Skip to main content

बादलीयुद्ध १३

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 06/10/2016 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
"तुझ्या कॉलेजवर कँपुस येत न्हाय का रं?" असे म्हणणारे एक सदगृहस्थ गावाकडे भेटले होते. येणेप्रमाणे पुढच्याच महिन्यात कँपुस आले पण. शुद्ध भाषेत आम्ही त्याला कँपस म्हणतो. 'INFOSYS' नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी कँपस इंटरव्हीव्यू घ्यायला कॉलेजवर दाखल झाली. आजूबाजूचे जवळपास तीन-चार कॉलेजेस त्यात सामील होते. ' software की manufacturing?' यावर उच्च वर्तुळात बरीच चर्चा चालत असे. शेवटी manufacturing इज बेस्ट हा आम्ही स्वत:साठी निकाल लावून घेतला. बऱ्याच जणांच मत होतं की software मध्ये 'पर्सनल आयुष्य' नावाची गोष्ट नसते. एका विशिष्ट कंपूचं असं मत होतं की " software वाल्यांची सेक्स लाईफ पण ढेपाळलेली असते".

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 06/10/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
(रूपक कथा) नुकताच गेलेल्या पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही.

डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - उंबरखिंड - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग २)

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 06/10/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर किसन शिंदे यांची लोणावळा रेल्वे स्टेशनवरच भेट झाली. कुरवंडे गावात उतरलो तेथे गाईड गौरु भाउ आमची वाट पाहातच होते. किती जण आले आहेत हे पाहण्यासाठी काउंटींग घेउन चालायला सुरुवात केली तो पाउस सुरु झाला. १० मिनीटे चढ चढल्यावर चावणी गावापर्यंत उतरणीचा रस्ता असल्याने सर्व अगदी मजेत , फोटो काढत चालले होते. चढ संपल्यावर छोटा पठारसदृश भागात उभे राहील्यानंतर आधी सर्वांची ओळख परेड झाली. आम्ही जिथे उभे होतो तिथेच कुठेतरी शिवाजीमहाराजांनी छावणी बांधली होती असे बरोबर असलेल्या श्री.

!! जगण्या परी मारावे !!

लेखक कवि मानव यांनी गुरुवार, 06/10/2016 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळासंगे जुगार खेळूनी, गमवून बसला पुंजी सारी, निसर्गाचा खेळ असा की, कधी अकाल तर कधी पाणी मारी !!१!! दारिद्र्याचे दंश असे की, भूक मोठी पण खिशात नाणी, जगास पिकवून देणाऱ्याचे, मुले खेळती उपासवाणी !!२!! सावकाराच्या कर्जाला तंगून, एक दिवस तो फासावर चढतो, जन्मभर ज्याची किंमत क्षुल्लक, मेलेल्यावर त्याचा भाव ही ठरतो !!३!! आयुष्य असे का दिलेस देवा, जिथे दोन वेळची भ्रांत असे, रुसला ज्यावर खुद्द निसर्ग देवता, तू सांग शेतकरी जगणार कसे !!४!! पुढच्या जन्मी जनावर होऊ, परी जन्म नको हा शेतकऱ्याचा, दोर असे जरी गळ्यात माझ्या, परी दोर नसे तो माझ्या फासाचा !!५!!
काव्यरस

गीतगुंजन - २२: बेबी, व्हेन यो'र गॉन...

लेखक प्रास यांनी गुरुवार, 06/10/2016 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
जगात प्रेमाच्या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वभाव जुळले पाहिजेत आणि दुसरा अपोझिट अट्रॅक्स. असंच काहीसं मैत्रीच्या बाबतीतही होतं आणि म्हणूनच कधी कधी संभ्रम होतो, ही निखळ मैत्री आहे की प्रेम? स्वभाव जुळले म्हणून किंवा स्वभाव विरुद्ध आहेत म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळता येत नाहीत. किंबहुना ते तसे येतातच. मग सुरू होतो राग आणि अबोला यांचा सिलसिला! एकान्तात राहवत नाही आणि गर्दी भावत नाही. काऊन्टर करण्यासाठी नेमका विषय टाळून कुणाशी गप्पा, नाटक-सिनेमा-रेडीओ-पुस्तक यामध्ये मन गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दिवस कशा ना कशा त-हेने पार पडतो पण मग रात्रं खायला उठते.

नवलाई...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 06/10/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवलाई... ही सवय तुझी का मला माहीत नाही? उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई आपण दोघे जागे जग शांत झोपले पांघरून स्वप्नांची दुलई जागेपणी पाहतो आहे आपण उद्याच्या स्वप्नांची नवलाई राजेंद्र देवी

निरोप

लेखक परिधी यांनी गुरुवार, 06/10/2016 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला

रायगडावर जेव्हा जाणे होते

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 06/10/2016 02:49 या दिवशी प्रकाशित केले.

रायगडावर जेव्हा जाणे होते

सर्वात प्रथम चौथीच्या पुस्तकात ओळख झालेला शिवाजी महाराजांचा इतिहास, आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टयांत रणजित देसाईंचे श्रीमान योगी भान हरपून वाचताना डोळ्यांसमोर उभा राहिलेला शिवरायांचा इतिहास आणि आज परत एकदा बऱ्याच वर्षांनी रायगडावर पाऊल टाकताच वाचलेल्या अनेक प्रसंगांच्या खुणा, अवशेष धुंडाळत त्याच्या खूप जवळ जाता येणारा छत्रपतींचा तो अजरामर इतिहास. लेकीला महाराष्ट्राच्या या महान इतिहासाची थोडीफार तरी ओळख व्हावी या हेतूने आज तिथे जायचा बेत आखला होता. पाचगणी, महाबळेश्वर, महाड या वाटेने पुढे जात रायगडाच्या दिशेने निघालो.

गॅरेज युनिव्हर्सिटी...१

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 05/10/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
गॅरेज युनिव्हर्सिटी...१ (सर्व पात्रे व घटना काल्पनिक) "विज्या कुठे आहे रे?" "अरे तो काल रात्रीच गोव्याला गेलाय, येईल तीन चार दिवसांनी, पण तू कसा काय आज सकाळी सकाळी उगवलास?" बाबू शेठचा परिचित आवाज ऐकून फियाट च्या खालूनच कुठलेतरी नट बोल्ट टाईट करता करता अज्या दादा विचारता झाला. "आयला पहाटे माझा सासरा गचकला, बायको आणि मेव्हण्याला अर्जंट पुण्याला सोडून यायच होतं. विज्या आला असता ना रे पटकन जाऊन." आता मात्र पाठीवर सरपटत अज्या दादा गाडीच्या खालून बाहेर येत म्हणाला " काय झालं रे त्यांना अचानक? आणि तू नाही का जाणार?" "हार्ट अटॅक आला होता रात्री... पहाटे खपला.