Skip to main content

शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत?

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 14/12/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
(सूचना:- या किंवा अन्य कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीच्या लेखातील मतांशी किंवा शिफारशींशी मिपा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही.) शेअरबाजारातून नेहमीच चांगले पैसे कसे मिळवावेत? तुमच्या मनात शंका येत असेल कि सध्या शेअरबाजारापासून दुरच राहीलेले बरे कारण गेले जवळपास एक वर्ष सेन्सेक्स १५५०० ते १८००० या दरम्याने वरखाली होत आहे. पण खरं म्हणजे हाच काळ शेअरबाजारातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.

माझं गाव

लेखक स्पा यांनी बुधवार, 14/12/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव मु पो . -नवेघर, आडिवरे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी हा पत्ता इतकी वर्ष नुसता ऐकून होतो, स्वतःच गाव असूनही फक्त एकदा लहानपणी ४ ते ५ तासांसाठी गेलो असेन. बास त्याव्यतिरिक्त आपल गावाला काहीच नाही , हेच मनावर ठसवले गेले होते.पण अचानक तिथल्या घराच्या व्यवहारासंबंधी कोर्टाची बोलणी सुरु झाली, तशी रीतसर नोटीस आमच्या काकांनी पाठवली, काही कागदपत्रांवर आमच्या सह्या आवश्यक होत्या आणि ती संबंधित कागदपत्र मिळवण्याची जबाबदारी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर टाकली. आता गावाला जाणे आलेच. अचानक ठरल्याने रेल्वेने जाण्याचा प्रश्नच नव्हता.

दासबोध अभ्यास संकेतस्थळ उदघाटन आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

लेखक विटेकर यांनी बुधवार, 14/12/2011 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || नमस्कार, मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे.

घेऊ कसा उखाणा ..?

लेखक मनीषा यांनी बुधवार, 14/12/2011 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
बरं का मंडळी ...... एकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली पायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली । फेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली बिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली । जिलब्यांची रास .. श्रीखंडाचा घास रंगीत रांगोळीची .. पंगतही सजली । नाव घ्या, नाव घ्या .. मंडळी बोलली नवी नवी पाटलीण .. गालातच हसली । घेऊ कसा उखाणा .. (तिला) कोडं पडलं नवं कोणाचं नाव ? .. आणि कसं बाई घ्यावं? । सगळे म्हणती बाई .. लाजू नको काही नाव घे झोकात .. आणि सांग काही-बाही । पाटलीण बोलली लाजून .. घेते मी नाव मान तुमचा राखून ताई, माई, अक्का जरा ...

ही जिवाला आस आहे

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 14/12/2011 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/20071 , http://misalpav.com/user/7236 आणि http://misalpav.com/user/707 जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे. चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्या

भरारी

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 14/12/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार हा असा, काळोखल्या दिशा तुजवीण सख्या रे, दयनीय ही दशा मारू कुणा मी हाका तू देवाघरचा वासी सांगू दुखः कुणाला तू केवळ मनात वससी दाखवू कुणाला मनातली स्वप्ने तुजसवे पाहिलेली जो तो हळहळे क्षणभर नि दाखवे सहानुभूती नको खोटा आधार कुणाचा जगण्यासाठी तुझ्या प्रेमाच्या बळावर मरीन भरारी मोठी
काव्यरस

श्री. तुकोबारायांचे हस्ताक्षर

लेखक शरद यांनी बुधवार, 14/12/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.तुकोबारायांचे हस्ताक्षर साठेक वर्षांपूर्वी श्री. परांजपे यांनी देहूच्या श्री. तुकारामांच्या वंशजांकडून " भिजलेल्या वहीचे अभंग " नावाचे सातएकशे अभंग मिळवून ते प्रसिद्ध केले होते. आज ते दुर्मीळ असल्याने " वरदा प्रकाशन " पुनर्मुद्रित करत आहे.

अर्घ्य

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 14/12/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात मागे ठेवून जातात एक काळपट तवंग आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली. त्याच किना-यावर त्याच लहरींना आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं श्रद्धा म्हणून नाही, वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.
काव्यरस

झाड

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 14/12/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ|| गेली कित्येक उन्हाळे सावली देत आहे उभा; कोरडे ठेवीले वाटसरूंस पावसाळ्यात सुध्दा; हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१|| खोड जुन वाढले फांद्या जुन्या झाल्या; त्या मुळी न मातीत नव्याने रूजल्या; नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२|| कधी गळते दुजे पान पहिल्यासारखे; मातीत मिळूनी होते ते मातीसारखे; त्या पानांसारखे माझेही पान होई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३|| - पाषा

ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 13/12/2011 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :) मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद! १.