Skip to main content

...पण "वेळ' आली नव्हती!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/10/2008 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
--------- विधान परिषदेत कुठलं भाषण करायचं, याची तयारी सुबोध मोहितेंनी सुरू केली होती. शिवसेनेला नामोहरम करण्याच्या युक्‍त्याही योजून ठेवल्या होत्या. नितीन गडकरींच्या भाषणावर कडी कशी करता येईल, याचा विचार सुरू होता. सगळी जय्यत तयारी झाली होती. विमानही सज्ज होतं. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अधिकृत फोन आला नव्हता, तरी त्यांना त्याबद्दल खात्री होती. मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांनी बाकीची "व्यवस्था' ठीकठाक असल्याचंही कळवलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीही अर्ज भरण्याची सूचना आली नाही, तेव्हा मात्र मोहिते अस्वस्थ झाले. येरझारा घालत असतानाच फोन वाजला. त्यांनी उत्सुकतेनं घेतला.

व्यथा

लेखक सुरताल यांनी रविवार, 19/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
सारे ओळखीचे डोळे पुसून गेले! होते अनोळखी ते गाली हसुन गेले! ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की, माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले! माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली घायाळ काळजाला विंचू डसून गेले! डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले! जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! सुरताल
Taxonomy upgrade extras

गेले ते दिवस

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 18/10/2008 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
"रांव रे, आपा येतां साईट दी" (थांब रे,आपा येतोय साईडला रहा) असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत. त्याचं असं झालं,आपांना-माझ्या काकाना- धंद्या मधे जास्त दिलचस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस -प्यासींजर व्हीएकल- विकत घेतो.त्यावेळी साधारण २०० रुपयाना -म्हणजे आताचे ४० हजार रुपये झाले अर्थात त्यावेळी गाड्या इंपोर्ट होत असत म्हणा-विकत घेतली.अण्णाचं लग्न झालं तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी निर्वतली होती.

श त्रू

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 18/10/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
घाटामधल्या वाटेवरती तो गोसावी बसतो मारून हाक, दावून धाक नजरेत विखारी हसतो खोचून त्रिशूल वाटेवर पसरे अर्धफाटकी भगवी छाटी चावुन दात, धावून जात निष्पाप जनांच्या पाठी मी जाई जेव्हा घाटामधूनी भित भित वेगात, हटकून मारील, वाटे मजला अन् लोळवील क्षणात आज ही असला दिवा भितीचा क्षण आला एकांती, पण मी चालत जाईन वाटेवरुनी दगड दुधारी घेऊन हाती हळूच पाहिले, धीर करुनी निजलेल्या त्या राक्षसाकडे पण, धुळ माखला चेहरा दिसला थिजले डोळे, तोंड वाकडे फाटुन गेल्या छाटीवरती त्रिशूल वाकूनी पडला होता पोटामधूनी निघुनी पाठी रक्ताचा ओघळ अडला होता मी हळहळलो, नकळत माझ्या गालावरुनी अश्रू गेला ? घाटावरच्या व

देहबोली...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 18/10/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मी जेव्हापासून मराठी आंतरजालावर फिरू लागलो तेव्हापासून बरीचशी संकेतस्थळं आणि ब्लॉग्ज नजरेस पडले. या सगळ्याठिकाणी निरनिराळ्या व्यक्तिंनी हाताळलेले विषय खरोखर खूपच वैविध्यपूर्ण आहेत. काही म्हणता काही बाकी ठेवलं नाहिये पब्लिकने. पण एक विषय मात्र असा आहे की जो खुपदा हाताळला जातो. आणि त्या विषयावरच्या चर्चा खरोखर प्राणपणाने लढवल्या जातात (एक मुंबई-पुणे वादच या वादाला मागे टाकू शकेल :) ) तो विषय म्हणजे.... बरोबर ओळखलंत, भाषा आणि भाषेशी संबंधित शुद्धलेखन वगैरे उपविषय. या सगळ्या चर्चा अतिशय रंगतातच. सध्या मिपावर चालू असलेली 'संस्कृत' बद्दलची चर्चा घ्या किंवा शुध्दलेखनावरच्या विविध चर्चा घ्या.

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.

वादळ...

लेखक हर्षदा विनया यांनी शनिवार, 18/10/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ,घोंघावणारे, पूढेच सरसावणारं, अश्रूच्या थारोळ्यात हळूच डोकावणारं! वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ बाहेरेंच,वेगाने त्वेषात येणारं, सगळंच उध्वस्त करून सोडणारं, कि वादळ आतलं,अलगद येणारं, कूरवाळणा-या हातांनीच ओरबाड्णारं ! वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ,तूझ्यापूढे जगाला ठाकणारं, लक्तरे उडवून,मग तमाशा पाहणारं, कि वादळ,तूलाच तूझ्यासमोर ठाकणारं, आत्मपाशांच्या गूंत्यातच गूंतवणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ, तूला नकळत उडवून नेणारं, वाहवत-वाहवत,रानात नेऊन सोडणारं, कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? व

शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच

लेखक टारझन यांनी शनिवार, 18/10/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच
ओमार दादा मिश्ते शेंच्युरी मारो ( कृ भावना को समझो ) .... ९४ रन नाबाद .. शेन वॉटसन चा एक अखुड टप्प्याचा चेंडू .. तो खाली वाकला , पण अपेक्षे प्रमाणे चेंडू उसळलाच नाही ,, चेंडू अगदी बॅट जवळनं गेला .. आमचं अँड्रिनलीन पुन्हा वाढलं ... बराच वेळ गेला (मी तो पर्यंत जरा बाहेरची हवा खाऊन आलो) .. परत आलो तेंव्हा त्याने सोळाव्या कसोटी शतकानंदर माझ्या कडे बॅट दाखवून मला अभिवादन केलं .. मी फारच खुष झालो ... आनंद गगनात मावेना ...

निरोप......

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 18/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप...... राहिली न शाश्वती आता कुणाला कुणाची..... कशास मग काळजी करावी जीवाची...... जीवनाच्या वाटा अशा काटेरी झाल्या.... आशा मनीच्या मनातच निमाल्या...... साव ली ही आता वाटे रणरणत्या उन्हा ची कशास मग काळजी करावी जीवाची......... शब्द ही न येती भेटीस आता.... खातो किती म्हणती हा जगाच्या ला ता....... आधीच प्रेत यात्रा निघाली आत्म्या ची...... कशास मग काळजी करावी जीवाची....... अखेर चा निरोप घेईन मी म्हणतो उसन्या आवाजाने मी गुणगुणतो.... न लाज राहिली मज आता जनाची...... कशास मग काळजी करावी जीवाची.......
Taxonomy upgrade extras

बातमी

लेखक mina यांनी शनिवार, 18/10/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
जालना तालुक्‍यात २३० कुपोषित बालके -१७ Oct९ber २००८ जालना- जिल्ह्यात श्रेणी तीन व चारमधील कुपोषित बालकांची संख्या सर्वांत जास्त २३० एवढी आहे. त्यातही जालना तालुक्‍यात कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव भेले यांनी दिली. गुरुवारी (ता. १६) येथील (कै.) शंकरलाल मुंदडा मतिमंद बालगृहातील कुपोषित बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यात श्रेणी तीनची- २०८ आणि श्रेणी चारची-२२ कुपोषित मुले आहेत.