आपणा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी, सरकारच्या निर्देशानुसार आजकाल विविध मोबाईल कंपन्या, सायबर कॅफे आणि इतर अनेक सेवा या प्रत्येक ग्राहका कडे रंगीत छायाचित्र तसेच छायाचित्र असलेले ओळखपत्र (पॅन कार्ड) आणि रहिवासाचा पुरावा असे अनेक कागदपत्रके मागतात. नाहीतर सेवा बंद करुन टाकतात. काही मोबाईल कंपन्यामध्ये तर खात्रीशीर रित्या असे घडते आहे की, तीन वेळा योग्य कागद पत्रके, फोटो जमा करूनही कागद पत्रके अपूर्ण असल्याच्या नावाखाली सेवा बंद क्रण्यात येत आहे. म्हणजेच ही कागदपत्रेके गहाळ होत आहेत. सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात?