Skip to main content

"गैर"समज!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/02/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमज हे परस्पर आणि दुतर्फा संवादाने दूर होतात. वादविवादाने गैरसमज वाढतात. संवादाने आणि एकमेकांचे ऐकून घेतल्याने गैरसमज संपतात. संवादच होवू दिला नाही तर गैरसमज कधीच दूर होणार नाहीत. गैरसमज हा रुसलेला असतो. हटून बसतो. जातच नाही! त्याचे रुसणे दूर करायला संवाद हवा असतो. गैरसमज हा शेवटी "गैर" असतो. परका असतो. आपला नसतो! त्याच्या नावातच परकेपणा आहे. "गैर"समज! म्हणजे तो कधी ना कधी गैर होतोच आणि उरतो फक्त समज! ही समज ज्याला जितक्या लवकर येते तितक्या लवकर तो संवादाला तयार होतो आणि गैरसमजाला कायमचे "गैर" करतो आणि समजाला समजून घेतो. समजलं का?

लदाख सायकल ने : व्हिस्की ओढा ते पांग (भाग ८)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शनिवार, 06/02/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा यात्री असलं कि, खूप मज्जा असते. आपण फक्त आदेश सोडायचे, बाकीच्यांनी त्याचे पालन करायचे. तुम्ही किचन ओट्यावरती पण मांडी खालून बसू शकता. स्वतः तव्यावर्ती रोट्या भाजू शकता. आपल्या हातानी कुकर मधला डाळ भात घेऊ शकता. मुख्य म्हणजे आपल्या शेजारी लद्दाखी बसला आहे, त्याच्याशी घर कुटुंबाची , लाख-दुनियाची गोष्टी करू शकता आणि शेवटी शुभरात्रि म्हणून गाड्यांच्या ढिगा वरती चादर घेऊन झोपू शकता. काल ३७ आणि आज फक्त ११ च किमी सायकल चालवली.

दिवस दहावा

व्हिस्की ओढा आणि ब्राण्डी ओढा.

चटपटीत आणि पौष्टीक अप्पे चाट

लेखक टक्कू यांनी शुक्रवार, 05/02/2016 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना नमस्कार अनेक दिवसांनी मिपावर लिहिते आहे. लहान बाळाच्या मागे 'बिझी' असल्याने वाचायला, लिहायला विशेष वेळ मिळत नाही. पण हरकत नाही आता आले आहे. एक नवी कोरी संशोधित रेसिपी तुम्हाला खिलवायला. आपल्यापैकी अनेकांच्या घरी आप्पे हा प्रकार होत असेल. आप्पे हे मुख्यत्वे रव्याचे किंवा मिश्र डाळींचे बनवले जातात. काहीजण हे आप्पे गूळ घालून गोड बनवतात तर काहीजण तिखट. मी या आप्प्याचं रूप थोडं पालटायचा प्रयत्न केला; आणि बनवलं, आप्पे चाट. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

साहित्यः
आप्प्यांसाठी

बेधुंद - भाग १

लेखक अविनाश लोंढे. यांनी शुक्रवार, 05/02/2016 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
(ह्या कथेतील सर्व पात्र नाव बदल्यामुळे काल्पनिक आहेत ! २००६ मध्ये कधीतरी … ह्याचे किती भाग होतील हे आत्ता मलाही माहित नाही ! ) आयुष्य हे कधीकधी 'वेड' करणार असतं . दुपारी खूप झोपायचा प्रयत्न करूनही त्याला झोप आली नाही . डोळे फक्त झाकलेले पण मनात लाखो विचारांचं वादळ ! 'चक्रीवादळात' अडकल्या प्रमाणे त्याचे मन कितीतरी वेळा अगणित विचारांमध्ये भिरभिरत होतं अन एखाद्या विवश 'पाचोटाला' जस वाऱ फिरवून कुठेही फेकून देत अगदी तसं त्याच मन कुठल्यातरी विचारात अडकल अन घड्याळाच्या गजराच्या आवाजाबरोबर जाग झालं . डोळे उघडताच 'हर्षला' चे बोलके काळेभोर डोळे त्याला सतावू लागले .

चारोळी: गैरसमजांशी वैर!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 05/02/2016 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमजांशी जर करायचे असेल वैर, तर संवाद होवू द्या स्वैर! सुसंवाद फैलवा चौफेर, आणि वादाला दाखवा घरचा आहेर!!
काव्यरस

तहान

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 05/02/2016 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
त तहा तहान तहान तहान कधी आईच्या प्रेमाची कधी बापाच्या शाब्बाशीची कधी आजी-आजोबांच्या लाडाची कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची कधी प्रेयसीच्या झलकेची कधी बायकोच्या मिठीची कधी मुलांच्या ओढीची कधी मिटते कधी वाढते कधी लहान कधी महान तहान तहान तहान तहान म्हणजे तडफड तहान म्हणजे वणवण तहान म्हणजे कोरड तहान अगदी कहर तहान नाही संपत तहान ठेवते जिवंत तहान मिळवे पाणी तहान चाळवे भूक तहान करवे तमाशा तहान एक आशा तहान हीच भक्ती तहान हाच परमेश्वर तहान कधी पुण्य तहान कधी पाप तहान शिकवी तहान घडवी तहान तहान तहान तहा त #सशुश्रीके
काव्यरस

कर्दळी वनात जात आहात का ?

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 05/02/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले. ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही.