Skip to main content

अधिजनुक शास्त्र - डॉ. जगन्नाथ दीक्षित (एम०डी०) यांचा प्रतिसाद

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 03/04/2018 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, काही दिवसांपूर्वी मी या ठिकाणी अधिजनुकशास्त्रावरील लेखावर बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी डॉ० जगन्नाथ दीक्षितांचा उल्लेख केल्यामुळे या चर्चेचा दूवा डॉ० दीक्षिताना पाठवला होता (ते या समूहाचे सदस्य नाहीत). ही चर्चा वाचल्यावर त्यांच्याकडून आलेले विस्तृत उत्तर मी जसेच्या तसे पुढे देत आहे. मला आणखी काही गैरसोईची सत्ये सांगायची होती पण ती नंतर कधीतरी... -- युयुत्सु ON MY EPIGENETICS POST COMMENTS RECEIVED FROM J.K.Dixit, M.D: Rajeev Upadhye, asked me to look into his write up for this forum on epigenetics.

बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

लेखक साहना यांनी मंगळवार, 03/04/2018 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही. "Education in India - Scope for Reforms and Right to Education" A talk and discussion with Prof.

गुलामीची १२ वर्षे..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 02/04/2018 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! बर्‍याच प्रयत्नांनंतर मी एक पुस्तक अ‍ॅमॅझॉन किंडलवर टाकले आहे. पुस्तकाचे नाव आहे... गुलामीची १२ वर्षे. मूळ लेखक आहे सालोमन नॉरथप आणि मी त्याचा अनुवाद केला आहे. पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जरा समजून घ्यावे. ...हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षा ही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसर्‍याची मालमत्ता झाला.

लेक...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 02/04/2018 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
सोनसावळी स्वप्ने सगळी सुखेच लेवुन आली सोनपावले कुणा परीची हळुच उमटली दारी कुणी रेखिल्या त्या गालावर मोरपिसांच्या ओळी गाल गोबरे, गोड गुलाबी राजकुमारी प्यारी नाजुक काया प्राजक्तासम कुरळे कुंतल भाळी अप्सरा कुणी, शापभ्रष्ट ती मदनशराची स्वारी लेक असावी एक गोडशी नको धनाच्या राशी कुशीत घेवुन तिज सांगावी रोज कहाणी न्यारी हातात तिचे बोट कर्दळी जबाबदारी खाशी कोण परी ही? वळता नजरा, सुख वाटावे भारी तिने रुसावे, रुसुन बसावे, कासाविस मी व्हावे डोळ्यात तिच्या मला दिसावी माझी सौख्ये सारी वृत्त : लवंगलता ( मात्रा : 8 8 8 4 ) © विशाल कुलकर्णी

वादळ

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 02/04/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ उरी फुटते रात्र उठे अंधारी प्राणात पेटे वादळ क्षितीजाचे रंग असुरी शुभ्र चांदण्या जाळून काळोख पसरे चहुकडे प्रकाशाच्या तुकड्यासाठी एक छाया तडफडे पानांच्या हिरव्या देहातून हुंकारते वाऱ्याचे काळीज घायाळ त्या सुरांभोवती श्वासांचा हलतो आवाज मंद शुक्राचा भास भुलते चंद्राची वाट निद्रेत आज फुलांच्या उसळते दु:खाची लाट
काव्यरस

Dead Man's Hand - 2

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
"मालवणी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पेक्टर महाडीक बोलतोय..." "साहेब, मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या उलट्या बाजूला एक मुलगी मरुन पडली आहे. तुम्ही लवकर या!" महाडीक पुढे काही बोलण्यापूर्वीच फोन कट् झाला होता. "च्यायला, पोलिसांना पूर्ण माहिती का देत नाहीत हे लोक? डिस्ट्रीक्ट, जीप काढा.. डिटेक्शनवाले कोणकोण आहेत बघा..." सुमारे वीस मिनीटांत इन्स्पेक्टर घाटे, सब् इन्स्पेक्टर महाडीक, हेड कॉन्स्टेबल राणे आणि इतर चार शिपाई यांच्यासह सायरनचा आवाज करत पोलिस जीप मढ आयलंडच्या दाणापाणी बीचच्या टोकाला येऊन थांबली.

Dead Man's Hand - 1

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 02/04/2018 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे दोनचा सुमार .... पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र .... भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे .... किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता .... अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार .... रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार .... "एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..." कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला माणूस म्हणाला. तो बहुतेक सर्वांचा प्रमुख असावा.

गणपत वाणी, सतत मागणी

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 02/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

ग्रामीण पेहराव

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 02/04/2018 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती. आम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता.

समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती

लेखक दुर्गविहारी यांनी सोमवार, 02/04/2018 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
‘शुभमंगल सावधान’ हे शब्द कानावर पडताच राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला, आणि त्याच्या पायाला जी भिंगरी लागली ती आयुष्यभर! एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा या एकाच ध्येयाने तो अक्षरश: भारतभर हिंडला. कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरीसुद्धा भ्रमंती, देशाटन चालूच होते. विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते. समर्थ रामदास स्वामींनी बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर संबंध भारतभर पायी भ्रमण करून हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून तो दक्षिणेस रामेश्वरापर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिली.