अर्घ्य
संध्याकाळ इतक्यात कशी झाली,
काही कळलंच नाही.
आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य
उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही.
आणि अचानक अंधार झाला,
मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा
केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा
एकएक करून त्याही विझल्या.
काव्यरस
मिसळपाव