कधी कधी
कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगांनाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत
कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे
कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे
कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..
कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे..
मिसळपाव
९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.
त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं...
साहित्य
१/४ किलो कोलंबी
१ टी स्पून तिखट
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून मेथी पावडर
१ टी स्पून मोहरीचे कुट
१/४ टी स्पून हिंग
२ टी स्पून आलं, किसून
१/२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून विनेगर
१ टे. स्पून तेल
मीठ चवी प्रमाणे
कृती
कोलंबी साफ करुन त्याला हळद आणि तिखट लावून अर्धा तास मुरवत ठेवा. कोलंबी मुरली की एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात आल्याचा किस घालुन १ मिनिट परता.