मराठीची वस्तूस्थिती व त्यावर उपाय सांगणारे हे पुस्तक आहे. हा लेख आता पर्यंत ६३ जणांनी वाचला आहे. हा लेख जास्तीत जास्त संख्येने वाचला जावून मराठीची स्थिती जाणून घेण्यासाठी एखादातरी उत्सूक होईल.
केवळ हा लेख वरती आणण्यासाठी प्रतिक्रिया देत आहे.
प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत नाही. केवळ धाग्यातील विचारांचे जास्तीत जास्त वाचन व्हावे हाच मराठीप्रेमामुळे शुद्ध हेतू. हाच हेतू या धाग्यापुरता परत एका आठवड्याने सिद्ध होईलच.
फार आनंद झाला या गरजेच्या पुस्तकाच्या ओळखीमुळे (लेखाच्या मांडणीसाठीही श्री.पाषाणभेद यांचे विशेष अभिनंदन. त्यांनी करून दिलेली पुस्तकाची ओळख ही केवळ तांत्रीक ओळख नसून खुद्द त्यांचीही भाषाभान ठेवण्यामागील तळमळ त्यांच्या प्रत्येक विधानातून तीव्रतेने जाणवली.)
शब्दरचनेचे हुकमी सामर्थ्य मनाला येईल तशा पद्ध्तीचे मायाजाल उभे करू शकते. "श्रावण" महिन्याच्या जादुगिरीवर पीएच.डी.साधर्म्य लिखाण होऊ शकते, पण भाषाभान ठेवून बालकविंनी केवळ एका कवितेत उलगडून दिलेला आनंद अवर्णनीय अशासाठी झाला आहे की त्यांना मराठी भाषेची ताकद निश्चितच माहित होती. शंभर वर्षे होत आली "श्रावणमास" कवितेला पण रत्तीभरही जादू कमी झालेली नाही, ही किमया भाषा अलंकारांची !
"किती विद्यार्थी केवळ लेखक व्ह्यायचे आहे म्हणून एम. ए. ला मराठी घेतात?"
या प्रश्नाला दुसरीही बाजु अशी आहे की, ज्या काही विद्यार्थ्यांनी मराठी विषय पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतला आहे त्यांना मराठीची किती आस्था आहे? नियत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किती अवांतर वाचन तो करतो? किती जाण आहे त्याला मराठी साहित्याची? इथे कोल्हापूरात एका हायस्कुलमध्ये "मराठी" विषयाच्या शिक्षकाच्या पदासाठी अर्ज केलेल्या एका एम.ए. (मराठी), बी.एड. उमेदवाराने "मराठीतील तुम्हाला कोणता कादंबरीकार आवडतो?" या साध्या आणि सरळ प्रश्नाचे उत्तर "पु.ल.देशपांडे" असे दिले. तर दुसर्या एका दलित उमेदवाराला "दलित लेखकांतील कुणाकुणाचे लेखन तुम्ही वाचले आहे?" या प्रश्नाला उत्तर आले, "दया पवार". हे उत्तर बरोबर असेल्/होते. पण मुलाखतकर्त्याने पुढील उपप्रश्न विचारला, "फक्त दया पवार? बाबुराव बागुल वाचले नाहीत?" याला त्या दलित उमेदवाराने उत्तर दिले, "नाही, एम.ए.ला फक्त दया पवारांचे 'बलुतं' होतं."
काय अवस्था आहे उच्च शिक्षणातील "मराठी भाषे" च्या अभ्यासक्रमाची आणि उच्चपदस्थांची तळमळ? डॉ.नीलिमा म्हणतात, "मंत्रालयात लोकप्रतिनीधींपेक्षा कारकूनांचे अधीक महत्व आहे." असेल, पण विद्यानगरीच्या विद्यापीठात काय वेगळी परिस्थिती आहे? बीओएस च्या निवडणुकीत जे घाणेरडे राजकारण विद्यापिठातून खेळले जाते तीमध्ये मराठीची तळमळ त्या विषयाच्या प्राध्यापकांना असते की, आपल्या प्रकाशनाची पुस्तके अभ्यासक्रमात "लावली" जातील हे मतलबीपणे पाहणार्या प्रकाशकांच्या लॉबीला?
त्यामुळे शाळा-कॉलेज-विद्यापीठ या जागांपेक्षा जनसामान्य पातळीवर भाषेविषयीचे कुतहूल जागृत ठेवणे हीच सद्यस्थितीत काळाची गरज आहे आणि त्यासाठी लेखकाने ओळख करून दिलेले डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नीतांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही.
(थोडेसे अवांतर : श्री.पाषाणभेद यांचा नीलिमाताईंशी परिचय असेल तर त्यांनी पुस्तकाबाबतच्या इथल्या प्रतिक्रिया त्यांना जरूर कळवाव्यात.)
