Skip to main content

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/07/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. || ॐ || दि. २७ एप्रिल २०१६ ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही.

देहभान

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 08/07/2016 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी अनिच्छा, किंचित हूरहूर, जराशी धास्ती अशा सगळ्या मिश्र भावनांच्या नादात ती कॅफे कॉफी डे च्या दारात उभी होती. शेलाटा बांधा, पाठीवर रुळणारे केस आणि साधासाच पण सुंदर चुडीदार-कुर्ता. नजर शोधत होती विवाह मंडळाच्या वेब साईट वर प्रोफाईलमध्ये पाहिलेल्या चेहेर्‍याला.

राँग नंबर

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 07/07/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
साध्या सर्दि तापापासून सुरवात होऊन न्युमोनियावर दुखणे गेले. रोज एकेक दिवस मोजता मोजता आज तीन आठवडे उलटून गेले होते. रांगणेकर हॉस्पिटलमधील भिंतीवरचा प्रत्येक डाग अन रेषा आजीला आता पाठ झालेल्या होत्या. तिचे शरीर म्हणजे तर नाही नाही ती औषधे रिचविण्याचे पिंपच झाले होते. नर्सने केव्हाही येऊन कुठलीही औषधे टोचून वा तोंडात कोंबून भरावीत. हे काय आहे, कशासाठी आहे, काही उपयोग होतो आहे की नाही, कोणाला विचारले तरी धड कळेल असे उत्तर मिळेल तर शपथ! मुलगी सकाळी ऑफिसला जातांना पाच मिनटासाठी येऊन जायची. तिने डब्यात आज काय आणले असेल त्याचेही आता औत्सुक्य उरले नव्हते.

मिपा बाप्पा मोरया

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 07/07/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात. मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात.

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 07/07/2016 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवणार. सामान्य माणसाचा जगण्याचा उद्देश्य असतो - सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या. खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात. खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच.

Sanglit kothe kay

लेखक Vidyadhar1974 यांनी बुधवार, 06/07/2016 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
I have recently shifted to sangli. Can somebody late me know good eateries and places to visit at sangli?

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 06/07/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

आठवतेय का?

लेखक रातराणी यांनी बुधवार, 06/07/2016 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतेय का? पावसातली पहिली भेट धुक्याची दुलई पांघरूण लपुन बसलेली वाट आणि तोल जाता जाता तू हाती घेतलेला हात ओल्या गवताळ मातीचा थंड हुळहुळता स्पर्श आणि भिजल्या पापण्यात तुझ्या श्वासांची ऊब मला उगीच असलेली घरी जायची घाई आणि तुझ्या आर्जवात शहारलेली जाईजुई डोळ्यांनीच दिलेघेतलेले कितीतरी मुके निरोप आणि परतीच्या वाटेवर हरवलेली दोन मनं आठवतेय ना? पावसातली पहिली भेट

झोका...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 06/07/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कभिन्न अंधार विक्राळ दरीत... विहरतो सूर गंधाराचा... पानाआड कुणी बसले लपून वाराही जपून झोका देई!!.. हासते कुणी ते आडून पानांच्या... अवघा रानांच्या मोहोर मनाला !! अंगावर माझ्या पावसाच्या धारा... लपेटला वारा काळा कुट्ट!!

इराणी चित्रपट - 'द ब्राईट डे'

लेखक विशाखा पाटील यांनी बुधवार, 06/07/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
इराणी आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म साधारण एकाच काळातला. आपल्याकडे जेव्हा दादासाहेब फाळकेंना कॅमेराच्या वेडाने झपाटलं होतं, त्याच सुमारास इराणमध्येही राजदरबारातली मंडळी युरोपातून कॅमेरा आणून चित्रफिती तयार करण्याच्या कामाला लागली होती. त्या काळी तिथे फार चित्रपट तयार होत नसले तरी हळूहळू हे क्षेत्र बहरू लागलं. तेवढ्यात १९७९ मध्ये इराणमध्ये राजकीय भूकंप झाला. इस्लामी राज्यक्रांती झाल्यावर कलाकार हादरले, देश सोडून पळाले. अशा राजवटीत चित्रपटावर कुऱ्हाड कोसळणार हे उघडच होतं. पण इराणच्या राजवटीने थोडासा का होईना आश्चर्याचा धक्का दिला.