Skip to main content

( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... राया तो माजा भ्येटंल काय, न भ्येटंल काय, वाट पहायाची आपली पुरी तयारी हाय, दैवाचीबी परीक्शा घेइन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... जीवाचा सखा गावंल काय, न गावंल काय, समदं ह्या कपाळी लिव्हल्यालं हाय, नशिबासंगं आज पैज लावीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... आयुक्शाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, धन्यासाटी आगीशीबी खेळने मंजूर हाय, डोरलं त्येच्याच नावचं गल्यात घालीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते ...
काव्यरस

फिलिंग आवसमला

लेखक फुंटी यांनी रविवार, 24/07/2016 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी पिकनिक हिरवाईच फ्याड धबधबे, डोंगर चिकन,भुजिंग , पोरींची परमिशन असेल तर दारू पोरी भिजलेल्या जाकीटातल्या खेड्यातली उघडीनागडी पोर त्याशिवाय कारुण्याचा टच नाही आमच्या फिलिंग आवसमला... वरती अवसान न्याचरल सुखाच अपलोडिंग ..... ट्याग कर रे मला ... सत्राच लाईक अजून..... शी ...पुढच्या वेळी मोठा धबधबा शोधू.....
काव्यरस

असे कधी घडत नसते

लेखक सुधीरन यांनी रविवार, 24/07/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
झपाटलेल्या(?) वळणापाशी येताच, तुमची चाल मंदावू लागते कितीही नास्तिक वा धीट असलात तरी, हलकेसे भय तुम्हास वाटू लागते. श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. शरीर थोडेसे घामेजू लागते. वळण ते पार होताच मात्र, तुमची स्थिती पूर्वपदावर येते. कधी तरी घरी पोहचता. घर जणू तुम्हाला आलिंगन देते. फुललेले चेहरे, उतू चाललेला हर्ष. तुम्हास ते सारे खटकू लागते. तुमच्या आगे मागे फिरणा-या त्यांची, तुम्हाला चिड येऊ लागते. कधीतरी होते सारे असह्य. तुमच्या तोंडून किंकाळी फुटते. माणसे, घर सारे... काहीच नाही! जणू विरून गेले, तुम्हाला जाणवते. 'ते' वळण अजुनही न सरले. खरंच, असे कधी घडत नसते?

रिमझिम रिमझिम

लेखक सुधीरन यांनी रविवार, 24/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम रिमझिम पाऊसधारा न्हाऊनी निघाला आसमंत सारा बेधुंद अशा या क्षणी साथ तुझी हवी साजणी ओले ओले वृक्ष अन वेली पानांवरून टपटपते पाणी त्यात आठवली तुझी कहाणी ओलावली मग डोळ्यांची पापणी खळखळत वाहणा-या या नद्या मिळतात सागराला सा-या का न मग होई आपले मिलन प्रश्न पडे हा फार गहण भरारत वाहणारे हे वारे आले अंगावर शहारे दुःखाने मी कळवळतो हृदयाच्या वेदनेने विव्हळतो चिंब चिंब झाले माझे तन दुःखाने भिजले माझे मन आसवांचा आला आहे पूर सापडेना आयुष्याचा सूर
काव्यरस

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 24/07/2016 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो.
काव्यरस

एक कप कॉफी...

लेखक निखिल निरगुडे यांनी रविवार, 24/07/2016 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो बराच वेळ कसल्याश्या विचारात मग्न होता. आपण बराच वेळ टेबलावरच्या paper-weight शी उगाचच खेळतोय ह्याचं त्याला भानंच नव्हतं. अचानक मनाशी काहीतरी निर्धार करून तो जागेवरून उठला आणि थेट एका desk पाशी जाऊन थांबला. ताज्या फुलांचा मंद सुगंध त्या डेस्क पासून सुरु होऊन ऑफिस भर दरवळत असावा, असे त्याला उगाचच वाटले.

रिफील (शतशब्दकथा)

लेखक निओ यांनी रविवार, 24/07/2016 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
रिफील बापाच्या उजव्या हाताची थप्पड खाडकन त्याच्या कानशिलात बसली. थपडीच्या धक्क्याने गेलेला तोल सावरायची कसरत करत भरल्या डोळ्याने त्याने बापाकडे पाहिले. बॉलपेनची 25 पैशाची रिफील पोराने एका दिवसात हरवली म्हणून बापाचा राग अनावर झाला होता. रडक्या आवाजात तो काही सांगणार इतक्यात दुसरा धपाटा पाठीत बसला. दिवसभर ST चालवून आलेला वैताग बापाने त्याच्यावर काढला होता. झरर्कन त्याला सारे आठवून गेले. ते बाजूला सारत CBSE पॅटर्नमध्ये शिकणाऱ्या आपल्या पोरांना त्रासिकपणे तो म्हणाला.. "काय करता रे!

कबाली

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 23/07/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही. साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते.

कवी हूँ मैं

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 23/07/2016 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
"कवींनी धुमाकूळ घातलाय निव्वळ उच्छाद जिकडेतिकडे ब्लॉगचा कट्टा ,फेसबुकची भिंत ते ट्विटरची टाइमलाईन कवीच कवी सापडतात इकडेतिकडे चोहीकडे एक जागा मोकळी सोडली नाही.. गझला काय, चारोळ्या काय अरे दीर्घकाव्य लिहून उप्पर से हायकू कायकू लिखनेका बाबा? 'कवी इलो' ची हाकाटी ऐकू आली की पळत सुटतात सगळे सैरावैरा कवींना दिलंय आपण मोकळे रान आपले व्हाट्सऍप खुले सोडले दिली आपली व्यासपीठं आंदण.. व्यासा, तू पण कवीच होतास ना रे? आता यावर एकच उपाय उरलाय......" वरच्यासारखं कुणी परत लिहताना दिसलं तर त्याला पार उद्ध्वस्त करायचे.. शीघ्रकवितांचे धरण फोडून मुक्तछंदांचा महापूर आणून घरात त्याच्या सोडायचे शेरोशायरींचे झु

सोबतीण भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 23/07/2016 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
अपर्णा आणि पृथा एकाच ऑफिस मध्ये होत्या. दोघी एकत्रच जायच्या ऑफिसला. अगोदर अपर्णाने ऑफिस जॉईन केल त्यानंतर पृथाने. पृथाने जरी थोड नंतर ऑफिस जॉईन केल तरी तिच्या बडबड्या स्वभावामुळे तिची अपर्णाशी पटकन दोस्ती झाली. तशी अपर्णा अबोलच होती. त्यामुळे तिची आणि पृठाची मैत्री झालेली बघितल्यावर ऑफिसमधल्या इतरांनी अपर्णाच्या अपरोक्ष पृथाकडे आश्चर्य व्यक्त केल होत. "कमाल आहे हा पृथा तुझी. आम्ही अपर्णाला तुझ्या अगोदर पासून ओळखतो. पण आजवर तिने कधी आमच्याशी गप्पा नाही मारल्या. अग, लंचला सुद्धा ती आमच्याबरोबर नाही बसत. तुझ्याशी मात्र मस्त मैत्री झाली आहे. काय जादू केलीस ग तिच्यावर." एकाने पृथाला विचारल होत.