✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंदरांची शर्यत

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 07/18/2013 - 10:15  ·  लेख
लेख
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे. तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो. एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे. शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार. हे कुठवर चालणार आहे. माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता. माणूस कधी होणार?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
51768 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

आध्यात्मिक गुरू नसावेत बहुतेक

बॅटमॅन
Fri, 07/19/2013 - 12:05 नवीन
आध्यात्मिक गुरू नसावेत बहुतेक. घरचे नीट असले तरी वडिलांचे आपण करतोय त्याला आनुकूल्य नसेल तर काही उपयोग होत नाही म्हणून तसे म्हटले असावे असे वाटते. अन अण्णा हा शब्द सिंबॉलिकली वापरला असावा. (असं माझं मत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

असेलही.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/19/2013 - 12:09 नवीन
अण्णा हा शब्द सिंबॉलिकली वापरला असावा.
हम्म्म्म! बघुया ते स्वतः काय खुलासा करतात. (जर केलाच तर).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अण्णा म्हणजे नीलमकुमार खैरे

आदूबाळ
Fri, 07/19/2013 - 14:28 नवीन
अण्णा म्हणजे नीलमकुमार खैरे तर नव्हेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

गुरु वगैरे नाही हो, ते माझे

जॅक डनियल्स
Fri, 07/19/2013 - 21:39 नवीन
गुरु वगैरे नाही हो, ते माझे क्षेत्र नाही. 'दाम करे काम', 'आधी पोटोबा मग विठोबा' या पिढीतला आहे मी. सिंहगड रस्त्या वरच्या डुक्कर (टमटम) वरचे साहित्य वाचून मी मराठी शिकलो आहे. त्यामुळे असे अनेक शब्द ओठांवर लोळण घेतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रिक्षा, ट्रक, इ. च्या मागचे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/19/2013 - 12:18 नवीन
रिक्षा, ट्रक, इ. च्या मागचे साहित्य वाचत नाही काय?... "अण्णांची कृपा", "तात्यांचा आशिर्वाद", "आईची पुण्याई" असे अनेक लघुवाहनलेख असतात तेथे, आणि जागा उरेल तेथे तोंडी लावायला असंख्य चिल्यापिल्यांची नामावळ. साहित्याचा इतका समृद्ध प्रकार, तोही सतत गावोगावी, गल्लोगली प्रवाही (फिरता) आणि लोकाभिमुख (म्हणजे वाहनाच्या पाठीमागे पण मागच्या जनतेच्या तोंडापुढे) असलेला प्रकार, दुसरा मिळणे नोहे ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

महान साहित्य.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/19/2013 - 12:25 नवीन
एका रिक्षाच्या मागे महान साहित्य वाचले होते. (दूसरीकडे कुठे? पुण्यातच): 'आई जेऊ घालीना, बाप भिक मागु देईना आणि बायको रिक्षा चालवू देईना.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आणखी एक सर्व विश्वाला व्यापून

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/19/2013 - 14:32 नवीन
:) आणखी एक सर्व विश्वाला व्यापून वर चार अंगुळे उरलेले सत्य: "मेरा भारत महान"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बरोबर आहे तुमचे, अण्णा म्हणजे

जॅक डनियल्स
Fri, 07/19/2013 - 21:30 नवीन
बरोबर आहे तुमचे, अण्णा म्हणजे आपले परम पूज्य ! मला वाटले हा अर्थ जगमान्य आहे,पण जास्त कोणी रिक्षा वरचे साहित्य वाचत नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जास्त कोणी रिक्षा वरचे

अभ्या..
Sun, 07/21/2013 - 02:28 नवीन
जास्त कोणी रिक्षा वरचे साहित्य वाचत नाही असे दिसते.
आम्ही रिक्षातले साहीत्य पाहत जातो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

अलका अलका अलका ...अलका आहे का कोणी ?

जॅक डनियल्स
Sun, 07/21/2013 - 08:52 नवीन
माझ्या अनुभवाने शेयर रिक्षा वरचे साहित्य जास्त सुंदर असते, साध्या रिक्षा वरच्या साहित्यापेक्षा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अलका अलका अलका ...अलका आहे का कोणी ?

