Skip to main content

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

लेखक सुहास झेले यांनी शुक्रवार, 21/10/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा.

दोन प्रसंग

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 21/10/2011 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १: स्थळ: एका हाफिसातील क्यांटिन कर्मचारी१: काय रे कशी होती तुझी दिल्ली व्हिजिट? कर्मचारी२: अरे मस्त! फ्यामिलीला घेऊन गेलो होतो. काम फक्त २ दिवस होतं. बाकी २ दिवस दिल्ली त भटकलो क१: वा! आता मेट्रोमुळे भटकणं सोपंही झालंय नाही क२: हो यार! बर्‍याच वर्षांपूर्वी स्वतःच वाहन नसल्याने तिथल्या रिक्षावाल्यांना इतके पैसे दिले होते की त्यात नवी रिक्षा आली असती दोघे: हा हा हा क१: अरे त्या ट्रीपचा वेगळा अलाऊंस असतो ना? क२: हो तर म्हणून तर जातो.

पोरका

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 21/10/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तेजाचा तो पुत्र पोरका उन्मुक्तीच्या रचतो गाथा त्या असूयेने असह्य होता विव्हळते मग जग आता -- युयुत्सु

अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातील रंगीबेरंगी हेमंत

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 21/10/2011 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
ही चित्रे अ‍ॅडिरोन्डॅक उद्यानातल्या रंगीबेरंगी हेमंताची आहेत. एका वेगळ्या तंत्राने चित्रे काढायचा हा प्रयत्न आहे. चित्रे चालत्या गाडीतून काढली आहेत, पण अनावरणकाल मुद्दामून लांब ठेवलेला आहे (१/१५ ते १/३० सेकंद). असे केल्यामुळे ज्या वस्तूकडे डोळे बघत राहात होते (आणि त्यामुळे कॅमेरा त्या वस्तूचा मागोवा घेत होता), ती वस्तू त्यातल्या त्यात स्पष्ट दिसते, बाकीच्या वस्तू मात्र खरवडलेल्या दिसतात. यामुळे चित्राला गती येते. हा तंत्राला "पॅनिंग" म्हणतात. कॅमेरा : ऑलिंपस ई-५००. केंद्रमान, अनावरणकाल, छिद्रमान वगैरे वेगवेगळे.

जीवनाचे गाणे !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 20/10/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !
काव्यरस

गद्दाफी...लिबया....भारत......

लेखक मन१ यांनी गुरुवार, 20/10/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
गद्दाफी हा आतापर्यंतचा लिबयाचा प्रमुख धरला गेल्याची बातमी येत आहे. आता लिबया म्हणजे काय? लिबया म्हणजे उत्तर आफ्रिकेतले एक अरब राष्ट्र. Moor नावाचे इस्लामी योद्धे म्हणे ह्याच भूब्व्हागाच्या आसपासच्या भागातून आख्ख्या युरोपवर चढाई करत गेले होते. आख्खा स्पेन्,पोर्तुगाल ह्यांनी इथून जिंकला व काही शे वर्षे नियंत्रणात ठेवला. भूमध्य समुद्राच्या काठावर, दक्षिणेला आफ्रिका खंड सुरु होतो. तिथे दोन देश इजिप्त आणि लिबया अगदि strategic location वर आहेत. युरोप, मध्य्पूर्व आशिया व आफ्रिका ह्या तीन्ही भूभागांची व समाजाची आपापली वैशिष्ट्य आहेत.

तुझ्या नजरेचा बाण !!

लेखक वपाडाव यांनी गुरुवार, 20/10/2011 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
.... तुझ्या नजरेचा बाण, माझ्या दिलाची कमान , कधी करतो गं पार, याची मला नाही जाण ! ............... तुझी नाजुक ती डोळं, ............... रंग त्यांचा नीळाषार, ............... जेव्हा पाहती सावध, ............... होई मी तर घायाळ ! तुझी टपोरी ती अक्ष, त्यांचा तिरपा कटाक्ष, झाड - झुडुप न पक्षी, सर्व देती याची साक्ष ! ...............
काव्यरस