Skip to main content

कन्या मानव्याची

लेखक gsjendra यांनी सोमवार, 21/03/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी अधीर मी बधीर मी रूधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसार्‍याची मी सौदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण मी जगत मी अप्रगत मी स्वगत आतापर्यंतच्या आकांताचे मी पूष्पवेली मी मूरगळली मी रडवेली कन्या मानव्याची मी पंख फैलवावे मी बंध सैलवावे मी दीप पेटवावे वंशाचे बापाच्या मी चिंब व्हावे मी वार्‍यात न्हावे मी घूंगट झूगारावे कारण मी अनंत कारण मी स्वतंत्र क्रांतीचा महामंत्र आत्मशोध (काव्यसंग्रह)
काव्यरस

चटपटा हांडवो- अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा उपविजेती पाककृती

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 21/03/2016 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिनानिमित्त अनाहितामध्ये वन डिश मिल या संकल्पनेवर आधारित "अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा "आयोजित करण्यात आली होती.

इतक्या सहज नसतं शक्य...

लेखक वटवट यांनी सोमवार, 21/03/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या सहज नसतं शक्य, तोडणं आपल्या श्वासाची लय… आणि आपल्या रात्रीला लागलेली, तिच्या स्वप्नांची सवय… तसं काहीच नसायचं सोप्पं.. ती असताना आणि नसतानाही… हातही थरथरतो हल्ली, करताना तिच्या कवितेखाली सही… प्रश्न पडतो कसं सांभाळायचो, आपण स्वतःला तिच्यासोबत… प्रत्येक गोष्टीला अफाट मुल्य.. तसं काहीच नसायचं मोफत… म्हणजे चंद्राला अश्रू.. रात्रीला स्वप्न.. आणि तिच्या आठवणींना कविता द्याव्याच लागायच्या… नाहीतर कळ्याही फुलायच्या नाहीत… तश्याच रात्रभर जागायच्या… मग त्यांना पहाटे फुलवता फुलवता, माझ्या नाकी यायचे नऊ.. मग त्याच मला म्हणायच्या, "नकोस ना रे, असा वागत जाऊ..

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू वाटही पाहून झाली काळ तो सरला किती ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी का कधी शंका न आली मारली मज थाप तू प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू .. .

पहिल्या प्रेमी गुंतत गेलो

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या प्रेमी गुंतत गेलो सुटणे गुंता विसरत गेलो होती काळी शेजारी ती पण गोरा मी मिरवत गेलो येता जाता हसतच होती सुचता थापा मारत गेलो जुळले सूतहि प्रेमहि जमले प्रेमी तिचिया डुंबत गेलो गडबडलो मी प्रेमात तरी आनंदाला उधळत गेलो .. .

गाव बदललाय!

लेखक निशांत_खाडे यांनी सोमवार, 21/03/2016 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी जाउन आलो, सगळं बदललय! हल्ली फाट्यावरून तासभर डोंगर वाट तुडवत जावं लागत नाही, सगळ्यांकडे गाड्या आहेत. सुर्य मावळल्यावर वेशीतल्या पिंपळाच्या पारावरही गर्दी होत नाही, घराघरात टीवी आलेयत. पहिल्यासारखा पहाटे चंद्राच्या प्रकाशात गाव उजळून निघत नाही, सगळीकडे बल्ब लागलेयत. शाळा सुटल्यावर मुले पटांगणात गोट्या आणि विटी दांडू खेळत नाहीत, शिकवण्या असतात. मारुतीच्या देवळापुढे शेकोट्या करून तरुण गप्पा मारत बसत नाहीत, स्मार्टफोन आलेयत. लहान मुले गुरव काकांकडे पेटी, बासरी, तबला शिकायला येत नाहीत, कराटे आणि स्पोकन इंग्लिश आलंय. मामाच्या घरी जेवताना पहिल्यासारख्या गप्पा, हसणं -खिदळणं होत नाही, खंडोबाची मालिका असते.
काव्यरस

सिंधुदुर्ग

लेखक हकु यांनी सोमवार, 21/03/2016 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराची राजधानी. संपूर्णपणे महाराजांनीच बांधून घेतलेल्या काही किल्ल्यांपैकी एक. "८४ बंदरांत असा जागा मिळणार नाही!असं म्हणून मालवणच्या 'कुरटे' बेटावर महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. सुमारे २ वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. साधारण ५००० मावळे त्यासाठी खपत होते. यातले बहुतांश मावळे कोळी, भंडारी आणि आगरी होते.