जॅक डनियल्स
Sun, 07/21/2013 - 10:02 नवीन
माझ्या अनुभवाने शेयर रिक्षा वरचे साहित्य जास्त सुंदर असते, साध्या रिक्षा वरच्या साहित्यापेक्षा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुम्ही दिलेल्या उदाहरणातले

आतिवास
गुरुवार, 07/18/2013 - 13:22 नवीन
तुम्ही दिलेल्या उदाहरणातले पालक त्यांच्या मुलांनी शर्यतीत मागे राहू नये म्हणून काळजी (!) घेताहेत इतकंच म्हणेन. पण एकदा अक्कल आली की या मुला-मुलींना आपण शर्यतीत धावायचं की नाही - हे ठरवता येईल की. धावायचं नसेल तर प्रश्न नाही, धावायचं असेल तर 'आम्हाला पुरेसं पाठबळ दिलं नाही' अशी तक्रार करायला नको त्यांनी भविष्यात. शर्यतीत उतरायचं नाही (कष्ट नकोत) पण विजेत्याला मिळणारे सर्व फायदे मात्र पाहिजेत - अशी मानसिकता असली की मग जगणं 'उंदीरशर्यत' वाटायला लागतं - खरी अडचण ती आहे. कुठल्याही शर्यतीत न उतरता सुखा-समाधानाने जगणारे अनेक लोक पाहिल्यावर शर्यतीत उतरायचं का नाही याचा निर्णय आपण स्वतः घ्यायचा असतो याची जाणीव झाली आहे आणि त्यामुळे त्याबद्दल तक्रार करण्यात अर्थ नाही इतकं मी माझ्यापुरतं मान्य करुन टाकलं आहे. इतरांनी ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही.
  • Log in or register to post comments

इतरांनी ते मान्य व्हावचं असा

आतिवास
गुरुवार, 07/18/2013 - 13:24 नवीन
इतरांनी ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही. हे वाक्य "इतरांना ते मान्य व्हावचं असा आग्रह नाही" असं वाचावं :-)
  • Log in or register to post comments

अजुन तरी लेकीला या स्पर्धेत

गणपा
गुरुवार, 07/18/2013 - 13:53 नवीन
अजुन तरी लेकीला या स्पर्धेत उतरवलं नाही आणि या पुढेही तिला आम्हा उभयतांकडुन यात लोटलं जाणार नाही असाच दोघांचा निश्चय आहे. काही वैयक्तीक कारणांमुळे सिबिएसी मस्ट होतं ते टाळता आलं नाही. सध्याचा महाराष्ट्र बोर्डाचा शालेय अभ्यासक्रम काय असतो? किती कठिण आहे? हे माहित नाही. पण जेव्हा मी लेकीच्या वयाचा होतो तेव्हाचा माझा अभ्यासक्रम आणि तिचा आताचा अभ्यासक्रम यांच्यात किमान ४-५ इयत्तांचा फरक आलेला पहातोय. म्हणजे मी जे सातवी वैगरे शिकलो ते ती तिसरीत असतानाच शिकली. तिच्या वर्गातली मुलं दुपारी शाळेतून आली की दप्तर टाकलं दोन घास कसे बसे घश्यात कोंबले की दुसरं दप्तर उचलून शिकवणीला पळतात. दया येते त्यांची. एकतर सकाळी शाळेत जायचं म्हणुन लवकर उठतात, आणि दुपारी शिकवणीला पळतात त्यामुळे सकाळची राहीलेली झोप दुपारीही मिळत नाही. दुपारच्या शिकवणीतुण सुटका झाली की हौशी आई-वडलांच्या खातर एकादा नाच/कराटे/गायनाचा क्लास त्यांची वाट पहात असतो. शेवटी दमलेलं-भागलेलं कोकरू शाळेत परफॉर्म करत नाही म्हणुन परत दबाव येतो ते वेगळच.
  • Log in or register to post comments

माझा मुलगा सिबिएसी शाळेत

अजया
गुरुवार, 07/18/2013 - 14:26 नवीन
माझा मुलगा सिबिएसी शाळेत नववीत आहे. मी अजुनही त्याला कोणताही क्लास लावलेला नाही. त्यान्च्या अभ्यासाची रचना समजुन घेतली तर सीबीएसी काही कठीण नाही.आपण थोडे मर्गदर्शन जरुर करावे लागते, पण ती पालक म्हणुन आपलीही जबाबदारी आहे असे मला वाटते. अर्थात हे प्रत्येकाच्या इंटरेस्ट्वरही अवलंबुन आहे, काही लोक मुलांचा अभ्यास काय आहे हे न बघताच वर वर बघुन कठीण आहे म्हणुन ट्युशनला पाठवतात. नर्सरी,ज्यु केजी ला असा काय तुफान कठीण अभ्यास असतो जो आपण सुशिक्षीत पालक घेउ शकत नाही.
  • Log in or register to post comments

पालकांच्या न्यूनगंडाची लक्षणे!

