लेखककवि मनाचायांनी बुधवार, 02/03/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
बायको: पोह्यात मीठ विसरले, चव का तुम्हाला कळत नाही,
खाताय कि चरताय, तुमचं काही खरं नाही.
नवरा: अॉफिसला उशिर होतोय, क्षणाचीही उसंत नाही,
जीवनच माझं चवदार केलंस, पोह्यांची मला तमा नाही.
लेखकसाहित्य संपादकयांनी बुधवार, 02/03/2016 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है...
अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा...
आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...
काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे.
रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात.
लेखककवि मनाचायांनी मंगळवार, 01/03/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं
एक अधिक एक बरोबर दोनच असतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं.
फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं
लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं
यशाच्या पायऱ्या चढताच कळतं
इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं.
ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ)
मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता
नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं
इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता.
भौतिकशास्त्राच्या तासाला प्रश्नच कधी समजला नाही
स्पिरीटचा दिवा, एबोनाईटचा दांडा अन् रेशमी रुमाल
माझ्याशी असे का वागले तेच कधी कळलं नाही
आज भौ
लेखकनीलमोहरयांनी सोमवार, 29/02/2016 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
नेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना
तिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो
डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात
ते अगदीच पकाऊ असतात
मला अशा सायटी आवडत नाहीत
ऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते
तैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय
जिलब्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते
मग तीही मी कधी खात नाही
गुगलवर फिरता फिरता 'त्या' साईटीकडे मी ढुंकूनही कधी पाहत नाही
तिथले लेखन वाचतांना माझी मती कुंठीत झाली होती
मग तिकडे मी कधी गेलोच नाही
मा...
लेखकनीलमोहरयांनी गुरुवार, 25/02/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.
तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...
लेखकस्वामी संकेतानंदयांनी बुधवार, 17/02/2016 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाटा रुते कुणाला, आक्रसतात ऍक्शन
रीबॉक मज रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कसे कुणाला कळ फाटक्या बुटांची
शिवून आठ जागी मी चालतोच आहे
डिस्काउंट येतो, टाकून 'अर्थ' देतो
माझी निवड बुटांची घाईत होत आहे
अस्सल असेल की चीनी माल आकळेना
ब्रांडेड मागवोनी ही त्रस्त त्रस्त आहे
-- स्वामी संकेतानंद
लेखकस्वामी संकेतानंदयांनी मंगळवार, 16/02/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
कवी वा. रा. कांत ह्यांची क्षमा मागूनच >>
महवांची गाळ फुले अजुनि पिंपड्यात
चोरपावली पळशी काय तू वनात?
आले ते जोमात तीन शुंभ पोलिसाचे
ओल्या रानात खुले दार गाळपाचे
मनकवडा मग पळतो दूर डोंगरात
ती जागा, ती भट्टी नारळिच्या खाली
पूर्ण तोच लगबग मी मग करतो खाली
रिमझिमते अमृत 'तो' विकल मंडईत
हातांत लोहाचे बंध गुंफताना
सगळ्यांना स्वच्छ कळे
मिळुनि मोजताना
कमलापरी मिटति दिवस
उमलुनी सळ्यात
तू गेलास सोडुनि तो माळ, सर्व अड्डे
तडफडणे 'स्वामींचे' फक्त उरे खड्डे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?
-- स्वामी संकेतानंद
लेखकजेपीयांनी गुरुवार, 11/02/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.
लेखकनीलमोहरयांनी बुधवार, 10/02/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो.
मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....