Skip to main content

ब्रुहन्नडा

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 13/09/2008 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वजण आपआपल्या क्षेत्रात रथी,महारथी,अतिरथी असतो. किंवा तसा समज बाळगतो. माझा समज मि.पा.पैलवानानी दुर केला. बरे झाले. महारथी अर्जुनावर एक वर्ष ब्रुहन्नडा व्हायची पाळी आली होती. नव्या मिलेनियम मध्ये माझ्यावर पण हा प्रसंग आला होता. घरात गणेशोत्सव मोठ्या आणि मिठ्या प्र्माणाने साजरा होतो. ह्या उत्सवामध्ये रसद पुरवठा आणि उष्ट्याचे निराकरण माझ्याकडे असते. स्वयंपाक प्रमुख माझी बायको(आचारी). बाकी सर्व लगतचा मोठा भाउ. सर्व काही विनातक्र्रार. ह्या पाच दिव॑सात इतर सर्व काम बंद.निखळ आनंदाचे ते पाच दिवस. विसर्जनच्या दिवशी अजुनही थोरा मोठ्यांचे डोळे पाणवतात.

निरर्थक...

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 13/09/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकांत सोसवे ना.. प्रेमात अर्थ कसला? प्रेमास घाबरे त्या.. हृदयांत अर्थ कसला? साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? रण थोडके नसे परि पेटे पराक्रमाने.. पण आपुला न झाला.. विजयांत अर्थ कसला? बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? क्रांती मशाल घेवुन मेले स्वतः परंतू... कोणीच आठवे ना.. मरण्यांत अर्थ कसला? वाहून काळजातुन तृष्णा अनेक मिटल्या... पण... बांध घातले तर... झरण्यात अर्थ कसला? मांडू नका समोरी पेले असे रिकामे... भरणे नसे इथे तर.. जमण्यांत अर्थ कसला? मेलेच पाहिजे मी वाटू नये परंतू... मरतो हरेक क्षण तर...

" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा." ...

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 13/09/2008 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
वाचता वाचता वाचनात आलं म्हणून,ह्या विषयावर आज मी आणि प्रो.देसाई आणि त्यांच्या नविन पाहूण्या बरोबर जरा "वृद्धत्व शाप केव्हा ठरतं." ह्या विषयावर चर्चा करायचं ठरवलं. त्याचं असं झालं,बराच वेळ मी तळ्यावर भाऊसाहेबांची वाट बघत बसलो होतो.अर्थात बरोबर पाडगांवकरांचं कवितेचं पुस्तक चाळण्यात वेळ घालवला.इतका उशिर झाल्याने येत नाहित असं समजून दूरवर एकदा न्याहाळून पहावं म्हणून नजर टाकली असता चार जण हलक्या पावलाने येताना दिसले.बरोबरचे एक गृहस्थ वॉकर घेऊन चालत होते.भाऊसाहेब थांबा,थांबा म्हणून मला हाताने खुणावत होते.जवळ आल्यावर त्या तिन गृहस्थांशी माझी त्यानी ओळ्ख करून दिली. "हे प्रो.घारपुरे,हे डॉ.तुळपुळे आ

का असे केलेस?

लेखक मीनल यांनी शुक्रवार, 12/09/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
ई सकाळ मधील पैलतीर मधे आजच माझी ही कविता प्रकाशित झाली.

गनपती बाप्पा

लेखक नोहिद सागलीकर यांनी शुक्रवार, 12/09/2008 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पांचे आगमन होउन आता निघन्याचि वेळ आली आहे, काल मी आणि माझे मित्र उत्सव पहायला गेलो होतो पन बापां पेक्षा मामू (पोलीस)लोकां चि संख्या इतकी कि बाप्पां चे दर्शन वीरळ झाले होते, घड्ला प्रकार आसा आमच्या बरोबर दिन्या (कार्टुन) होता त्याच तोड बंद ठेवायला बाप्पां नाही जमल नाहि कारण बाकी सर्वानी बाप्पांकडे प्रार्थना केली कि याच तोंड बंद ठेवाव पन काय करनार बाप्पां नि आंमची प्रार्थना होल्ड वर ठेवली आसेल कदाचीत ,तर हा (दिन्या )लागला गरजायला गनपती बाप्पा मोरया.......मंगलमुर्ती मोरया..........वर चेकपोस्ट वर हुभारलेल्या मामूने दुर्बिन लाउन नजर ठेउन घेतलान त्याला बाजुला आणि ''दगडु शेठ हलवाई ''गणपति म

'मुंबई मेरी जान' - चुकवू नये असा!!

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 12/09/2008 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला - 'डोंबिवली फास्ट'. चित्रपट फारच सुरेख जमलाय...मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही....फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही. सुचना/Disclaimer - Spoilers ahead!

ऑनलाईन गणपती

लेखक नितमित यांनी शुक्रवार, 12/09/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? मला फोटोसह माहिती हवी आहे, ले़खासाठी.

मोदक

लेखक ऋचा यांनी शुक्रवार, 12/09/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी रात्री मोदक केले होते. गणपतीच्या दिवसात एकदातरी करावेत अस वाटल म्हणुन,तर त्याची पा.कॄ. देत आहे. मला माहीतेय की मोदक सगळ्यांनाच करता येतात पण मी पहील्यांदाच केले, ते सुद्धा सुचतील तसे :) सांगायला कोणी नव्हत कसे करायचे म्हणुन. आणि इथे ही पा.कॄ.

एक उघडे पत्र- सर्व मि.पा.सद्स्याना

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 12/09/2008 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय विसोबा खेचर आणि मि.पा. मित्रमंड्ळी, माझ्या टोचणी मध्ये भरभरुन सहभागी झाल्यबद्दल शतशः धन्यवाद. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. गेली ३० वर्षे समुपदेशन मी करत आलो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात. पण छोट्या खुर्चीत बसायचा योग प्रथमच आला. मी स्वतः सर्वांना खांब सोडायचा सल्ला न चुकता देतो. आणि मीच हा खांब पक्डुन बसलो होतो घट्ट्पणे. ही मिठी सोडवणे सोपे नव्हते. ते तुम्हा सर्व मंडळीनी अगदी सहज केले. समुपदेशनकाराचे सामुहिक समुदेपशन. आता कसे मोकळ वाटतय. मुक्ति मिळाली. का कुणास ठाउक पण शाळेनंतर कोणी मित्र झालेच नाहीत. तेच माझ्या रेस्टलेसनेस च कारण आहे असे बायको म्हणते.

माझेही काही फोटो...

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 12/09/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी काढलेले काही मॅक्रो, साधे फोटो शेअर करतोय, बर्‍या-वाईट प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या -
  • इस रंग बदलती दुनियाँमे...
  • फूल ही फूल खिल उठें...
  • जियों मेरे लाल!