पुणे कट्टा वृत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणे

लेखक शान्तिप्रिय यांनी रविवार, 20/03/2016 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
एक मस्त स्नेहसंमेलन झाले आज पुणॆ कट्ट्याच्या निमित्ताने . ठरलेल्या वेळात म्हणजे दुपारी ४.२० ला मी जंगली महाराज मंदिरात पोहोचलो. सुरुवातीला मी जंगली महाराज आणि पाताळेश्वर मंदिरात दर्शन घेतले व नम्दिमण्डपाजवळ बसलो. लगेचच मागेच बसलेल्या प्रसाद को यांनी मला फोन केला आणि आम्ही गप्पांना सुरुवात केली. पाककृती वाचता वाचता ते कसे आपल्या उत्कृष्ठ मिपा कडे वळले याबद्दल सांगितले. मिपावरील अनेक पाक कृतींची त्यांनी मुक्तकण्ठे प्रशंसा केली . खरेच मीही अशीच एक पाककृती वाचून मिपाचा वाचक झालो आणि नंतर रीतसर सभासद झालो हे मी नमूद केले.

काय भारी होतं ना बालपण

लेखक अभिषेक पांचाळ यांनी रविवार, 20/03/2016 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
काय भारी होतं ना बालपण काही मिळत नसेल तर रडायचं पाहिजेच असा हट्ट धरून अडायचं आपली बालिश बुद्धी आईला कळायची आणि हवी ती गोष्ट लगेच मिळायची आता कितीतरी रडूनसुद्धा काही भेटत नाही आपल्यावाचून कुणाचं काहीच अडत नाही आपली हि बुद्धी आईला अजूनसुद्धा कळते पण काही देण्याची तिला संधी कुठे मिळते ? कळते मोठं झाल्यावर , खूप बदललोय आपण आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण नवीन खेळण्यांसाठी , हट्ट धरायचा मिळालं कि एकदम , उर भरायचा खेळत खेळत कधी , मधेच पडायचं तुटलं कि खेळणं , जोरात रडायचं आता वाटतं , तुटणारी खेळणीच बरी होती परत न मिळायला , ती थोडी खरी होती ? मोठं झाल्यावर आता , मन तुटतं सारखं जीवा भावा

खुंटीवरच्या कविता

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 20/03/2016 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
वाढलेल्या दाढीचे खुंट घेऊन तो बराच वेळ बसला भादरायला कोणीच नसल्याने जरा उदासच वाटला उठून मग त्याने हातात वाटी वस्तरा घेतला ब्रश नसल्याने हातानेच तोंडाला साबण फासला आरशात बघून जेव्हा त्याने वस्तरा फिरवला कवीमहाशयांच्या मनात काव्यबीज संचारला उत्तररात्रीच्या उन्मत्त धुक्यात मग तो लिहीतच राहिला रात्रभर जागून लेखणीला जीवाच्या आकांताने छळतच राहिला सकाळी घोटभर दूध पिऊन पुन्हा पाने फाडतच राहिला संध्याकाळी पेन बदलून नव्या वह्या काढतच राहिला. दिवसांमागून दिवस गेले, पुनव जाऊन आवस आली कविमहाशयांची म्हैस, एकदा नव्हे दोनदा व्याली एकदा ऑफिसला बसलो असता सहाय्यक मला म्हणाला साहेब तो कवी आलाय या कविता छ
काव्यरस