Skip to main content

पाताळ लोक!

लेखक लई भारी यांनी शनिवार, 23/05/2020 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी सलग एक सिरीज बघता आली. लॉकडाऊन सुरु झाल्यावर कामातून वेळ मिळाल्यावर काही मराठी, हिंदी सिरीज बघून इंग्रजीच बघायच्या असं ठरवलं होत. मग अलीकडे या प्राईम वरच्या सिरीज ची जाहिरात बघितली आणि सुरुवातीची परीक्षणं पण चांगली असल्यामुळे बघायचं ठरवलं. २-३ दिवसात मिळून ९ भाग संपवले(प्रत्येकी ४० मिनिट साधारण). विशेष म्हणजे बॉलिवूड मानसिकता असल्याने अधांतरी शेवट आपल्याला आवडत नाही आणि वेब सिरीज म्हटलं कि पुढच्या भागाची सोय म्हणून एकदम अर्ध्यातच सोडून देतात तो प्रकार इथे नाही आहे. आणि प्रश्नांची‘उत्तर’ तर लागतात आपल्याला; थोडं फार ओपन एंडेड ठीक आहे पण अगदीच डोक्याला शॉट नको होतो.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 23/05/2020 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५

लेखक श्रीकांतहरणे यांनी शनिवार, 23/05/2020 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क.

पाऊसवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 22/05/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थीर घरांच्या ओळी नदीच्या हिरव्या काठी. कुणी धरून बसते ओंजळ पाऊस पडण्यासाठी. पाऊस प्राचीन इथला आकांत केवढा करतो. नदीच्या पैलतीरावर काळ जसा गहीवरतो. काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? -कौस्तुभ

सिम्पल (पा)फाइन ऍपल केक!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 22/05/2020 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
नाम माहात्म्य..केकामध्ये पाइन एपलला फाइन करून म्हंजे रस करून वापरला आहे.. म्हणून अशे णाव दिले! साहित्य:-मैदा 300 ग्रॅम, पिठीसाखर दीड वाटी(कडक गोड हवे असल्यास अडीच वाटी),बेकिंग पावडर व बेकिंग सोडा 1चहाचा चमचा, 1चिमूट मीठ, अर्धी वाटी सनफ्लॉवर किंवा सोयाबीन तेल,अननस रस अर्धी वाटी, अननस इसेन्स 1चमचा, दूध अर्धी वाटी, आंबट दही 1ते 2चमचे. कृती:- मैदा,पिठीसाखर, बेकिंग सोडा ,बेकिंग पावडर,मीठ हे सर्व "एकत्र करून" मग चाळून घ्यावे.

दोसतार - ४७

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 22/05/2020 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक एक गार वार्‍याची झुळूक आली. डोक्यावर लिंबाचे पान पडले म्हणून वर पाहिले. काळेभोर आकाश पूर्ण चांदण्याने भरले होते. आकाशात दिवाळी होत असावी इतके. तिथे वीस ठिपके वीस ओळी पेक्षाही मोठ्टी रांगोळी काढलेली होती. मी तानुमामाला ती रांगोळी दाखवली. तानुमामा म्हणाला आपल्या रांगोळीला उत्तर म्हणून आज्जी तेथे रांगोळी काढतेय . खरंच असेल ते. नाहीतरी इतकी सुंदर रांगोळी आज्जीशिवाय दुसरे कोण काढणार होते.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46822 अंगणात दिवाळीचा किल्ला बनलाच नाही. अंगणात फटाके ही वाजवावेसे वाटले नाही. नुसता कचरा.

महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 22/05/2020 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी भगवद्गीता १०.२० या श्लोकाचा उल्लेख केला होता: जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात (श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०) पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (त्यात हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो).

पहिलीच माझी कविता...

लेखक कादंबरी... यांनी गुरुवार, 21/05/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: पोहे मात्र सुरेख झाले https://misalpav.com/node/46836 आहेत शब्द साधे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली उसने घेतले शब्द, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली वाचले नाही कोणी, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली नाही केली वाहवा, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली असतील चार कडवे, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली पहिलीच माझी कविता, म्हणून काय झालं कविता मात्र सुरेख झाली