Skip to main content

हे काय कमी काय?

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 16/09/2015 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

बाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.

पाऊस - वेगवेगळे रंग

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 16/09/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. भुरका-भुरका पाऊस पडत होता. भुरक्या पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंद हि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंब हि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली. असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला.. किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो. हायसं वाटल.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

अनुशेषाचा मुक्तीसंग्राम

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 16/09/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनुशेषाचा मुक्तीसंग्राम मुक्तीसाग्राम काही कामानिमित्ताने भोपाळ येथे एका परिषदेसाठी गेले असता आप मराठवाडासे आए हो ना? जहा शेतकरी आत्महत्या करते है असा प्रश्न एकाने विचारला तेव्हा रझाकारांशी झुंजणारा मराठवाडा या ओळखीपेक्षा शेतकरी आत्महत्या करणारा अशी नकोशी ओळख देशपातळीवर मराठवाड्याची झाली असल्याची जाणीव झाली. निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४७ रोजी मराठवाडा मुक्त झाला.

अकबर - बिरबल (मेहुण्याची शिफारस)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 16/09/2015 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
[दृश्य : अकबराच्या लाडक्या बेगमच्या महालातील सुंदर शयनकक्ष. बेगम अकबर बादशाची वाट पाहत पलंगावर फळांचे ताट समोर ठेऊन त्यातील सफरचंद चाकूने कापीत आहे.

भवताल

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 16/09/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवं घर भर रहदारीच्या रस्त्यापासुन म्हटलं तर आत, म्हटलं तर जवळ असं होतं. किल्ल्याचे बुरूज असावे तशा दोन दुमजली इमारती रस्त्यावर तोंड करून उभ्या होत्या, त्यांच्या मधून घराच्या आवारात येणारी वाट होती. घराच्या आजुबाजुला लहानमोठे कारखाने, शेजारी मुन्सिपाल्टीची बंद होऊ घातलेली एक सुस्त शाळा, समोर वेगवेगळी दुकानं, डोक्यावर एक लोकप्रिय इस्पितळ आणि मागच्या बाजुला जरा लांबवर दिसणारं मुसलमानांचं कब्रस्तान असं सेटिंग होतं सगळं. शिवाय समोरचा रस्ता ओलांडला की ख्रिश्चन मिशनचे कंपाऊंड. त्यामुळे सर्व थरातल्या लोकांचा राबता त्या भागात असे.

हि चिकन थाळी कोणची ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/09/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
१) गेल्या मे महिन्यातील 'खाद्यपदार्थ छायाचित्र चढवा' अभियाना दरम्यान खालील छायाचित्र विकिमीडिया कॉमन्सवर कुणीतरी चढवले. त्यांनी चित्र संचिकेस (फाईलला) नाव Gavara Chicken Bhakari.jpg असे दिले आहे. यातील Gavara हे 'गावरान'चे त्रुटीयूक्त लेखन असेल का ? कि गावरा/गवारा नावाचा काही चिकन प्रकार महाराष्ट्रात आहे आणि आज पर्यंत ऐकण्यात नाही ? हा वेगळा पदार्थ असेल तर कुणी रेसिपी देऊ शकेल का ? २) छायाचित्रातील पांढरा वर्ख असलेला पदार्थ कोणता असेल ? खिर असण्याची शक्यता आहे का ?

"आणि मग एके दिवशी.." (नसीरुद्दिन शाहचे आत्मचरित्र)

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 16/09/2015 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
नटनट्यांची आत्मचरित्रे म्हटली की ती खमंग मसालेदार गॉसिपने भरलेली असणार असा एक रूढ समज आहे. काही अंशी तो खरा असेलही. पण त्याच्याशी फक्त अभिनेता असण्या-नसण्याचाच संबंध नसतो. प्रामाणिकपणा आणि वाचनीयता हे दोन गुण कोणत्याही आत्मचरित्रात असावे लागतात आणि सगळ्यांना ते जमत नाही. परिणामी ती रटाळ, नीरस आणि लबाड होऊन जातात. खासकरून राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे. सत्यकथनाची हिम्मत नसेल तर फिल्मी आत्मचरित्रेही "फ्लॉप" होऊ शकतात. उदा. देव आनंदचे 'Romancing The Life' हे पुस्तक. ही त्याच्या आयुष्यातील अगोदरच सर्वविदीत असलेल्या घटनांची निव्वळ जंत्री आहे. लहानपणीचा काही काळ वगळता नवे हाती काहीच लागत नाही.

एक पाकळी दुभंगलेली

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
वटवृक्षाला बहर आला होता. लाल लाल कळ्यांचा गंध वातावरणात दरवळत होता. कित्येक भ्रमर त्या गंधाला हुंगत कळ्यांपर्यंत पोहोचायचे. शेवंता त्या वटवृक्षाखाली बसायची. जमीनीवर पडलेली एखादी कळी ऊचलायची. कधी डोक्यात सजवायची, कधी पुस्तकात ठेवायची, तर कधी त्याला खाऊनच टाकायची. एक म्हातारा शेजारच्या मंदिराच्या पायरीवर बसुन येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा-पानाला पैसे मागायचा. शेवंता खेळत हुंदडत या म्हाताऱ्यापाशी यायची. म्हातारा तिला बिडी-काडी आणायला पैसे द्यायचा, तिच्या गोळ्या-बिस्किटांचा हिस्सा त्यात ठरलेला. म्हाताऱ्यानं तिला लळा लावलेला.