बराच वेळ मनाशी
मी हाच विचार करत होतो
की उपासाला नेमका
हा किस कसा चालतो..?
उपासाला जड असे
काहिच खायचे नसते..म्हणे!
मग हे कसे चालते..?
बारश्याला तेराव्याचे गाणे?
खिचडी काय..नी..किस काय?
हलके थोडेच असतात..होय?
माणसे कशी शोधुन काढतात
उपवासालाच सुखाची सोय?
उपवसाला शास्त्रात म्हणे
निराहार ही संज्ञा आहे
पण लोक केवढा किस काढतात
की पाहुन वाटतं..काय हे..?
खिचडी काय...नी थालपिठं काय
सगळं जडच खातात
तर काहि दुसरं टोक गाठणारे
पाणी पिऊन उपाशी रहातात.
तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो...
ज्याची त्याची अवड..!
मी म्हणतो,,बा धर्मा..
आता तुझ्या अस्थी सावड
धर्म ही अफूची गोळी
हे वचन आज मला पटलं
आणी त्यांना ग