Skip to main content

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 17/11/2016 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;) गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे माझ्या माळ्यावरी.. आ.. त, करं-कचून बांधलेले..! आलो होतो देवळात मी काहि अभिषेकांसाठी फक्त वर्षाचे "झाले किती???" पाचशे पाचशे शोषिती रक्त अडिच लाखा चा दगड लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला बाकीच्यांचे निर्माल्य काहि.. शे-कोटिंचा पाचोळा! ================ मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु

बोट - आयजीच्या जिवावर बायजी उदार

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 17/11/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते. मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं. तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली. घरापासून दूर राहाणार्या कित्येक लोकांमध्ये एक गैरसमज असतो.

घाटलं!!

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 17/11/2016 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!

सुट्टीच्या कल्पना

लेखक वरुण मोहिते यांनी गुरुवार, 17/11/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टी हा तसा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय . लहान असताना आतासारख्या छोट्या छोट्या नाही तर चांगल्या मोठ्या सुट्ट्या असत . एकदा सुट्टी पडली की डायरेक्ट १२ जून ला परत घरी. आता कामातून तासभर जरी सुट्टी मिळाली तरी बरं वाटतं :)) तर सांगायचा विषय काय प्रत्येकाचीच सुट्टी कुठे ना कुठे तरी गेलेली असते.माझीही गेली कधी कोकणात कधी पुण्यात कधी साताऱ्यात, कोल्हापूर तर दस्तुरखुद्द आमचंच गाव त्यामुळे ते तर आलंच. ह्या ठिकाणांवर बरंच काही लिहिलं आहे .पण मला सर्वात सुट्टीत जायला आवडायचं ते बदलापूर आणि कर्जत ला .बदलापूर व्हाया मुरबाड ते कर्जत अतिशय समृद्ध प्रदेश आहे हा.

डिमॉनेटायझेशन (भाग १)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 17/11/2016 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

प्रस्तावना

ही प्रस्तावना लिहिण्याचे कारण या लेखनावर येऊ शकणारे काही संभाव्य प्रतिसाद आहेत. संकल्पनांविषयी कुठलीही चर्चा सर्वांना मनपसंद होईल, पूर्णपणे पटेल अश्या स्वरूपात करणे अशक्य असते असा माझा शिक्षणक्षेत्रातील गेल्या २० वर्षांचा अनुभव सांगतो. प्रत्येकाचे पूर्वग्रह आणि आकलन निराळे असते. मी त्याचा आदर करतो. आणि माझी जबाबदारी, संकल्पना तिच्या शुद्ध स्वरूपात तिच्या योग्यायोग्यतेबाद्ल टिप्पणी न करता मांडण्याची आहे, असे मानून चालतो.

शूर नेते

लेखक सोहम कामत यांनी गुरुवार, 17/11/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : शूर आम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती) नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती.. देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती.. भ्रष्ट सानिध्यात उमगली भ्रष्टाचारी रित.. खुर्चीवर जे बसवले आम्हा जडली येडी प्रित.. लाख पैसे ते चोरून नेईल अशी शक्ती या हाती.. देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती.. नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती.. खुर्चीवरूनी पैस गिळावं हेच अम्हाला ठावं.. मारून घ्यावं घेऊन खावं हेच अम्हाला ठावं.. काळ्या पैशासाठी भुलवू माया ममता नाती.. देव देश अन धर्म विसरूनी खेळू अंध ती निती.. नेते आम्ही शूरवीर अम्हाला काय मोदींची भीती..

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/11/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ|| मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||१|| भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
काव्यरस

न्यूरेम्बर्ग

लेखक अफगाण जलेबी यांनी गुरुवार, 17/11/2016 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या महायुद्धाच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे युद्धगुन्हेगार या संकल्पनेचा उदय. आज जे युद्धगुन्हेगारीमध्ये मोडतात तसे गुन्हे दुस-या महायुद्धाआधी झाले नाहीत असं नाही. पण दुस-या महायुद्धाने ही संकल्पना स्पष्ट केली. एकतर या युद्धात लष्करी आणि नागरी  (Military and Civilian)  ही सीमारेषाच पुसून टाकली गेली होती. १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन किंवा अधिक देशांमधलं युद्ध हे लष्करापुरतं मर्यादित असे. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसा युद्धाचा आवाका वाढत गेला.

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 17/11/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१ पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) ‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला..... "ॲना !