ऋषिकेश
गुरुवार, 07/18/2013 - 16:39 नवीन
अनावश्यक भैतिक सुखांचा/सुविधांचा मारा हे मी पालकांच्या (बहुदा वेळ न देऊ शकण्याच्या?) न्यूनगंडाचं लक्षण समजतो.
  • Log in or register to post comments

छान लेख आहे !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/18/2013 - 16:50 नवीन
पण ह्या समस्येला उत्तर काय ? मी आमच्या घरी होम ए़जुकेशन विषयी बोललो...की पोरांना घरीच शिकवुयात ... तर माझीच अक्कल काढण्यात आली :( --प्रचंड शिक्षण घेवुन कॉर्पोरेट वर्ल्डमधे अडकलेला उंदीर
  • Log in or register to post comments

सहमत

सौंदाळा
गुरुवार, 07/18/2013 - 17:03 नवीन
मी देखील प्रवाहाविरुद्ध पोहा वगैरे लिहिले आहे पण स्वतः असा निर्णय घेऊ शकेन का याबाबत साशंक आहे (लाजलेली स्मायली). पण असे वेगळे निर्णय घेऊन यशस्वी होणारेदेखिल पाहीले आहेत. पत्रकारीता, उपहारग्रुह, नाटक, ईंजिनियरींग वर्कशॉप, पौरोहीत्य, शेती यात शुन्यापासुन सुरुवात करुन यशस्वी झालेले मित्र, नातेवाईक बघण्यात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सेम सेम

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/18/2013 - 18:44 नवीन
पत्रकारीता, उपहारग्रुह, नाटक, ईंजिनियरींग वर्कशॉप, पौरोहीत्य, शेती यात शुन्यापासुन सुरुवात करुन यशस्वी झालेले मित्र, नातेवाईक बघण्यात आहेत.
असेच आमचे काही मित्रही !! त्यांच्या कडे पाहुन एका मनाला आनंद वाटतो तर एका मनाला हेवा (एन्व्ही ) . पण असं काही करण्यासाठी गट्स पाहिजेत हे मात्र खरं ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

आपणच ठरवायचं आहे

पैसा
गुरुवार, 07/18/2013 - 17:11 नवीन
उंदीर व्हायचं की मांजर की सिंह ते! ट्युशन्स ची फार गरज अशी नसते. फक्त पालक मुलांकडे पुरेसा वेळ आणि लक्ष देऊ शकत नाहीत त्यावेळी निदान मुले तिथे बसून थोडा तरी अभ्यास आणि पेपर्स सोडवणे असे काहीतरी करतात. नाहीतर आई बाप ऑफिसात आणि एकटा मुलगा घरी ऑनलाईन गेम्स खेळतोय असले प्रकार पाहिले आहेत. मुलांना अभ्यासात डांबून ठेवले तरी आणि पूर्ण मोकळे सोडले तरी काही ना काही तोटा आहेच. शक्यतः सुवर्णमध्य कसा काढायचा हे त्या त्या पालकांवर आणि मुलांवर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments

केजीत ट्युशन !?

चिगो
गुरुवार, 07/18/2013 - 18:28 नवीन
दहावीपर्यंत सिबीएस्सीत शिकलो (नवोदय विद्यालय).. ट्युशन नव्हतीच. पण नवोदयची 'सिस्टम' म्हणजे अभ्यासतास, मासिक परीक्षा इत्यादी असल्याने गपगुमान पास झालो. बारावीत 'महा' बोर्डात होतो, ट्युशनपण होती, पण गणितात (ते मॅट्रिक्स, सेक थिटा, काॅस थिटा इ.) रुची नसल्याने नापास झालो. मग बारावी काढल्यावर सेकंड क्लासमधे बी. एस्सी. झालो. मग इचार केला की आतापर्यंत लै कचरा झाला, आता जरा अभ्यास करावा. दोन-तीन वर्षं घासली आणि आता सरकारी नोकर आहे.. आता तुम्हीच ठरवा, रॅट का काय ते.. अगदी आयआयटी, आयआयएम, एमबीबीएस करणारेही कित्येकदा त्यांच्या मनाविरुद्धच धावतात असं वाटतं. नाहीतर सिव्हील सर्विसेस मध्ये अश्या उमेदवारांचा वाढता टक्का दिसला नसता.. माझ्या लेकराला उंदिरशर्यतीत धावायला लावणारच नाही, असं म्हणु शकत नाही. ते भविष्यच ठरवेल. पण अगदी केजीपासुन ट्युशन्स किंवा सातवीपासुन आयआयटी प्रवेशाची तयारी ही सोंगं करणार नाही. स्वत:चंच नालायक उदाहरण समोर असल्याने असेल कदाचित.. ;-) :-D
  • Log in or register to post comments

केजीत ट्युशन !?

अनिरुद्ध प
Tue, 07/23/2013 - 18:48 नवीन
याचे कारण एक असे सुद्धा असु शकते कि स्वताहा पालक हे कमी शिकलेले असल्याने तसेच मुलाना ईन्ग्रजी माध्यमात शिकावयास घातल्याने त्याना नाईलाजाने असे करावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

दडपण नसावे.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/18/2013 - 18:45 नवीन
ना आमच्या वेळी ही उंदीर शर्यत होती ना आम्ही आमच्या एकुलत्या एक मुलाला अशा शर्यतीत ढकलले. इथे आखातात CBSC शिवाय पर्याय नाही म्ह्णून दहावी पर्यंत CBSC मध्येच शिक्षण झाले. पुढे पुण्यातही कॉलेज शिक्षण घेताना त्याच्यावर कुठलाही दबाव नव्हता. माझ्या शिक्षण वयात आमच्या घरात अभ्यास घेणे हा प्रकार तर नव्हताच आणि शिकवणी लावली म्हणजे मुलगा/मुलगी 'ढ' आहे ह्याची जाहिरातच मानली जायची. पदवी नंतर १७ वर्षे नोकरी करून, स्वतःच्या मालकीचे घर झाल्यानंतर, आता हरकत नाही ह्या विचाराने, स्वतःच्या आवडीच्या व्यवसायास (उपहारगृह) सुरुवात केली. आयुष्यात समाधानी आहे. मुलालाही ह्याच व्यवसायात ये असा आग्रह नाही. त्या जे करायचे असेल ते करण्यास जी काही मदत शक्य आहे ती नक्कीच करेन. मुलाचे शिक्षण आणि व्यवसाय जरी त्या त्या व्यक्तिचा वैयक्तिक प्रश्न असला तरी मुलांवर कुठले दडपण असू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments

मुलाचे शिक्षण आणि व्यवसाय मुलांवर कुठले दडपण असू नये असे वाटते.

सुबोध खरे
गुरुवार, 07/18/2013 - 19:38 नवीन
+ १०० मी संपूर्णपणे स्वतःच्या मताने डॉक्टर झालो( आईचे मत विरुद्ध असताना) आणी सैन्यात गेलो. साडे अठरा वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन निवृत्त झालो. चार वर्षे दोन कोर्पोरेट रुग्णालयात विभागप्रमुख म्हणून काम केले आणी एके दिवशी राजीनामा देऊन बाहेर पडलो. तीन महिने घरी बसून स्वतंत्र व्यवसायाची तयारी केली.( आमची मद्रासी मोलकरीण बायकोला विचारती झाली कि अण्णा काम का करीत नाही?). याला थोडेसे धाडस आणी स्वतः वर विश्वास पाहिजे आणी घरच्यांचा पूर्ण पाठींबा पाहिजे( सुदैवाने मला तो आई वडिलांकडून आणी नंतर बायको कडून मिळाला) स्वतःचा व्यवसाय गेली साडे तीन वर्षे आरामात करीत आहे. सकाळी साडे आठ ते साडे बारा आणी संध्याकाळी साडे पाच ते साडे आठ.घरापासून दवाखाना १ किमी वर आहे. दुपारी थंड झोपतो. कोणतीही शर्यत न पळता किंवा कोणाचाही जास्त पैसे मिळवतो म्हणून हेवा न करता. हेच उदाहरण माझ्या मुलांच्या डोळ्यासमोर ठेवले आहे त्यांना जे काही करायचे आहे ते करा असे मोकळ्या मनाने सांगितले मी तुम्हाला वयाच्या ३० वर्षे पर्यंत पोसेन असे सांगितले आहे. मुलगी कॉमर्स ला गेली आहे मुलगा इंजिनियर व्हायचे म्हणतो आहे. उत्तम त्यांनी सुद्धा आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगावे. एखादे वर्ष रिकामे फिरण्यात घालवले तरी चालेल. बाकी ईश्वरेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हे सगळे पाहिले की ...

चौकटराजा
गुरुवार, 07/18/2013 - 18:56 नवीन
हे मनोरूग्ण पालक व आपल्या आजच्या जगातील मनोरुग्णावस्थेत गेलेले " महान" शिक्षण तज्ञ पाहिले की जगाच्या इतिहासात आपण १९५३ साली म्हणजे योग्य वेळी जन्माला आलो व अंदाजे २०२३ साली म्हणजे योग्य वेळी मरणार आहोत या बद्द्ल स्वत: चाच हेवा करावासा वाटतो.
  • Log in or register to post comments

हा अंदाज

तिमा
Fri, 07/19/2013 - 11:36 नवीन
अंदाजे २०२३ साली म्हणजे योग्य वेळी मरणार आहोत हा अंदाज कसा काढला बरं? काही फॉर्म्युला असला तर आम्हालाही गणित करुन ठेवता येईल. बाकी रॅट रेस मधे मागेच राहिलो होतो. पण नशिबाने हात दिला त्यामुळे तरंगलो तरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

दीड!

आनंदी गोपाळ
Sun, 07/28/2013 - 20:48 नवीन
अ‍ॅव्हरेज इंडियन लाईफ एक्स्पेक्टन्सी फॉर मेल्स सुमारे साडे अडुसष्ट वर्षे आहे. त्यांनी स्वतःला दीड वर्षे ग्रेस दिलेली दिसतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

काळजी व गंभीर उपाय करण्याची गरज असलेली समस्या

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/18/2013 - 20:50 नवीन
डॉक्टरसाहेब, लेखतील उदाहरणांतून एका महत्वाच्या सामाजिक समस्येवर इथे भाष्य केले आहे. अनेक प्रतिसाद विचारांत पाडणारे आहेत. मी व माझ्या पिढीतील अनेक लोक इतके नाही तर या प्रकारच्या दडपणातून गेले आहेत (खास करून ८वी ते १२वी या काळात). माझे स्वतःचे सांगायचे तर दडपणामूळे १२वीत गाडी घसरली तरी त्यानंतर कुठलेही दडपण न घेता आवडीच्या विषयांमध्ये (संगणकशास्त्र) स्वतःला झोकून दिले व इतर अनेक विषय अभ्यासक्रमात असले तरी (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अकौंटींग, स्टॅटिस्टीक्स इत्यादी) त्यांचा केवळ पास होण्यापूरता अभ्यास केला. या धोरणाचा मला पहिली नोकरीत सहजपणे मिळण्यात व नोकरीतील प्रगती करण्यात चांगलाच लाभ झाला. या समस्येवर व्यवस्थेद्वारा व सामाजिक संकल्पनांतील बदलांद्वारा तोडगा निघेल असे सध्यातरी वाटत नाही. किमान गेल्या काही वर्षांपासून १०वी १२वी ची प्राविण्ययादी बंद झाली आहे हीच काय एक दिलासा देणारी बाब.
  • Log in or register to post comments

विनोबा भावेचे कार्य करणारे एक

देशपांडे विनायक
गुरुवार, 07/18/2013 - 20:57 नवीन
विनोबा भावेचे कार्य करणारे एक सदगृहस्थ मला माझ्या कॉलेज जीवनात भेटले त्यांच्याशी बोलताना बेकारी विषयावर मी बोलू लागलो तेंव्हा त्यांनी मला पुढील प्रश्न विचारले तुला कॉलेज मधे जाण्यास कोणी सांगितले ? पदवी प्राप्त झाल्यावर तुला नोकरी देण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे ? वय वर्षे १८ पूर्ण झाली की कायद्याने शहाणे समजले जाते . पण १८ व्या वर्षी हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत . वरील प्रश्न विचारणे शहाणपणाचे ठरते ? परंतु या प्रश्नाकडे संपूर्ण आयुष्यभर दुर्लक्ष करता येते का ? योग्य वेळी योग्य प्रश्न विचारले गेले पाहिजेत . त्या प्रश्नाची उत्तरे मिळवली पाहिजेत शिक्षण हे क्षेत्र राजकारणाचे कसे ? काय शिकवायचे , कसे शिकवायचे ,हे ठरवणारी व्यक्ती अक्षरशत्रू असली तरी चालते कारण POLICY ठरवणे हे काम कुणीही करू शकतो आणि POLICY चुकीची असली तर ती व्यक्ती बदलण्याची संधी ५ वर्षाने मिळतेच TWO ON A TOWER ही कादंबरी मला कॉलेजला होती . ती कादंबरी अश्लील आहे असे पुणे महानगरपालिकेच्या सभासदांचे मत होते आणि ती कादंबरी काढून टाकावी असा त्यांचा ठराव पास झाला होता महानगरपालिकेचे हे काम आहे ? लोकशाही म्हणजे दुस -याने काय करावे हे सांगण्याचे स्वातंत्र्य असा आपला समज आहे
  • Log in or register to post comments

डॉ.साहेब लेख आवडला आणि

jaypal
गुरुवार, 07/18/2013 - 21:53 नवीन
काही प्रतिसाद देखिल. या निमीत्ताने हे आठवल "what you can give to your children is.... the roots and the wings"
  • Log in or register to post comments

अगदी पटले!

