समजावल आहे मनाला आता
मागे वळुन बघायच नाही.
जरी आला विचार अंतरी
आठवणीत अडकायच नाही.
झाली जखम मनाला तरी
जखमी होऊन रडायच नाही.
आपल सुख मिळाव आपल्याला तरी
हे जरी असल खर तरी
जगात कोणी कुणाच नसत
हे खोट समजायच नाही.
असेल ताकद लढायची तर
हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन
परत कधी खचायच नाही.
मागे वळुन बघायच नाही....
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1525
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ..
फारच छान सुंदर रचना
झक्कास........
In reply to फारच छान सुंदर रचना by लीलाधर
वा! छान आहे कविता. लिहीत रहा
आभार व धन्यवाद