेटीला प्रथमच येणार्‍या एका परदेशस्थ व्यक्तीला आपला देश कसा वाटला हे आपण शक्य तितक्या अलिप्तपणे अनुभवावं, म्हणून

'स्थितप्रज्ञ'

लेखक एस यांनी बुधवार, 02/09/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या दोरीला बांधत अजून एका शतकाची गाठ स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात अजून किती जगशील तू? तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी की काळाची? अन् मग संवेदना बधीर करत भिनेल ते विष हळूहळू सर्वांगात? जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या साक्ष देती कशा आजही कैक पावसाळ्यांच्या अन् तख्तपालटांच्या! त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण पेरते का रे आजही तेच विचार तुझ्याकडे कधीकधी वळणार्‍या नजरांमध्ये? की विझते आजही धुमसती संघर्षाची धुनी तुझ्या स्फूर्तीने? आलाय वाटतं जवळ तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट ते पहा, मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय कधीच ओसाड पडलेलं हे शहर येताहे
काव्यरस

अनाथांची माई - सिन्धुताई सपकाळ

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 01/09/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
सिन्धुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील 'पिंपरी मेघे या गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव अभिमान साठे, ते गुराखी होते. सिंन्धु नकोशी मुलगी, म्हणून घरात तिला सर्वजण चिंधी' या नावाने हाक मारीत. त्यांच्या वडीलांनी बायकोच्या विरोधाला न जुमानता सिन्धुला शाळेत पाठवले. पण आईचा विरोध, आर्थिक परस्थिती, घरची जबाबदारी, बालविवाह या कारणामुळे चौथी पास झाल्यावर सिन्धुला शाळा सोडावी लागली. सिन्धुताई 10 वर्षाची असताना त्यांचे लग्न ३० वर्षीच्या 'श्रीहरी सकपाळ'शी झाले. जेव्हा त्यांचे वय 20 वर्षाचे होते तेव्हा त्या 3 मुलांच्या आई झाल्या.

दुष्काळवाडा........ भाग ४ - सैरभैर हात

लेखक pradnya deshpande यांनी मंगळवार, 01/09/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३ सैरभैर हात या हाताना काम हवे एका प्रकल्पाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीन गावात सलग बैठका घ्यायच्या होत्या. लवकर पोहचले नाही तर शेतकरी भेटणार नाहीत या भितीने आठच्या आतच पहिले गाव गाठले. दरम्यान रस्त्यातच अनेक जण भेटले.

किकलीच्या मध्ययुगीन परिसरात

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 01/09/2015 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
रेच दिवस चंदन वंदनच्या पायथ्याशी असलेल्या किकलीचे मध्ययुगीन मंदिर बघायला जायचे होते. तो योग अखेर आला आणि ८ ऑगस्टच्या शनिवारी मी, बुवा, गणेशा आणि किसनदेव असे पुण्याहून एकत्र निघालो. पुणे सातारा रस्त्यावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर आधी वाईचा सुरुर फाटा येतो. त्यानंतर लगेच ४/५ किलोमीटर अंतरावर हमरस्त्यावरच भुईंज गाव लागते. तिथून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. तर किकलीच्या गावच्या मागेच चंदन वंदन हे दोन्न बलदंड जोडकिल्ले उभे आहेत.