जुइ
गुरुवार, 07/18/2013 - 22:25 नवीन
इथे उस गावात काही भारतीय लोकांकडुन असे एकले कि जिथे आशियाई वंशाची मुले शाळेत जास्त असतात तिथले स्थानिक लोक आपल्या मुलांच्या शाळा बदलत आहेत कारण आशियाई वंशाची मुले खूप अभ्यास करत असल्याने त्यांच्या मुलांना या रॅटरेसमध्ये धावावे लागु नये म्हणून :-) हे कितपत खरे आहे महित नाही.
  • Log in or register to post comments

थोडाफार सहमत..

उपास
गुरुवार, 07/18/2013 - 22:49 नवीन
मुद्दॅ वाचले, काही पटले. इतक्या लहान वयात मुलाला ट्युशनला घालतायत म्हणजे वर ऋषिकेशने म्हटलय तसं त्यांचा वेळ देता येत नाही मुलाला हा न्युनगंड असण्याची शक्यता जास्त. होमलोनचे हप्ते भरताना येणार्‍या फेसामुळे दोघांना नोकरी करणे तर आवश्यकच ना. पण दुसरा मुद्दा 'शाळा बुडेल' हा मुद्दा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असावा. साधारणपणे ३ ते ५ वर्षांची मुलं (ज्यांचा स्वभाव ठरण्याचा हा कालावधी) बरीच हुषार असतात. त्यांच्याकडे निगोशिएशन्स स्कील्स आलेली असतात आणि पूर्णवेळ घरात राहून ती अनंत उद्योग करू शकतात. त्यांना सांभाळणे ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे, त्यापेक्षा मुलाचे 'रुटीन' लागलेले असणे केव्हाही चांगले. तो शाळेत जाईल तेव्हा आई इतर कामे पटापट उरकू शकेल, त्यालाही चार मुलांमध्ये वावरता येईल, वेगळे वातावरण मिळेल. हेच जर तो सलग घरी राहिला, तर शाळेची सवय सुटण्याची शक्यता जास्त. ज्यांच्या घरात आजी-आजोबा नाहीत तेथे हा प्रश्न अजून भेडसावतो. आता रॅट रेस बद्दल. ती होती, आहे आणि राहाणारच. निव्वळ रॅट रेस मध्ये धावणार नाही ह्या हट्टापायी तसेच थोड्या आळशीपणे किंवा खोड्या आत्मविश्वासापायी हुशारी फुकट घालवून नैराश्य आलेल्यांची पण कितीतरी उदाहरणे समोर बघतो, मग त्यावेळी प्रवाहपतितांनी प्रवाहाच्या प्रगतीनुसार प्रगती केल्याने त्यांचं कौतुकच वाटत. तस्मात, प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं. शेवटी 'लोकल मॅक्झिमा' च्या बाहेरही जग असतच, तुमच्या कक्षा रुंदवल्या की ते दिसतच! - उपास
  • Log in or register to post comments

प्रवाहात पडणे वाईट नाही आणि

मोदक
Fri, 07/19/2013 - 00:53 नवीन
प्रवाहात पडणे वाईट नाही आणि शर्यतित धावणेही वाईट नाही पण आपले बांध कुठे घालायचे ते समजण्याचं ज्ञान मुलांना दिलं की झालं. प्रचंड सहमत!!! हे वाक्य फक्त मुलांनाच नाही तर असंख्य कॉर्पोरेट जनांनाही लागू पडेल बहुदा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

त्या वरून आठवले

इंद्रवदन१
गुरुवार, 07/18/2013 - 23:04 नवीन
त्या वरून आठवले, लहान असताना अभ्यास नाही केला की आई म्हणायची "क्लास ला पाठवीन". मी करायचो मग अभ्यास. शाळेचा प्रकार परत कोण क्लास मधे शिकणार?
  • Log in or register to post comments

बीटेक आणि एमटेक करून साधे एक

काळा पहाड
गुरुवार, 07/18/2013 - 23:58 नवीन
बीटेक आणि एमटेक करून साधे एक वाक्य नीट इंग्लिश मध्ये बोलू न शकणार्‍या किंवा चेन्नई ला जायला तयार नसलेल्या किंवा गोलमाल उत्तरे देणार्‍या किंवा उगीचच नोकर्‍या बदलणार्‍या किंवा अवास्तव अपेक्शा ठेवणार्‍या मठ्ठ गाढवांना मी आमच्या कंपनीच्या इंटर्व्ह्यु मध्ये पास करत नाही. बाकीच्यांच्या साठी आजही भरपूर नोकर्‍या आहेत.
  • Log in or register to post comments

