Skip to main content

चुकचुकली पाल एक...!

लेखक खेडूत यांनी सोमवार, 01/08/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.

|| चारधाम ||

लेखक संदेश यांनी रविवार, 31/07/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी हुश्श..!! चला आज चारधाम यात्रेची बुकिंग करून झाली.. मोठा टप्पा पार केलाय.. केदारनाथाची कृपा .. त्याच्या बोलावण्याशिवाय आपण त्याला भेटू शकत नाही.. पांडव भेटू शकले नाहीत तर आपण काय चीज..!सुरुवात चांगली बॅग विकत घेण्यापासून झाली ती पण यात्रेच्या आदल्यादिवशी.. स्टारबाझार मधून 15 किलो सामान राहील अशी सफारी बॅग घेऊन आलो.. बाकी वायफळ खरेदी आई बरोबर असेल तर होतंच नाही..या आधी हिमालय काय चीज आहे याचा थोडा अनुभव असल्यामुळे त्या वातावरणाला साजेशे असे गरम कपडे त्यावेळी घेऊन ठेवले असल्यामुळे फक्त सुका मेवा तेवढा घेतला. विमानाने जायचं म्हणजे सामानाच्या वजनाकडे लक्ष द्यावेच लागते..

परतून ये तू घरी

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 31/07/2016 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी

जगणे...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/07/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

अकादमीला सादर केलेला अहवाल....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 31/07/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक, फ्रँझ काफ्काच्या तीन कथा लिहून त्याला आदरांजली वाहण्याची इच्छा या तिसर्‍या कथेने पूर्ण करत आहे. या आदरांजलीतील हे शेवटचे पुष्प...

बादलीयुद्ध २

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 31/07/2016 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक ------------------------------------------------------------------------------- होस्टेलवर मी येऊन पंधराच दिवसच झाले होते. त्यात माझा पार्टनर राजेश सोडून गेल्याने खोलीत मी एकटाच असायचो. कॉलेजसाठी फक्त एक वही विकत घेतली होती. बाकी कशाचाच पत्ता नव्हता. रात्री खाटंवर पडल्यावर वहीवर मी उगाच रेघोट्या ओढत बसायचो. चित्रं काढायचो. वरच्या रकान्यात डोंगर काढणे हा माझा आवडता खेळ. सुरुवातीला चारपाच डोंगर काढायचे. मग दोन डोंगरांच्या मध्ये अजून एक बारका डोंगर. मग मोठ्या आणि बारक्या डोंगरामध्ये अजून एक चौथा डोंगर.

मी थेंब की झाड की माणूस ??

लेखक फुंटी यांनी रविवार, 31/07/2016 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
भर पावसात झाड निश्चल उभी आहेत.शब्दशः एकही पान हलत नाही.स्थितप्रज्ञतेने बरसणार्या पावसाचा जणू स्वीकार करत आहेत. मी माणूस रहात नाही पण मग मी एक थेंब की झाड ? की दोन्ही ? हं आता लिहिताना माणूस झालो पुन्हा.झाड लिहू शकत नाहीत.अनुभवत असतातच.पाऊस बरसत असतो .तोही लिहू शकत नाही... खोताचा प्रभाव पडतोय माझ्यावर...की श्याम मनोहरांचा...झाडांना आणि पावसाला प्रभावाच काही पडलेल नाही.मला पडलय मी माणूस आहे..

एन्टरप्रेन्युअर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 31/07/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

खड्डारी

लेखक फुंटी यांनी शनिवार, 30/07/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
Dedicated to Mumbai खड्डे ... वाटेवर खाडे चुकवीत चाललो वाटले जसा फुल टाईट जाहलो मिसळुनी ट्रँफिक मधी, एक हात सोडूनी कधी आपुलीच सेल्फ स्टार्ट कधी मारित चाललो पुढचा ब्रेक दाबीत , मागचीचा ऐकीत हाँर्न तोंडातच शिव्या घालित चाललो करूनि मान तिरकी ,परि ती दिसेना मिररवरती अलवार आरसा फिरवित चाललो चुकली तालात कट, पडला बोनेटला स्क्रँच ढळलेला तोल सावरीत चाललो खांद्यावर बाळगिले ओझे सँकचे फेकून देऊन आता परत चाललो

न्यायालयाच्या पायरीवर....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 30/07/2016 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रँझ काफ्काच्या एका कथेवर आधारीत.... न्याय... सगळीकडे अंधुक प्रकाश पसरला होता आणि मोठ्या मुष्किलीने पुढचे दिसत होते. अतीश्रमाने त्याला चक्कर आली होती का त्या अंधारामुळे त्याला दिसत नव्हते हे त्याला कळत नव्हते. त्याला एकदा वाटत होते की तो एक उंच मिनारापाशी उभा आहे. त्या मिनाराला एक दरवाजा होता आणि त्याच्यावर पाच गरुडांचे पुतळे. मोठ्या डौलाने ते सोनेरी प्रकाश फेकत होते. ‘ ‘हं ऽऽऽ पोहोचलो एकदाचा !’’ तो मनाशी म्हणाला. गेले कित्येक दिवस तो अखंड प्रवास करुन या न्यायगृहासमोर उभा ठाकला होता. त्याने एकदा दरवाजासमोर उभे ठाकलेल्या दरवानाकडे नजर टाकली आणि लगेचच चुकविली.