हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
काव्यरस
मिसळपाव
काही कामानिमित्ताने भोपाळ येथे एका परिषदेसाठी गेले असता आप मराठवाडासे आए हो ना? जहा शेतकरी आत्महत्या करते है असा प्रश्न एकाने विचारला तेव्हा रझाकारांशी झुंजणारा मराठवाडा या ओळखीपेक्षा शेतकरी आत्महत्या करणारा अशी नकोशी ओळख देशपातळीवर मराठवाड्याची झाली असल्याची जाणीव झाली. निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४७ रोजी मराठवाडा मुक्त झाला.