Skip to main content

णवसदस्य आणि जगप्रसिद्ध संस्थळ

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 18/09/2015 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो.

कुमाऊं – प्रवासाला निघताना

लेखक के.के. यांनी शुक्रवार, 18/09/2015 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
======================= भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ ======================= कुमाऊं – प्रवासाला निघताना ट्रीपची तारीख जवळ यायला लागली आहे हे साधारण कसे कळते?

..... तो कृष्ण 'एकटा' होता !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/09/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
कालिंदीच्या तटी नाचते राधा, गोपरास सावळा वेडावुन गेल्या गोपी, अंबरात श्यामरंग उधळला गोकुळ झाले मग्न, दंग, हर...; नामात हरीच्या गुंग हर मिठीत सांवळकान्हा , तृप्त शृंगार प्रितीचा रंग पण वृन्दावनचा राणा ..... तो कृष्ण 'एकटा' होता ! चाणूर, मुष्टिक, कंसही वधिला, उद्धरली मथुरा चन्दन गंधीत झाली कुब्जा कृष्ण एक तो उरला ब्रज, वृन्दावन, गोकुळ, मथुरा अन द्वारकामैय्या अद्वैताला उजळून गेली, केशवा तव सावळमाया विश्व डोलते ज्या मुरलीवर.. ......
काव्यरस

श्रीगणेश लेखमाला १: शिक्षणक्षेत्र

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 18/09/2015 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी आज शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 'माझ्या आईकडे सुट्टे पैसे नव्हते.' मला कोणीही जेव्हा कधी तू या क्षेत्रात कसा आणि कुठून आलास असं विचारतो, तेव्हा माझं हे ठरलेलं उत्तर आहे, आणि ते १०० टक्के खरं आहे. १ मे १९९६ या दिवशी जर माझ्या आईकडे सुट्टे पैसे असते, तर माझं संपूर्ण आयुष्य फार वेगळ्या मार्गाने गेलं असतं. माझी आई मुंबई महानगरपालिकेच्या स.गो.बर्वेनगर, घाटकोपर पश्चिम इथल्या शाळेत शिक्षिका होती आणि १ मे हा नेहमीप्रमाणे त्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता.

पाठलाग - कथा - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी गुरुवार, 17/09/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
१९६०चे दशक नुकतेच चालू झाले होते . मराठी चित्रपटसॄष्टीमध्ये ग्रामिण बाजाचे चित्रपट हळुहळु लोकप्रिय होऊ लागले होते. ग्रामिण पार्श्वभूमी असलेले कथानक व त्याला असलेली लावणीप्रधान गीत नॄत्यांची जोड हे काँबिनेशन मराठी प्रेक्षकांनी चांगलेच उचलून धरले ."सांगते ऐका" , "पाटलाचा पोर" ,"ओवाळणी" अशा ग्रामिण पार्श्वभूमीच्या सिनेमांनी चांगलेच यश मिळवले . साहजिकच मराठी चित्रपट निर्मातेही अशाच चित्रपटांच्या निर्मीतीकडे वळू लागले . अनंत माने , दिनकर द.

एक पूर्ण ताट

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 17/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
“या आजोबा बसा, काय हवय आपल्याला?” “थकलोय हो, खूप भूक लागलीय. काही खायला असेल तर द्या ना.” “कसली भूक?” “कसली म्हणजे? भूक काय वेगवेगळी असते?” “हो आजोबा या हॉटेलात येणाऱ्या प्रत्येक माणसाची भूक वेगळी असते. कुणाला ज्ञानाची भूक, कुणाला मनोरंजनाची भूक तर कुणाला फक्त मैत्रीची भूक.” “बापरे कठीण आहे एकंदरीत सारा प्रकार. इथे निदान पाणी तरी मिळेल का?” “मिळेल ना. कुठले पाणी हवेय आपल्याला काव्याचे कि साहित्याचे?” “अहो मला खरच भूक लागलीय हो. त्या कट्ट्यावरची माणसे म्हणत होती इथ मिनिटा मिनिटाला जिलब्या पडतात. ते ऐकूणच मी माझी भूक भागवायला इथवर आलोय.” “त्या जिलब्या वेगळ्या आजोबा, ती भूकही वेगळी.

ती आणि मी (भयकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी: तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर. तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची. रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती. तिची आणि माझी पहीली भेट इथलीच. एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली. जवळ जावुन मी तिची विचारपुस केली. घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं. माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली. पण मला तिची दया आली.

श्रीगणेश लेखमाला

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 17/09/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स, मॅनेजर्स, असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे. मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं.

< नैराश्याकडे फाऊले>

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन (मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 ) उत्साह आला, संचारला संचारला, लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला, कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले. सर्वां जसे नवपाखरु मिळाले. पण आता … भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले, छटाकभर पिंक मिळेनासे झाले. आज जरी धाग्यांना पंख लागले. अखेरची जिलबी प्रसवुन झाले, तरी डुआय पण न फिरकले, हीच का नैराश्याकडे फाऊले?