इन्द्रा
खरं बोल्ला दादा तुमी. पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्या पोराला
साहित्याची किती तोंडवळख रहाती ह्यो एम.फील च्या प्रबंधाचा इषय व्हईन. पोराला इचारलं का बाबा मराठीतले साहित्यप्रकार सांग तर आभायाकडं पाहतं. साहित्यप्रवाह इचारल्यावर दाताड काढून सवाल इचारण्याला लय शुल्लक सवाल इचारल्यासारखा पाहतो. येत जात तर काय नाय. दलित लेखक,ग्रामीण लेखक,अदिवासी लेखक, आन भाषाभ्यासकाचे नाव इचारले तर पोर्ग कोमात जातं.
भाषा म्हंजी काय ? भाषेची व्याख्या ? स्वन, स्वनीम,पद,पदीम, असे प्रश्न इचारल्यावर पोर्ग बावचळून जातं. तव्हा अशा भाषाभ्यास असणार्या पुस्तकाची वळख शाळा-महाविद्यालयात पोरायला करुन देली पाह्यजेन. पाषाणभेदानी पुस्तकाची चांगली वळख करुन दिली. मंडळ आभारी हाय.
बाबुराव :)
पण पदवी आन पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठी विषय घेऊन शिकणार्या पोरांपैकी बरेचसे नाईलाजाने (किंवा अभ्यास न केल्याने) तिकडे गेलेले असतात. त्यांच्याकडुन आणखी वेगळी अपेक्षा तरी काय ठेवणार.
प्रतिक्रिया देणारे अन आवर्जून हा धागा वाचन करणार्यांचे मनापासून आभार.
@ इन्द्र्राज पवार: साहेब, माझी डॉ. नीलिमा ताईंची ओळख नाही. पुण्यात राहणार्या मंडळींनी त्यांच्याशी संपर्क साधणे म्हणजे त्यांना या विषयावर पुन्हा लिहीण्यास हुरूप येईल.
>>> डॉ. नीलिमा गुंडी यांचे पुस्तक भाषेविषयी अभिमान म्हणून नव्हे तर प्रेम म्हणून जवळ असणे नितांत गरजेचे ठरेल यात संदेह नाही.
वाचनालयातून हे पुस्तक आणले तेव्हा मला एखाद्या लहान मुलाला खावू मिळावा तसा आनंद झाला. वाचनालयात असल्या विषयाच्या पुस्तकाला कोणी हात लावत नाही. त्यामुळे हे पुस्तक जवळपास माझेच झाले आहे!
@मीनल ताई : टकुरं, टाळकं, डोसकं, मस्तक, माथा, डोकं, डोई या एकाचअर्थी बोलीभाषेतील शब्दांची मजा वाक्यात वापरून बघा!
@बाबुराव : साहित्य विषय केवळ मार्कांच्या हिशोबात अभ्यासला जातो. पुलंचे वाक्य आहे: 'ज्ञानेश्वर २ मार्कांना आहे तर मी किती मार्कांना असेन?' अशा अर्थाचे. शाळाकॉलेजातसुद्धा मुलांना रस उत्पन्न होईल असे शिकवले जात नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम केले जाते अन विद्यार्थीही त्याच लायक आहेत. एकमेकांना पुरक झाले आहे सगळे. काही अपवाद अपवादानेच सापडतील.
या पुस्तकातील डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची मुलाखत तर फारच मनाला लागणारी आहे व मुळातून वाचण्यासारखी आहे.
ते स्व:ता एका विद्यापीठात कुलगुरू होते त्यामुळे त्यांच्या वाक्यांना अनुभवामुळे महत्व प्राप्त झाले आहे.
त्यांनी नोकरशहा, शासन तसेच इंग्रजाळलेले पालक व शिक्षणसंस्था यांवर सडकून केलेली टिका जाणकार मनाला टोचणी करत राहते. त्यांनी सुचविलेले उपाय जेव्हा महाराष्ट्र शासन अंमलात आणेल तो दिवस मराठीसाठी सोन्याचा (सोनियाचा नव्हे!) असेल.
@भाऊ पाटील: कोतापल्ले सरांनी यामागची कारणमिमांसा मुलाखतीत विस्तृतरीत्या केलेली आहे.
@अर्धवट, @इंटरनेटप्रेमी, @मदनबाण, @बिरुटेसर, @राजेश घासकडवी व इतर वाचकांचे आभार
तुमच्यापर्यंत हा विषय गेला यातच धन्यता आहे. शेवटी मराठीचा उदो उदो होणे हा हेतू सफल होणे महत्वाचे. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद.
प्रतिक्रिया
मराठीची वस्तूस्थिती व त्यावर
किचकट विषय आहे तरी छान ओळख
छान ओळख! धन्यवाद.
+१
भाषा
पुस्तक ओळख आवडली.
योग्य पुस्तक (समर्पक ओळख)
खरं बोल्ला दादा तुमी. पदवी आन
उत्तम ओळख, पाभे. सर्वांच्या
खरेच उत्तम ओळख!
प्रतिक्रिया देणारे अन आवर्जून