काय करावे या किड्याला ?
काय करावे या किड्याला
साला लिहिता लिहु देत नाही
डोक्यात बरेच येत असते
पण डोळ्यांना पाहु देत नाही.
सुचत असते पान उघडल्यावर
'हे'...'हे'...लिहायचे..
पण बसले एकदा लिहायला
की..ते-तेच का रहायचे..?
काव्यरस
महाभारताच्या युद्धात १६ वर्षीय अर्जुनपुत्र अभिमन्यू याने कौरवांच्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन, कर्ण, जयद्रथ इत्यादी कौरवांच्या महारथींना तोंड देत तरुण वयात एवढा मोठा पराक्रम केल्यामुळे भारताच्या इतिहासात अभिमन्यू अजरामर झाला. अधर्माच्या विरोधात धर्माने दिलेल्या या लढाईत धर्मासाठी अनेक रथी-महारथींनी पराक्रम केला. त्यांच्या पराक्रमामुळेच धर्माचा जय झाला.
कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी पांडव सेनेकडून पराभव झाला.