खरतर साडेपाच वर्षापर्यंत

स्पंदना
Fri, 07/19/2013 - 04:39 नवीन
खरतर साडेपाच वर्षापर्यंत शाळेत घालायचे नाही असा निय्म करायला हवा. मी इथली मुले पहाते. त्यांना प्रेप ( पहिलीच्या आधी १ वर्ष प्रेप मध्ये जाव लागत) पर्यंत अगदी ए बी सी डी सुद्धा शिकवत नाहीत. का? तर नंतर त्यांना बोअर होइल म्हणुन. पण त्या वयातल्या मुलांला उच्चारावरुन स्पेलींग लिहाय्ची मुभा असते. सो नो रट रट. प्रेप ची मुले एफ आर डी हे फ्रेंड म्हणुन लिहीतात अन टीचर ते वाचते. मी विचारल तू पहिला स्पेलिंग का नाही करुन घेत तर म्हणे व्यक्त होण महत्वाच, इंग्लेश येणे नव्हे!!
  • Log in or register to post comments

बिचारी मानसी

सहज
Fri, 07/19/2013 - 07:17 नवीन
  • Log in or register to post comments

खरेच बिचारी मानसी. इतकी झोप

मृत्युन्जय
Fri, 07/19/2013 - 12:38 नवीन
खरेच बिचारी मानसी. इतकी झोप येत असताना त्या बिचारीला शाळेत पाठवलेच कशाला. बर पाठवले तर पाठवले त्या शिक्षिकेने तरी तिला उठवण्यासाठी इतके कष्ट घ्यावेत कशाला झोपु द्या ना त्या बिचारीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पिल्लु आजारी आहे.

बाबा पाटील
Fri, 07/19/2013 - 13:17 नवीन
पिल्लु आजारी आहे,खोकतय्,साला सर्दी खोकल्याच्या औषधाने थोडीशी गुंगी येते. त्यामुळे झोपतय बाकी काही नाही. आपला तर पहिली पासुन वैद्यकिय शिक्षाण पुर्ण होइपर्यंत दुपारच्या जेवणानंतरच्या जो कुठला ही तास असु दे मास्तर कितीही शिव्या घालु देत्,पन तरी झोप काढल्याशिवाय अजिबात जमत नव्हत. साला दुपारच्या जेवणानंतर समोरच्या मास्तरच ते संथ लयीतील शिकवण आणी त्याचा शरिर आणी मनावर आलेला गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव परत या धकाधकीच्या जिवनात मिळालाच नाही, त्यामुळे आजही वाटत दुपारी मजबुत बासुंदी पुरी,किंवा पुरणपोळी खावी,आणी समोर माझ्या चरकच्या किंवा बालरोग च्या मास्तरांचे व्याख्यान आसावे,असा योग परत नाही......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव ....

राघवेंद्र
Fri, 07/19/2013 - 19:08 नवीन
मी पण गुंगीचा अविस्मर्णीय अनुभव इंजिनियरिंग मध्ये घेतला आहे. इंजिनियरिंगचा पहिला दिवस आणि पहिला गणिताचा तास, मस्त झोप. फक्त पहिला दिवस असल्यामुळे वर्गाच्या बाहेर केले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आईईईग्गं.....

धमाल मुलगा
Fri, 07/26/2013 - 20:42 नवीन
लै बेकार वाटलं राव! काय त्या लेकराचा छळ. वर आणि व्हिडो शूट करतीये मास्तरीण! पालकांना पुरावा दाखवायला असेल बहुतेक. अन त्या मानसीची अवस्था म्हणजे..."उभी दुनया गेली खड्ड्यात! च्यायला एक जरा तासभर पडू द्या रे! " अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

आईग्ग! खरच बिच्चारी गं!

आनंदी गोपाळ
Sun, 07/28/2013 - 20:54 नवीन
आईग्ग! खरच बिच्चारी गं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मुलांची शेती

सौंदाळा
Fri, 07/19/2013 - 11:15 नवीन
मुक्तविहारी यांनी लिहिलेली 'मुलांची शेती' हि सुंदर लेखमाला इच्छुकांनी जरुर वाचावी. लिंकः मुलांची शेती
  • Log in or register to post comments

:(

रानी १३
Fri, 07/19/2013 - 11:47 नवीन
माझी मुलगी १ ली त आहे. काल तिची dictation test होती. (दर वीक ला असणार म्हने आता)....तिने काहिच लिहिले नाहि. ती ं=म्हनत होती की मी होमवर्क लिहुन घेत होते. मला खुप टेण्शन आले. फोन केला एका पालकाला.. तर ति म्हणाली, आर्य ने तर लिहिले स्पेलीन्ग्स, ......मला वाइट वाट्ला..रागावले मी मुलीला.... काय करनार....पालकाची जास्त कुतरअओड होतीय...:(
  • Log in or register to post comments

