Skip to main content

म्हणून.....

म्हणून.....

Published on 05/02/2010 - 12:37 प्रकाशित मुखपृष्ठ
माझे एक सीनिअर आणि एक उत्तम कवी असलेले पण माझ्यासारख्या नवख्या कवीला मित्र मानणारे श्री.महेश घाणेकर यांनी मला तू "मुक्तछंदात पण लिही , उगीचच यमकात स्वतःला जखडून घेऊ नकोस !" असे स्पष्टपणे सांगितले.ते सांगणे आज जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यात उतरले असावे अशी दाट शंका मनात आहे.....बघा , जमलय का ते ! म्हणून..... ए , तुझ्या जाड वेणीवर मस्त गजरा माळू ? नाही, मला काही हौस नाहिये , ती वेणी एकटीच उदास वाटत्येय ना, म्हणून ! रात्रभर मोगर्‍यातली ती वेणी सोडू? मोकळे करू का लांबसडक काळेभोर केस तुझे? नाही , न पिता नशा चढावी ना , म्हणून ! श्रावणसरीत अबोली साडीत भिजलेली तू , थरथरत्या तनूला कवेत घेऊ का? नाही , 'पाऊस केंव्हा "जीवाचा मैतर" वाटतो ?' हे कळावं ना, म्हणून ! घरच्या सुती साडीत , श्रांत अशी तू डोळा लागलेल्या तुला निरखत बसू? नाही , "निरागसता" कशी दिसते? हे दिसावं ना , म्हणून ! तुझा माझा लग्नातला फोटो , त्यातील तुझ्या ओठांवर ओठ टेकू ? नाही , 'खरं प्रेम कसं असतं?' हे नातवांनी हळूच बघावं ना , म्हणून ! त्या शाल्मलीच्या डोळ्यांवरून माझी नजर हटत नाहिये ! त्या तू दान दिलेल्या डोळ्यांत काजळ घालू ? नाही , तुझ्या (फक्त या) डोळ्यांना माझीच नजर लागेल ना ! ......स् स् .....म्हणून गं सखे , .....म्हणून !
लेखनविषय:

याद्या 1560
प्रतिक्रिया 4

खूप छान आहेत काही भावना व्यक्त केलेल्या. कविता चांगली जमलीये. २ सूचना - "......स् स् ...." च्या जागी "......च च ...."" घालता आलं तर मला जास्तं आवडली असती कविता. ""......स् स् ...." ने बराच खाजगी "टोन" वाढला आहे अस उगाचच वाटत. दुसरी ही की - आपण द्वंद्व गीत कधी लिहीले नस्ल्यास त्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न फार कमी कवी करताना आढळतात. ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

In reply to by शुचि

शुचिताई , छान सल्ला आहे द्वंद्व गीत लिहिण्याचा , प्रयत्न नक्के करुया ! एक प्रकटीकरण : (स्पष्टीकरण नव्हे !) स् स् .....अहो, त्यच्या बायकोचे डोळे मृत्युनंतर दान दिले गेले आहेत आणि जिला दान दिले गेले आहेत तिच्याकडे बघून त्याला तिची (बायकोची) आठवण होत्येय म्हणून तो सिस्कार आहे ! चुकचुकण्याजोगी वाईट आठवण नाहिये ती आणि अगदी बरोबर बोललात , तो टोन खाजगीच यायला हवा होता म्हणूनच तसा वापरलाय्.....माझ्या बोलण्याचा राग नका हां मानू , आकसापायी नाही मी असे लिहिलेले , प्रामाणिकपणे त्याच भावना होत्या म्हणुन लिहिलय..... सप्रे

In reply to by उदय सप्रे

माझ्या डोळ्यात पाणी आणलात :( ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

छान कविता. बिपिन कार्यकर्ते