Skip to main content

भीषण……!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 22/03/2013 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या मित्रांशी गेल्या आठवड्यात मुद्दाम एक विषय काढुन संवाद साधला - त्या त्या ठिकाणी असणा-या पाण्याच्या उपलब्धतेचा विषय ! पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा !!! अंगावर शहरा आणणारी माहिती मिळाली. महाराष्ट्रातला दुष्काळ किती भीषण आहे याची कल्पना फक्त बोलण्यातून मला समजली. रोज अनुभवत असतील त्यांची परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पना करवत नाही. आमच्या नाशिक मध्ये किंवा पुण्या मुंबईत आज पाणी उपलब्ध आहे. आणखीही काही भागात महारIष्ट्रात असेल. त्यामुळे आम्हाला पाणी नसण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. माणसाना पाणी प्यायची मारामारी आहे.

शब्द

लेखक भावना कल्लोळ यांनी शुक्रवार, 22/03/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी शब्द भेटले मला, विचारले त्यांना का रे हल्ली जास्त येत नाही तुम्ही माझ्याकडे? तर म्हणाले, आम्ही तर रोज येतो, पण तूझेच लक्ष नसते आमच्याकडे, तुझी सखी तर अबोली आहे ना , पाहावे तर रोज असते तुझ्या ओठावर विसावलेली, मग आम्ही कुठे राहणार ? मग हळूच तुझ्या डोळ्यात विसावतो, पण तू पण अशी आहेस ना, तुला उमजतच नाही, कोणी सोबत असताना शब्दांनी बोलतच नाहीस. मग हळूंच आम्हाला वाट करून देतेस, एकटी असताना … किती वेळा पहिले आम्ही स्वतःला आसवात बदलताना …

अशीही आणि तशीही

लेखक इनिगोय यांनी शुक्रवार, 22/03/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म देता देता जन्म घेणारी शब्द नि अर्थ जुळवणारी उंचच उंच गर्दीमध्ये बोट घट्ट धरणारी चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू गिरगिर, भिरभिर.. खुलणारी कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारी कधी अंग चोरून बसणारी नको असतानाही असणारी काही आयुष्यभर दिसत, भासत हुलकावणी देत राहणारी उणे अधिक मांडता मांडता हातचा म्हणून राहणारी अन् ती.. आभाळागत सदैव जागी फक्त नजरेत सामावणारी जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी ...नाती!

लहान मुलांच्या बाबतीत

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 22/03/2013 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मूल गाढ झोपलय. कविला वाटतं त्याच्या झोपेत अजिबात व्यत्यय येऊ नये. म्हणून तो कुणाकुणाला काय काय सांगतो पहा. चंद्राला म्हणतो, नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितिजावरती चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू किंवा यक्ष-पर्‍यांनो स्वप्‍नीं नाचून नीज नका चाळवू म्हणजे अगदी स्वप्नात जाऊन सुद्धा कुणी त्याची झोपमोड करू नये. किती खोलवर विचार केलाय कविने. लहान मुलांची काळजी घेताना इतका खोलवर विचार व्हायला हवा. पण उदाहरणे मात्र उलट दिसतात. परवा एक प्रसंग पाहीला.

नौदलातील आयुष्य -२

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 22/03/2013 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
ही विक्रांत वरील सत्य गोष्ट आहे. १९९० सालच्या मे महिन्यातील. आम्ही गोव्याच्या आसपास समुद्रात युद्ध सराव करीत होतो. एकदा दुपारी १२.३० ते १३.३० अशा जेवणाच्या वेळेत मी जेवून आमच्या विक्रांतच्या ब्लू रूम मध्ये बडीशेप चघळत होतो तेंव्हा नौदल पोलिस अधिकारी उमेश चंद्रा माझ्या बाजूला बसला होता. दीड वाजण्याच्या ५-१० मिनिटे अगोदर तो मला म्हणाला एका मूर्ख सैनिकाची शिस्तभंग कारवाई करायची आहे तेंव्हा मी आता निघतो. मी त्याला सहज विचारले काय केस आहे? तो म्हणाला एक बिनतारी विभागाचा सैनिक विचित्रपणे वागतो आणि काम नीट करीत नाही. मी विचारले काय करतो.

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...

लेखक मन यांनी शुक्रवार, 22/03/2013 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि फटाके उडावताना काळजी घ्या. . धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे. आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा. . दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :) . बोला कॉकटेलच्या बैलालाsssss (एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.) --मनोबा

गपगार

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 22/03/2013 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
बामनाची ईदद्या ग्येली. म्हंजे म्येली. शेताला गेल्ती सक्काळी. हा-या धावत आला सांगाया. मोटी माणसं ग्येली पळत. म्याबी चाल्ली व्हती. आयनं पायलं, म्हन्ली, “मुकाट्याने निमीकडं जा. तिथं दिसलीस तर लाथ घालीन.” आमच्या घरातली मान्सं सूद्द बोल्तेत. म्या येकलीच खेडवळ. ईदद्या माज्याशी चांगली व्हती. बोलायची न्हाई जास्ती, पण कायबाय द्यायची मला. गजगं; फुटकी काकणं; चिचोके; गूळश्यांगदाणं; आवळं; जांभळं; – समदं फुकाट. म्याबी तिला मोराचं पीस दिल्त येकडाव. हसली व्हती. “आता ईदद्याचं भूत व्हनार,” जग्या म्हन्ला. “हाडळ”, भान्या म्हन्ला. “हाडळ कशापायी?

तेरी कौनसी है मंझील

लेखक विकास यांनी शुक्रवार, 22/03/2013 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
"बीस साल बाद" या चित्रपटातील "कही दीप जले कही दिल" या अवीट गोडीने म्हणलेल्या पण गुढ गाण्यात गायीका आणि चित्रपटातील नायीका, वीस वर्षां नंतर परदेशातून गावी आलेल्या नायकाला सावध करताना त्याला "तेरी कौनसी है मंझील" म्हणत असते. आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे यंदाच्या १२ मार्च ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटांना वीस वर्षे झाली आणि वीस वर्षांनंतर आजच्या (मार्च २१) दिवशी त्या स्फोटातील आरोपींना अखेर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिली...

बुर्खा

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 21/03/2013 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
हरेक माणूस नागमोडी कुणीच नाही सुतासारखा सुरी तयाच्या बगलेमध्ये जरी दिसे हा दुतासारखा ! बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या हरेक किस्सा मृतासारखा गळ्यास येता : विचारवंत बनून जातो बुतासारखा ! मृदेत किल्ला कशास बांधा विरून जातो मुतासारखा.. फिरून व्योमी तिथेच येतो जन्म असा हा भुतासारखा ! - (C) डॉ.सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/03/blog-post_21.html

नाचणीचे सतू.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 21/03/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)दोन पेले नाचणे. २)अर्ध्या नारळाचे दूध्.(घट्ट व पातळ.) ३)किसलेला गूळ. ४)चिमूटभर मीठ. ५)काजू किंवा भाजलेले शेंगदाणे. ६)दिड चमचा साजूक तूप. कृती :-नाचणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे.सकाळी बारीक वाटून गाळून घ्यावे.चोथा येईल तो टाकून द्यावा. गाळून उरलेल्या पाण्यात अजून पाणी घालून ६-७ तास ठेवावे म्हणजे नाचणीचे सत्व खाली बसेल व पाणी वर राहिल.वरचे पाणी हळू काढून टाका.आता जे सत्व राहील त्यात नारळाचे दूध,किसलेला गूळ. काजू व मीठ घालून ढवळून घ्या.गूळ विरघळला कि हे मिश्रण मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.सतत हलवत रहा. जरावेळाने मिश्रण घट्ट होत येईल्