कुतरअओड होतीय

सुबोध खरे
Fri, 07/19/2013 - 19:23 नवीन
राणी ताई आपल्याला पहिलीत( फार कशाला नववीपर्यंत च्या सर्व इयत्तांमध्ये) किती मार्क होते हे आता आठवते आहे का? आणि त्याचा आपल्या आयुष्यात किती फरक पडला? मला इतकेच म्हणायचे आहे कि ज्या गोष्टीचा आयुष्यात काहीही फरक पडणार नाही त्या साठी इतकी आटाआटी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रानी १३

मुलं जन्माला घालूच नयेत

अनुप ढेरे
Fri, 07/19/2013 - 12:08 नवीन
मुलं जन्माला घालूच नयेत त्यापेक्षा. आयुष्यभर मौज मजा करावी आणि जावं निजधामास..
  • Log in or register to post comments

मुलं जन्माला घालूच नयेत त्यापेक्षा!

संजय क्षीरसागर
Mon, 07/22/2013 - 23:52 नवीन
>आयुष्यभर मौज मजा करावी आणि जावं निजधामास.. सगळ्यात फर्मास प्रतिसाद! (पण आलीयेत ना ती आता बाहेर...) मुलांचा कल शोधणं हा सर्वावर एकमेव पर्याय आहे. त्यानं संगोपनापासूनच तुफान मजा येते. मुलाला रेस खेळल्यासारखं वाटत नाही. माझा मुलगा स्वेच्छेनं चित्रकार (ग्राफिक डिजायनर) कसा झाला, त्याच्या शिक्षणाचं कधीही टेंशन आलं नाही आणि त्याचं मस्त चाललंय याची गोष्ट वेळ झाला की लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ज्या मुलांना पहिल्यापासुन

जागु
Fri, 07/19/2013 - 12:21 नवीन
ज्या मुलांना पहिल्यापासुन सक्ती असते जास्त अभ्यास आणि एकही दिवस खाडा न करण्याची ती त्यांच्याकडून शालेय जीवनात पुर्ण राबवताना मी पाहीले आहे. माझ्या मुलीच्या शाळेत १००% अटेंडंन्स वाल्यांना बक्षिस दिले जाते रिझल्टच्या वेळी. काही आया मुलांना बरे नसले तरी पाठवतात शाळेत. खुप राग येतो अशा पालकांचा. अरे अभ्यासाच समजू शकतो पण बक्षिसासाठी ?
  • Log in or register to post comments

अभ्यासाच समजू शकतो

सुबोध खरे
Fri, 07/19/2013 - 19:31 नवीन
जागू ताई, शाळेत गेल्याने अभ्यास होतो हे (जास्तीत जास्त) अर्धसत्य आहे. माझी मुलगी बी कॉम च्या पहिल्या वर्षाला फार तर दोन महिने(सगळे मिळून) कॉलेजला गेली असेल आणि कोणताही क्लास नाही तरी तिला सत्तर टक्के मिळाले.( कसे कुणास ठाऊक) आमच्या सौ. नि बराच आरडा ओरडा केला होता( ती पहिलीपासून हुशार मुलात गणली जात असे आणि बर्याच वेळा आदर्श विद्यार्थिनी म्हणून पुरस्कार हि मिळाला होता असे ऐकले) पण त्याने काहीच फरक पडला नाही.( मुलीला माझी फूस आहे असा बराच त्रागा सुद्धा झाला) आता वातावरण निवळले आहे. दोन्ही मुलांनी दहावी पर्यंत फार अभ्यास केला असावा असे वाटत नाही तरीही त्यांचे काहीही बिघडलेले नाही. आता त्यांचे त्यांना कळले आहे कि आपली करियर आपण करणे आवश्यक आहे. बाप आयुष्याला पुरा पडणार नाही. बस इतकेच सांगणे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

सहमत.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/19/2013 - 19:57 नवीन
मी बी.कॉम केले तेंव्हा नोकरी करीत होतो. मुंबईतला ३ तासांचा धकाधकीचा लोकलचा प्रवास, ८ तास नोकरी, नाटकांच्या तालीमी ह्या सगळ्या रगाड्यात कॉलेजची उपस्थिती अशक्यच होती. चारही वर्षे पुस्तके वाचून स्वतःच अभ्यास (सेल्फ स्टडी) केला बी. कॉम केले. मार्क विचारायचे नाहीत. कधी कुठला क्लास लावला नाही पण नापासही कधी झालो नाही. पुढे कोबोल प्रोग्रॅमिंग केले. आखातात आलो. १० वर्षे नोकरी केली आणि स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. आनंदात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा